शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

अमरवेलीमुळे सोयाबीन पीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 23:39 IST

मागील दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकºयांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. यंदा सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आतापून्हा पावसाने दडीच मारली आहे. शिवाय सध्या अमरवेल सोयाबीन पिकावर आपले वचस्व निर्माण करीत असल्याने सोयाबीन पिकाची वाढ खुंटत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची वाढली चिंता : पीक उपटण्याची आली वेळ, शासकीय मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : मागील दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. यंदा सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आतापून्हा पावसाने दडीच मारली आहे. शिवाय सध्या अमरवेल सोयाबीन पिकावर आपले वचस्व निर्माण करीत असल्याने सोयाबीन पिकाची वाढ खुंटत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून त्यांना कृषी विभागाच्या तज्ञांनी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पेरणीच्या कामाला वेग देण्यात आला. पिकाची योग्य निगा घेतल्याने पिकही बऱ्यापैकी वाढले. परंतु, गत २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने सोयाबीन, कपाशी, तूर आली पीक माना टाकत आहेत. कपाशी पिकावर बोंडअळी आक्रमण करेल याची भीती कपाशी उत्पादकांना सतावत आहे. तर काही परिसरात अमरवेलीमुळे सोयाबीन पिकाची वाढच खुंटली आहे. अमरवेलीमुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटल्याने जामणी येथील शेतकरी नरेंद्र येणकर यांच्यावर तीन एकरातील सोयाबीन पीक उपटून फेकण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडून सध्या अमरवेलीचा नायनाट करण्यासाठी सदर वेलीसह सोयाबीन पिकही उपटून नष्ट केल्या जात आहे. अमरवेलीमुळे फुलावर आलेले सोयाबीन पीक उपटण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. शिवाय पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची फुलही गळत आहेत. यामुळे या शेतकऱ्याला शासकीय मदत देण्याची मागणी आहे. शेतकरी नरेंद्र येणकर यांनी एक महिन्यांपूर्वी ३ एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. सदर पीक चांगले बहरले; पण काही दिवसांपूर्वी सदर शेतात अमरवेल मोठ्या प्रमाणात वाढली. अमरवेल शेतातील सोयाबीन पिकाला पूर्णत: झाकून घेत सदर झाडातील पोषक तत्त्व शोषून घेते. यामुळे उत्पादनातही घट येत असल्याचे शेतकरी सांगतात.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती