शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा मतदारसंघातून आतापर्यंत ११ जणांना मिळाला खासदारकीचा मान, दोघांची हॅट्ट्रिक

By रवींद्र चांदेकर | Updated: March 28, 2024 16:45 IST

आता अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत असून, विद्यमान खासदारांना हॅट्ट्रिकची संधी आहे.

वर्धा : आतापर्यंत १७ वेळा लोकसभा निवडणूक झाली. त्यात ११ जणांना खासदारकीचा मान मिळाला. त्यापैकी दोघांनी हॅट्ट्रिक केली, तर दोघांना दोनदा खासदारकीची संधी मिळाली. आता अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत असून, विद्यमान खासदारांना हॅट्ट्रिकची संधी आहे.

१९५२ पासून देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे श्रीमन्न अग्रवाल यांनी विजयश्री प्राप्त केली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत कमलनयन बजाज खासदार झाले. त्यांनी १९५७ पासून १९७१ पर्यंत सलग तीनदा लोकसभेत वर्धेचे नेतृत्व केले. १९७१ ते १९७७ पर्यंत जगजीवनराव कदम, १९७७ ते १९८० पर्यंत संतोषराव गोडे यांनी खासदारकी भूषविली. त्यानंतर १९८० पासून १९९१ पर्यंत सलग तीनदा वसंतराव साठे यांना खासदारकीची संधी मिळाली. मात्र, १९९१ च्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसचा पराभव झाला. त्यावेळी वसंतराव साठे यांचा पराभव करून कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घंगारे यांना मतदारांनी खासदारकी बहाल केली होती.

यानंतर १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे विजयराव मुडे, तर १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दत्ता मेघे यांना खासदारकीची संधी मिळाली. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रभा राव, तर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सुरेश वाघमारे यांना मतदारांनी संधी दिली. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांनी दुसऱ्यांदा काँग्रेसचे दत्ता मेघे यांना विजयी केले. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपचे रामदास तडस यांना सलग दोनदा खासदारकीची संधी दिली आहे. आता ते तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहे. दत्ता मेघे यांना तब्बल दहा वर्षांच्या ब्रेकनंतर, तर रामदास तडस यांना सलग दोनदा खासदारकीची संधी मिळाली आहे.

आईचा विजय, मुलगी पराभूत

वर्धा लाेकसभा मतदारसंघातून मतदारांनी एका महिलेलाही खासदारकीची संधी दिली. काँग्रेसच्या प्रभा राव यांच्या रूपाने पहिल्यांदाच येथून २००४ मध्ये एका महिलेला खासदारकीची संधी मिळाली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या कन्या चारुलता टोकस (राव) यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी त्यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत तडस यांना पाच लाख ७८ हजार ३६४, तर टोकस यांना तीन लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. त्यावेळी रिंगणातील शैलेश अग्रवाल यांना ३६ हजार ४२३, तर धनराज वंजारी यांना ३६ हजार ४५२ मते मिळाली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४