शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

यात्रेतून जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:59 IST

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी नेत्यांनी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अंदोरी येथे शेतकऱ्यांची संवाद साधला.

ठळक मुद्देहल्लाबोल यात्रेत अंदोरीत साधला संवाद

आॅनलाईन लोकमतदेवळी : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी नेत्यांनी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अंदोरी येथे शेतकऱ्यांची संवाद साधला. शिवाय बोंडअळीची समस्या जाणून घेण्याकरिता शेतात जावून कपाशीची पाहणी केली. एवढी बिकट समस्या असतानाही शासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.यवतमाळ जिल्ह्यातून रविवारी वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या यात्रेचा सोमवारी दिवसभर १३.५ कि.मी चा प्रवास झाला. शिरपूरवरून भिडी मार्गे ही यात्रा रत्नापूर, दापोरी, एकपाळा मार्गे देवळी येथे पोहचली. या यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रकाश गजबे, आ. विद्या चव्हाण, आ. गुलाबराव देवकर, चित्रा वाघ, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, सुरेश देशमुख, राजु तिमांडे, सुधीर कोठारी, सुरेखा ठाकरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.नवरदेवाचा अजितदादांसोबत सेल्फीभिडी ते देवळी मार्गावर एक लग्नाची वरात या पदयात्रेच्या जवळ थांबली. या वरातीतील एका गाडीतून नवरदेव उतरला. दरम्यान नवरदेवाला अजीत पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा झाली. यावेळी अजीत पवारांसह इतर नेत्यांसोबत नवरदेवाने सेल्फी घेतली. यावेळी अजितदादांनीही नवरदेवाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आहेर देऊन लग्नासाठी रवाना केले.भाजपाने शेतकऱ्यांचा घात केला - जयंत पाटीलकापसाला ७ हजार व सोयाबीनला ६ हजाराचा भाव देण्याची हमी घेणारे हे सरकार केवळ थापा मारून सत्तेवर आले आहे. कापसाला चार ते साडेचार हजार व सोयाबीनला २ हजार २०० पर्यंतचा भाव देवून शेतकºयांचा गळा घोटला जात आहे. भाजपा सरकारने आमचा विश्वासघात केल्याची भावना जनसामान्यांची झाली आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. देवळी येथे हल्लाबोल रॅलीच्या सभेत ते बोलत होते.सुप्रिया सुळेंचे कोरकू आदिवासींसोबत नृत्यहल्लाबोल यात्रेदरम्यान खा. सुप्रिया सुळे यांनी यात्रेत सहभागी कोरकु आदिवासी बांधवांसह नृत्य केले. त्यांचे नृत्य पाहून परिसरातील नागरिकांनीही फेर धरला. यात्रेदरम्यान सहभागी नेते सर्वसामान्यांशी जुळवून घेत असल्याचे दिसून आले.वर्धा शहरात मंगळवारी जाहीर सभाहल्लाबोल पदयात्रा सोमवारी रात्री देवळी गावात मुक्कामी आहे. तेथून ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता वर्धा शहरात पदयात्रा पोहचणार आहे. त्यानंतर सर्कस ग्राऊंड मैदानावर जाहीर सभा होणार आहे.