शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

बोअरवेलच्या आवाजाने उडविली झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 21:49 IST

पाणीटंचाईचे संकेत असल्याने शहरात आणि लगतच्या भागात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर बोअरवेल खोदल्या जात आहेत. मात्र, संबंधित विभागाची परवानगी न घेता, शिवाय रात्री अपरात्री बोअरवेल केल्या जात असून यामुळे नागरिकांच्या झोपेचा खेळखंडोबा होत आहे. यावर कोणत्याच विभागाचे नियंत्रण नसल्याने बोअरवेलचा हा धंदा चांगलाच फोफावला आहे.

ठळक मुद्देनियम धाब्यावर बसवत बोअरिंग : नियंत्रण कुणाचे?

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणीटंचाईचे संकेत असल्याने शहरात आणि लगतच्या भागात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर बोअरवेल खोदल्या जात आहेत. मात्र, संबंधित विभागाची परवानगी न घेता, शिवाय रात्री अपरात्री बोअरवेल केल्या जात असून यामुळे नागरिकांच्या झोपेचा खेळखंडोबा होत आहे. यावर कोणत्याच विभागाचे नियंत्रण नसल्याने बोअरवेलचा हा धंदा चांगलाच फोफावला आहे.शहरात अधिकृत आठ बोअरवेल व्यवसायिक असून त्यांची संघटनाही आहे. वर्धा शहरातील पाणीटंचाईची चाहूल लागल्याने वर्ध्यातील व्यवसायिकांच्या संहमतीने व इतर काही मध्यस्तांच्या माध्यमातून परप्रांतातील बोअरवेल व्यावसायिकांनी मोर्चा वळविला आहे. यावर्षी जिल्ह्यात ६५ ते ७० टक्के इतके अल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु जलाशयांमध्ये २५ ते २७ टक्के इतका अल्प जलसाठा आहे. यामुळे एप्रिल अखेरीसपर्यंत शहरासह संपूर्ण जिल्ह्याला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागू शकते. नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाच ते सहा दिवसांआड तर लगतच्या ग्रामीण भागात सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे हिवाळ्यातच, डिसेंबरमध्ये नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सोसावे लागल्याने अनेकांनी बोअरवेल करण्यास सुरुवात केली.बोअरवेल करण्याकरिता नियमानुसार भूजल सर्वेक्षण विभाग, ग्रामपंचायत, नगरपालिका आदी विभागांकडून रीतसर परवानगी घेणे अनिवार्य आहे. मात्र, हा नियम बासनात गुंडाळत कुणीही परवानगी घेतली नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. शहरातील विविध वॉर्डांमध्ये तसेच शहरालगतच्या ग्रामीण भागात एका घराआड मनमर्जीने दररोज बोअरवेल केल्या जात असून भूगर्भाची पुरती चाळण केली जात आहे.विशेष म्हणजे, बोअरवेल दिवसाच्या कालावधीत करण्याचा नियम आहे. हा नियम धाब्यावर बसवत रात्री-अपरात्री बोअरवेल करून नागरिकांची झोप उडवण्याचा प्रकार व्यावसायिकांकडून होत आहे. सध्या परीक्षेचा कालावधी आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. याशिवाय अनेकांकडे लहान मुले, रुग्ण आहेत. बोअरवेल व्यावसायिकांच्या या बेशिस्त कृतीमुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मात्र, याबाबत कुण्या बोअरवेल व्यावसायिकावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. बोअरवेल व्यावसायिक आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.बाल कामगार कायद्याचीही लावली जातेय ‘वाट’शहरातील अनेक बोअरवेल व्यावसायिकांकडे बालकामगार कार्यरत असल्याने बाल कामगार कायदाही या व्यावसायिकांकडून धाब्यावर बसविण्यात आला आहे. यावर बाल कामगारांकरिता कार्यरत कामगार अधिकारी कार्यालय, संस्था, संघटनाही चुप्पी साधून आहेत.कामगारांची सुरक्षा वाºयावरएका बोअरवेल मशीनवर १५ ते २० कामगार कार्यरत असतात. अस्वच्छ वातावरणात हे कामगार वावरत असतात. त्यांना ड्रेसकोड नसून सुरक्षा साहित्यही बोअरवेल व्यावसायिकांकडून पुरविले जात नाही. राज्यात यापूर्वी बोअरवेलमुळे झालेल्या अपघातात कित्येकांना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. असे असताना याकडे प्रशासनाकडून सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे.बंदीच्या उठविल्या वावड्यापाणीबाणी लक्षात घेत काही बोअरवेल व्यावसायिकांनी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच ३१ डिसेंबरनंतर बोअरवेल करण्यावर बंदी घालण्यात येणार असल्याची वावडी उठवत आपले खिसे चांगलेच गरम केले. सध्या अधिकृत व्यावसायिकांशिवाय बोअरवेलचे दलालही सक्रिय झाल्याने पाण्याच्या नावावर पाण्यासारखा पैसा उकळला जात आहे.