शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सर्वसामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा

By admin | Updated: June 11, 2014 23:28 IST

शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत.

वर्धा : शासकीय यंत्रणांची लेटलतिफ उदासिनता यामुळे शेतकरी बांधवासहीत राज्यातील सामान्य नागरिक पुरते हैराण झाले आहे. शेतकरी आणि सामान्य नागरिक नेहमीच आपल्या हक्कांपासून वंचित आहेत. त्यामळे शेतकरी व सामान्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा य आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी, वर्धा प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सादर केले. निवेदनानुसार शेतीव्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा देवून २४ तास विद्यूत पुरवठा होणे आवश्यक आहे. वडनेर ते वडकी या २० कि़मी.च्या राष्ट्रीय महामार्गाचे संपूर्ण अनुदान प्राप्त असून २०१२ पर्यंत तो पूर्ण करायचा होता. पण अद्यापही तो अपूर्ण व बिकट अवस्थेत असून अपघात व जीवितहानीचे प्रमाण सतत वाढत आहे. संबंधित यंत्रणेला काम पूर्ण करण्याकरिता तात्काळ आदेशीत करून होणारी जीवितहानीसाठी टाळण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. त्याचप्रमाणे हिंगणघाट ते पार्डी नगाजी रस्त्यावरील पूल खचलेला असून दळणवळण ठप्प आहे. तेव्हा पुल नव्याने त्वरीत दुरूस्त करावा, वडनेर ते तिर्थक्षेत्र आजनसरा मार्गाचे रूंदीकरण करून उत्तम दर्जाची सुधारणा करावी यासह विविध मागण्यांबाबत शासनाचे प्रशासकीय प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यासोबत निवेदन देतेवेळी चर्चा करण्यात आली. या मागण्यांची गांभीर्याने दखल घेण्याची मागणीही करण्यात आली. तसेच या मागण्या मान्य न झाल्यास १९ जून २०१४ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर वडनेर गावानजिक रस्तारोको आंदोलन करण्यासंदर्भातही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, तालुका अध्यक्ष प्रवीण श्रीवास्तव, मुख्य सल्लागार प्रल्हाद तुराहे, संघटक जयंत कातरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, राहुल सोरटे, गजानन चिडे, हर्षद घोरपडे आणि इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)