शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा मतदारसंघातून आतापर्यंत ११ जणांना मिळाला खासदारकीचा मान, दोघांची हॅट्ट्रिक

By रवींद्र चांदेकर | Updated: March 28, 2024 16:45 IST

आता अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत असून, विद्यमान खासदारांना हॅट्ट्रिकची संधी आहे.

वर्धा : आतापर्यंत १७ वेळा लोकसभा निवडणूक झाली. त्यात ११ जणांना खासदारकीचा मान मिळाला. त्यापैकी दोघांनी हॅट्ट्रिक केली, तर दोघांना दोनदा खासदारकीची संधी मिळाली. आता अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक होत असून, विद्यमान खासदारांना हॅट्ट्रिकची संधी आहे.

१९५२ पासून देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली. पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे श्रीमन्न अग्रवाल यांनी विजयश्री प्राप्त केली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत कमलनयन बजाज खासदार झाले. त्यांनी १९५७ पासून १९७१ पर्यंत सलग तीनदा लोकसभेत वर्धेचे नेतृत्व केले. १९७१ ते १९७७ पर्यंत जगजीवनराव कदम, १९७७ ते १९८० पर्यंत संतोषराव गोडे यांनी खासदारकी भूषविली. त्यानंतर १९८० पासून १९९१ पर्यंत सलग तीनदा वसंतराव साठे यांना खासदारकीची संधी मिळाली. मात्र, १९९१ च्या निवडणुकीत प्रथमच काँग्रेसचा पराभव झाला. त्यावेळी वसंतराव साठे यांचा पराभव करून कम्युनिस्ट पक्षाचे रामचंद्र घंगारे यांना मतदारांनी खासदारकी बहाल केली होती.

यानंतर १९९६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे विजयराव मुडे, तर १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसचे दत्ता मेघे यांना खासदारकीची संधी मिळाली. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या प्रभा राव, तर २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सुरेश वाघमारे यांना मतदारांनी संधी दिली. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदारांनी दुसऱ्यांदा काँग्रेसचे दत्ता मेघे यांना विजयी केले. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपचे रामदास तडस यांना सलग दोनदा खासदारकीची संधी दिली आहे. आता ते तिसऱ्यांदा मैदानात उतरले आहे. दत्ता मेघे यांना तब्बल दहा वर्षांच्या ब्रेकनंतर, तर रामदास तडस यांना सलग दोनदा खासदारकीची संधी मिळाली आहे.

आईचा विजय, मुलगी पराभूत

वर्धा लाेकसभा मतदारसंघातून मतदारांनी एका महिलेलाही खासदारकीची संधी दिली. काँग्रेसच्या प्रभा राव यांच्या रूपाने पहिल्यांदाच येथून २००४ मध्ये एका महिलेला खासदारकीची संधी मिळाली. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या कन्या चारुलता टोकस (राव) यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी त्यांचा पराभव केला. त्या निवडणुकीत तडस यांना पाच लाख ७८ हजार ३६४, तर टोकस यांना तीन लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. त्यावेळी रिंगणातील शैलेश अग्रवाल यांना ३६ हजार ४२३, तर धनराज वंजारी यांना ३६ हजार ४५२ मते मिळाली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४