शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

सोयाबीनने मोडले कंबरडे, कपाशीवर भिस्त

By admin | Updated: November 9, 2014 23:18 IST

सोयाबीनने कंबरडे मोडले़ भिस्त आता कपासीवर आहे. पण एक दोन वेच्यातच उलंगवाडी होण्याची स्थिती असल्याने शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे़

सेवाग्राम : सोयाबीनने कंबरडे मोडले़ भिस्त आता कपासीवर आहे. पण एक दोन वेच्यातच उलंगवाडी होण्याची स्थिती असल्याने शेतकरी वर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे़ येणारा हंगाम शेतकऱ्यांच्या हिताचा असावा अशी अपेक्षा शेतकरी व्हक्त करीत आहे. सातत्याने शेतकऱ्यांची लुबाडणूक, दिशाभूल होत आली आहे़ त्याच अवस्थेत नव्हे तर त्यांचे खच्चीकरण कसे करता येईल हेच धोरण शासनाने राबविले आहे़ सध्यातरी शेतकरी सोयाबीन सवंगणी व काढण्याच्या कामात व्यस्त असून सामान्यपाणे एकरी एक ते तीन पोते असा सर्वत्र उतारा आहे़ ठराविकच शेतकऱ्यांना चार ते पाच पोत्यांचा उतारा आहे़ मात्र दाना बारिक असल्याने किती भाव मिळणार असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.दिवाळी अगोदर निघणारे सोयाबीन यावेळी पावसामुळे दिवाळीनंतर काढण्यात येत आहे़ सेवाग्राम ते हमदापूर तसेच आलगाव, बोंडसुला आदी गावात सोयाबीनचे उत्पन्न पाच टक्के असल्याने सोयाबीन उत्पादक पूर्णत: बुडाला आहे़ याच गावातील काही शेतकऱ्यांनी न सवंगण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली़ सोयाबीन सारखीच कपाशीची अवस्था आहे़ कोरडवाहूमध्ये अडीच ते तीन क्विंटल आणि ओलिताचा पाच ते सहा क्विंटल असे एकरी उत्पादन राहणार आहे़ पण लाल्याचा प्रकोप आल्याने यावर सुद्धा संक्रात आली आहे़ पऱ्हाटीला थंडी व पाण्याची गरज आहे़ दोन्ही प्रमाण कमी असल्याने रोग वाढत आहे. यामुळे फारच कमी वेचे होणार असे दिसत आहे. निसर्गाच्या भरोश्यावर आणि आशेवर जगणारा शेतकरी चना वा गव्हाची पेरणी करून काही पदरात पाडण्याची तयारी करीत आहे़ कर्ज व उसनवारी फेडायची की जगायचे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे़ शेतकऱ्यांना होणारे उत्पन्न पाहता बँकेचे लोन सुद्धा यावर्षी फेडू शकणार नाही, अशा परिस्थितीत शेतकरी आहे़ महागाई वाढत आहे़ मजुरीपासून तर बियाणे आणि शेतमाल काढण्यापर्यंत हिशोब भोवळ आणणारा असाच आहे़ ग्रामीण क्षेत्र व जीवन शेतीवर असल्याने चिंताजनक वातावरण दिसत आहे़(वार्ताहर)