शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

सोशल डिस्टन्सिंग नॉर्मल मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळून घरी रहा आणि आजाराला पळवा, असे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देवर्धेकर रस्त्यावर : भाजीबाजार व पेट्रोलपंपावर वाढतेय गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नसला तरी कोरानाला रोखण्याकरिता जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर कार्य करीत आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्याकरिता जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरु ठेऊन ‘सोशल डिस्टन्सिंग’ अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. पण, सध्या बहुतांश ठिकाणी याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. दिवस उजाडताच वर्धेकर रस्त्यावर गर्दी करीत असल्याने अजुनही कोरोना आजाराबाबत नागरिक गंभीर नसल्याचे चित्र आहे.कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने गर्दी टाळून घरी रहा आणि आजाराला पळवा, असे आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन नागरिकांना आवाहन करीत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्याकरिता १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.त्यामुळे शहरातील किराणा, औषधी, धान्य, भाजीपाल्याची दुकाने सुरु आहे. यासोबतच पेट्रोलपंपही सुरु असून आता सोमवार व मंगळवारी इलेक्ट्रिक आणि ऑटोमोबाईचे दुकान सुरु ठेवण्यासही जिल्हाधिकाऱ्यांनी मुभा दिली आहे. या ठिकाणी गर्दी टाळण्याकरिता सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करणे बंधनकारक केले आहे. मात्र, मंगळवारी ठिकठिकाणी याची पूर्णत: वाट लागल्याचे दिसून आहे. शहरातील दोन ठिकाणी असलेल्या भाजीबाजारात ग्राहकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. हेच चित्र बजाज चौकातील पेट्रोलपंपावरही होते.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि स्वावलंबी शाळेच्या मैदानावर भाजी व फळबाजार सुरु करण्यात आला आहे. या ठिकाणी दुकानदारांनी चुन्याने बॉक्स तयार केले होते. आता दोन दिवस झालेल्या वादळी पावसामुळे हे बॉक्स दिसेनासे झाले आहे. त्यामुळे काही ठिकाणी नव्याने बॉक्सची आखणी करण्यात आली नाही. परिणामी याचाच फायदा बेफिकरे वर्धेकर घेताना दिसून येत आहे.ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावण्यात आला असून पोलिसांकडून वारंवार सामाजिक अंतर ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यासंदर्भात पेट्रोलपंप मालक व दुकानचालकांना सूचना केल्या जात असतानाही कानाडोळा होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आवाहनानंतरही वर्धेकरांनी सध्यातरी कोरानाच्या प्रकोपात सोशल डिस्टन्सिंगला नॉर्मल मोडवर टाकल्याचे दिसून येत आहे.शहरातील रस्त्यांवर सकाळपासूनच सुरु होतेय वाहनांची वर्दळकोरोना आजार हा महत्त्वाच्या टप्प्यात असताना प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. पण, वर्धेकर अद्यापही गंभीर नसल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. मंगळवारी ऑटोमोबाईल, भाजीबाजारासह शहरातील मुख्य मार्गाने दुपारपर्यंत वाहनांची चांगलीच वर्दळ पहावयास मिळाली. निर्मल बेकरी मार्ग व शनिमदिर मार्गावरही वाहनांची चांगलीच गर्दी होती. बजाज चौकातील पेट्रोल पंपावरही वाहन चालक सामाजिक अंतर न पाळता गोळा झाले होते. त्यामुळे आता तरी सतर्क होण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSocialसामाजिक