शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

वर्धा मतदारसंघातून आतापर्यंत ११ जणांना मिळाला खासदारकीचा मान, दोघांची हॅट्ट्रिक

By रवींद्र चांदेकर | Updated: March 28, 2024 16:45 IST

आता अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत असून, विद्यमान खासदारांना हॅट्ट्रिकची संधी आहे.

वर्धा : आतापर्यंत १७ वेळा लोकसभा निवडणूक झाली. त्यात ११ जणांना खासदारकीचा मान मिळाला. त्यापैकी दोघांनी हॅट्ट्रिक केली, तर दोघांना दोनदा खासदारकीची संधी मिळाली. आता अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत असून, विद्यमान खासदारांना हॅट्ट्रिकची संधी आहे.

१९५२ पासून देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे श्रीमन्न अग्रवाल यांनी विजयश्री प्राप्त केली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत कमलनयन बजाज खासदार झाले. त्यांनी १९५७ पासून १९७१ पर्यंत सलग तीनदा लोकसभेत वर्धेचे नेतृत्व केले. १९७१ ते १९७७ पर्यंत जगजीवनराव कदम, १९७७ ते १९८० पर्यंत संतोषराव गोडे यांनी खासदारकी भूषविली. त्यानंतर १९८० पासून १९९१ पर्यंत सलग तीनदा वसंतराव साठे यांना खासदारकीची संधी मिळाली. मात्र, १९९१ च्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसचा पराभव झाला. त्यावेळी वसंतराव साठे यांचा पराभव करून कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घंगारे यांना मतदारांनी खासदारकी बहाल केली होती.

यानंतर १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे विजयराव मुडे, तर १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दत्ता मेघे यांना खासदारकीची संधी मिळाली. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रभा राव, तर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सुरेश वाघमारे यांना मतदारांनी संधी दिली. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांनी दुसऱ्यांदा काँग्रेसचे दत्ता मेघे यांना विजयी केले. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपचे रामदास तडस यांना सलग दोनदा खासदारकीची संधी दिली आहे. आता ते तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहे. दत्ता मेघे यांना तब्बल दहा वर्षांच्या ब्रेकनंतर, तर रामदास तडस यांना सलग दोनदा खासदारकीची संधी मिळाली आहे.

आईचा विजय, मुलगी पराभूत

वर्धा लाेकसभा मतदारसंघातून मतदारांनी एका महिलेलाही खासदारकीची संधी दिली. काँग्रेसच्या प्रभा राव यांच्या रूपाने पहिल्यांदाच येथून २००४ मध्ये एका महिलेला खासदारकीची संधी मिळाली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या कन्या चारुलता टोकस (राव) यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी त्यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत तडस यांना पाच लाख ७८ हजार ३६४, तर टोकस यांना तीन लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. त्यावेळी रिंगणातील शैलेश अग्रवाल यांना ३६ हजार ४२३, तर धनराज वंजारी यांना ३६ हजार ४५२ मते मिळाली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४