शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेतून जाणल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 22:59 IST

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी नेत्यांनी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अंदोरी येथे शेतकऱ्यांची संवाद साधला.

ठळक मुद्देहल्लाबोल यात्रेत अंदोरीत साधला संवाद

आॅनलाईन लोकमतदेवळी : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत सहभागी नेत्यांनी वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील अंदोरी येथे शेतकऱ्यांची संवाद साधला. शिवाय बोंडअळीची समस्या जाणून घेण्याकरिता शेतात जावून कपाशीची पाहणी केली. एवढी बिकट समस्या असतानाही शासनाकडून दखल घेण्यात येत नसल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.यवतमाळ जिल्ह्यातून रविवारी वर्धा जिल्ह्यात दाखल झालेल्या यात्रेचा सोमवारी दिवसभर १३.५ कि.मी चा प्रवास झाला. शिरपूरवरून भिडी मार्गे ही यात्रा रत्नापूर, दापोरी, एकपाळा मार्गे देवळी येथे पोहचली. या यात्रेदरम्यान महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील, आ. राजेश टोपे, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रकाश गजबे, आ. विद्या चव्हाण, आ. गुलाबराव देवकर, चित्रा वाघ, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे, सुरेश देशमुख, राजु तिमांडे, सुधीर कोठारी, सुरेखा ठाकरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.नवरदेवाचा अजितदादांसोबत सेल्फीभिडी ते देवळी मार्गावर एक लग्नाची वरात या पदयात्रेच्या जवळ थांबली. या वरातीतील एका गाडीतून नवरदेव उतरला. दरम्यान नवरदेवाला अजीत पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा झाली. यावेळी अजीत पवारांसह इतर नेत्यांसोबत नवरदेवाने सेल्फी घेतली. यावेळी अजितदादांनीही नवरदेवाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आहेर देऊन लग्नासाठी रवाना केले.भाजपाने शेतकऱ्यांचा घात केला - जयंत पाटीलकापसाला ७ हजार व सोयाबीनला ६ हजाराचा भाव देण्याची हमी घेणारे हे सरकार केवळ थापा मारून सत्तेवर आले आहे. कापसाला चार ते साडेचार हजार व सोयाबीनला २ हजार २०० पर्यंतचा भाव देवून शेतकºयांचा गळा घोटला जात आहे. भाजपा सरकारने आमचा विश्वासघात केल्याची भावना जनसामान्यांची झाली आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली. देवळी येथे हल्लाबोल रॅलीच्या सभेत ते बोलत होते.सुप्रिया सुळेंचे कोरकू आदिवासींसोबत नृत्यहल्लाबोल यात्रेदरम्यान खा. सुप्रिया सुळे यांनी यात्रेत सहभागी कोरकु आदिवासी बांधवांसह नृत्य केले. त्यांचे नृत्य पाहून परिसरातील नागरिकांनीही फेर धरला. यात्रेदरम्यान सहभागी नेते सर्वसामान्यांशी जुळवून घेत असल्याचे दिसून आले.वर्धा शहरात मंगळवारी जाहीर सभाहल्लाबोल पदयात्रा सोमवारी रात्री देवळी गावात मुक्कामी आहे. तेथून ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता वर्धा शहरात पदयात्रा पोहचणार आहे. त्यानंतर सर्कस ग्राऊंड मैदानावर जाहीर सभा होणार आहे.