शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा

By admin | Updated: June 11, 2014 23:28 IST

शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत.

वर्धा : शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. त्यामळे शेतकरी व सामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा य आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी, वर्धा प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सादर केले. निवेदनानुसार शेतीव्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा देवून २४ तास विद्यूत पुरवठा होणे आवश्यक आहे. वडनेर ते वडकी या २० कि़मी.च्या राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण अनुदान प्राप्त असून २०१२ पर्यंत तो पूर्ण करायचा होता. पण अद्यापही तो अपूर्ण व बिकट अवस्थेत असून अपघात व जीवितहानीचे प्रमाण सतत वाढत आहे. संबंधित यंत्रणेला काम पूर्ण करण्याकरिता तात्काळ आदेशीत करून होणारी जीवितहानीसाठी टाळण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. त्याचप्रमाणे हिंगणघाट ते पार्डी नगाजी रस्त्यावरील पूल खचलेला असून दळणवळण ठप्प आहे. तेव्हा पुल नव्याने त्वरीत दुरूस्त करावा, वडनेर ते तिर्थक्षेत्र आजनसरा मार्गाचे रूंदीकरण करून उत्तम दर्जाची सुधारणा करावी यासह विविध मागण्यांबाबत शासनाचे प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यासोबत निवेदन देतेवेळी चर्चा करण्यात आली. या मागण्यांची गांभीर्याने दखल घेण्याची मागणीही करण्यात आली. तसेच या मागण्या मान्य न झाल्यास १९ जून २०१४ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर वडनेर गावानजिक रस्तारोको आंदोलन करण्यासंदर्भातही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, तालुका अध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, मुख्य सल्लागार प्रल्हाद तुराहे, संघटक जयंत कातरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, राहुल सोरटे, गजानन चिडे, हर्षद घोरपडे आणि इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)