शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

रेशीम कोष उत्पादन ठरतोय ‘तोट्याचा व्यवसाय’

By admin | Updated: December 14, 2015 01:59 IST

राज्यातील रेशीम उत्पादक डबघाईस आले आहेत. सध्या १५० ते १८० रुपये प्रती किलो एवढा अत्यल्प दर मिळत आहे.

कृषी सचिवांना साकडे : उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याची खंत; अनुदानाचीही प्रतीक्षा कायमचपवनार : राज्यातील रेशीम उत्पादक डबघाईस आले आहेत. सध्या १५० ते १८० रुपये प्रती किलो एवढा अत्यल्प दर मिळत आहे. कर्नाटक राज्यात हाच दर २०० ते २३० रुपये प्रती किलो एवढा आहे. राज्य शासनाकडून ७० रुपये प्रती किलो अनुदानही दिले जाते. यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्याला प्रती किलो दर २७० ते ३०० रुपये पडतो. त्याच धर्तीवर राज्य शासनानेही रेशीम कोष उत्पादकाला किमान ५० रुपये प्रती किलो अनुदान द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादकांनी केली आहे. याबाबत कृषी सचिवांना निवेदन देण्यात आले आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत चना पिकाची पाहणी तसेच डॉ. तोटे यांच्या सेंद्रिय शेतीची पाहणी करण्याकरिता कृषी सचिव डी.के. जैन हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादक अविनाश वाट पवनार, विलास कांबळे वघाळा, सुरेश जगताप, खरांगणा, निलेश तेलरांधे, अजय महाकाळकर सिंदी, प्रभाकर राऊत पिपरी (मेघे), कलावती बोरकर, झाडगाव यांनी निवेदन दिले. या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, दीपक पटेल, कृषी विकास अधिकारी खळीकर, तालुका कृषी अधिकारी विपीन राठोड, येसणकर, कृषी सहायक भोयर, सरपंच अजय गांडोळे, नंदकिशोर तोटे उपस्थित होते. रेशीम कोष उत्पादकांनी व्यथा कथन करताना खर्चाचा आराखडा सादर केला. यात १०० किलो कोष उत्पादनासाठी नऊ हजार रुपये, मजुरी पाच हजार रुपये, बाग व्यवस्थापन १५०० रुपये, वाहतूक खर्च असा एकूण १५ हजार ५०० रुपये खर्च आहे. भाव १५० रुपये दराने केवळ १५०० रुपये मिळतात. नफा तर सोडा; पण खर्चही निघत नाही. कृषी सचिवांनी निवेदन स्वीकारत चर्चा करून निर्णय घेण्याची ग्वाही दिली.(वार्ताहर)पीक विमा योजना राबविण्याकडेही कानाडोळावर्धा - महराष्ट्र शासनाने ८ आॅक्टोबर २०१४ ला रेशीम कीटक संभाव्य नुकसानीची दखल घेत रेशीम शेतकऱ्याला आधार देण्यासाठी रेशीम पीक विमा योजना जाहीर केली. तसे निर्देशही जिल्हा रेशीम कार्यालयाला दिले होते. १०० अंडीपूजास ९५ रुपये हप्ता व विमा रिकवरी १० हजार रुपये, असे त्याचे स्वरूप होते. आॅगस्ट ते नोव्हेंबरपर्यंतच्या बहुतांश शेतकऱ्यांचा सलग ३-४ बॅचेसमध्ये ८० ते ९० टक्केपर्यंत नुकसान झाले. प्रत्येक २५० अंडीपुंजास बॅचला १५ ते २० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून जिल्हा रेशीम विकास अधिकाऱ्यांनी रेशीम पीक विमा योजना जिल्ह्यात कार्यान्वित केली असती तर रेशीम शेतकऱ्यांची पीक विमा योजनेतून थोडी नुकसान भरपाई मिळाली असती; पण त्यापासूनही वंचित राहावे लागत आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २०१४-१५ या वर्षात नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ७० हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात येणार होते. रेशीम विकास अधिकाऱ्यांनी सहा महिन्यांपर्यंत संचालनालयात मागणीच पाठविली नाही. त्यामुळे २०१४-१५ मध्ये तुती लागवड केलेले शेतकरी लाभास पात्र असताना केवळ अधिकाऱ्याच्या हेकेखोर व कामचुकार वृत्तीमुळे लाभापासून वंचित राहिलेत. शासनाची ही योजना या वर्षापासून बंद करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करून रेशीम विकास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी संचालक, रेशीम संचालनालय यांच्याकडे केली आहे.