शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

अमरवेलीमुळे सोयाबीन पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:39 IST

मागील दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकºयांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. यंदा सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आतापून्हा पावसाने दडीच मारली आहे. शिवाय सध्या अमरवेल सोयाबीन पिकावर आपले वचस्व निर्माण करीत असल्याने सोयाबीन पिकाची वाढ खुंटत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची वाढली चिंता : पीक उपटण्याची आली वेळ, शासकीय मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : मागील दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. यंदा सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आतापून्हा पावसाने दडीच मारली आहे. शिवाय सध्या अमरवेल सोयाबीन पिकावर आपले वचस्व निर्माण करीत असल्याने सोयाबीन पिकाची वाढ खुंटत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून त्यांना कृषी विभागाच्या तज्ञांनी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पेरणीच्या कामाला वेग देण्यात आला. पिकाची योग्य निगा घेतल्याने पिकही बऱ्यापैकी वाढले. परंतु, गत २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने सोयाबीन, कपाशी, तूर आली पीक माना टाकत आहेत. कपाशी पिकावर बोंडअळी आक्रमण करेल याची भीती कपाशी उत्पादकांना सतावत आहे. तर काही परिसरात अमरवेलीमुळे सोयाबीन पिकाची वाढच खुंटली आहे. अमरवेलीमुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटल्याने जामणी येथील शेतकरी नरेंद्र येणकर यांच्यावर तीन एकरातील सोयाबीन पीक उपटून फेकण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडून सध्या अमरवेलीचा नायनाट करण्यासाठी सदर वेलीसह सोयाबीन पिकही उपटून नष्ट केल्या जात आहे. अमरवेलीमुळे फुलावर आलेले सोयाबीन पीक उपटण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. शिवाय पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची फुलही गळत आहेत. यामुळे या शेतकऱ्याला शासकीय मदत देण्याची मागणी आहे. शेतकरी नरेंद्र येणकर यांनी एक महिन्यांपूर्वी ३ एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. सदर पीक चांगले बहरले; पण काही दिवसांपूर्वी सदर शेतात अमरवेल मोठ्या प्रमाणात वाढली. अमरवेल शेतातील सोयाबीन पिकाला पूर्णत: झाकून घेत सदर झाडातील पोषक तत्त्व शोषून घेते. यामुळे उत्पादनातही घट येत असल्याचे शेतकरी सांगतात.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती