शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शिवशाहीला भारमानाचा ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 23:33 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कात टाकत शिवशाही, शिवनेरी या बसेसच्या माध्यमातून खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी राज्यभर ‘एसी’ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देअल्पावधीतच जिल्ह्यातील बसेस बंद : प्रवाशांची पुन्हा खासगीकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कात टाकत शिवशाही, शिवनेरी या बसेसच्या माध्यमातून खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी राज्यभर ‘एसी’ बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. वर्धा जिल्ह्यालाही चार शिवशाही बसेस देण्यात आल्या होत्या; पण अल्पावधीतच तोटा होत असल्याचे कारण देत त्या बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची मात्र घोर निराशा झाली आहे.खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या तुलनेत तत्पर व आरामदायी सेवा देता यावी म्हणून राज्य परिवहन महामंडळाने नवीन बसेस सुरू केल्यात. पुण्या-मुंबईमध्ये थंडगार एसी बसेस चालविल्या जात आहेत. नागपूर या उपनगरातही महामंडळाने एसी बसेस सुरू केल्या. मोठ्या शहरांमधून या थंडगार बसेसला प्रतिसादही मिळत आहे. यामुळेच राज्यात अनेक ठिकाणी लांब पल्ल्यासाठी ही बससेवा सुरू करण्यात आली. वर्धा जिल्ह्यातील वर्धा व हिंगणघाट आगारांना प्रत्येक दोन बसेस देण्यात आल्या होत्या. या बसेस शिर्डी आणि औरंगाबाद येथे चालविल्या जात होत्या. प्रारंभी या बसेसला वर्धा जिल्ह्यात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. अनेक प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सला पाठ दाखवित शिवशाहीकडे वळले होते; पण खासगी वाहतूकदारांपेक्षा अधिक तिकीट दर आकारले जात असल्याने अनेकांनी रापमच्या बसेसला रामराम ठोकला. उणेपूरे तीन ते चार महिन्यांतच वर्धा विभागाला शिवशाहीतून तोटा सहन करावा लागला. वर्धा विभागाला शिवशाहीतून प्रती दिवशी प्रती व्यक्ती ६४.१४ रुपये भारमान अपेक्षित होते; पण तीन-चार महिन्यांत एकही दिवस तेवढे भारमान मिळालेले नाही. भारमानच मिळत नसल्याने शिवशाही जिल्ह्यातून हद्दपारच करण्यात आल्या आहेत. केवळ चारच बसेस दिल्या असताना त्याही बंद केल्याने वर्धा जिल्हा एसी बसेसला मुकला आहे. सध्या या चारही शिवशाही बसेस भंडारा विभागाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.शिवशाही या एसी बसेस येण्यापूर्वी शिर्डी, शेगाव, औरंगाबाद या शहरांसाठी पारंपरिक लाल बसेस चालविल्या जात होत्या. आता पुन्हा त्याच बसेस लांब पल्ल्यासाठी वापरल्या जात आहे. परिणामी, जिल्ह्यातील प्रवाशांना आरामदायी प्रवासाला मुकावे लागले आहे. शिवाय खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.खासगीपेक्षा अधिक प्रवास भाडेराज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेसचे प्रवास भाडे अधिक आकारले जात होते. खासगी ट्रॅव्हल्सकडून वर्धा ते नागपूरकरिता ८० ते १०० रुपये आकारले जात असताना शिवशाही बसमध्ये १२२ रुपये प्रवास भाडे आकारले जात होते. असाच प्रकार शिर्डी आणि औरंगाबाद येथे जाताना होत होता. खासगी ट्रॅव्हल्सपेक्षा अधिक दर असल्याने अनेक प्रवासी ट्रॅव्हल्सला प्रथम प्राधान्य देत होते. यामुळे जिल्ह्यात शिवशाही बसेसला भारमानच मिळाले नाही. वास्तविक, वर्धा येथून पुणे, औरंगाबाद, शिर्डी, जळगाव तथा अन्य शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.केवळ सिटींग अरेंजमेंटमुळे त्रासरापमच्या शिवशाही बसेस एअर कंडीशनर असल्या तरी त्यामध्ये प्रवाशांची केवळ सिटींग अरेंजमेंट करण्यात आलेली आहे. प्रवासात झोप घेण्याची सोय नाही. या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्समध्ये स्लीपिंग अरेंजमेंट केलेली आहे. यामुळे अनेक प्रवासी ट्रॅव्हल्सलाच प्राधान्य देताना दिसतात.आर्वी-शेगावला आदेशाची वाटवर्धा जिल्ह्यात चार शिवशाही बसेस दिल्यानंतर आर्वी आगारातही शिवशाही बस देण्याची मागणी वाढली होती. ही बस आर्वी ते शेगाव सुरू करण्याची मागणी होती. तत्सम प्रस्तावही वर्धा विभागाकडून पाठविण्यात आला. याबाबत वर्धा विभागाकडून पाठपुरावाही करण्यात आला. तत्पूर्वी जिल्ह्यातील सर्वच शिवशाही बसेस बंद झाल्या. शिवाय राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई मुख्य कार्यालयातून ही बस सुरू करण्याबाबत कुठलाही आदेश आला नाही. यामुळे आता आर्वी ते शेगाव शिवशाही बस सुरू करण्याचा प्रस्ताव बारगळलाच म्हणावा लागेल. या ऐवजी साधी बस सुरू करण्यास मात्र वाव आहे.निराशेने माघारी परतले प्रवासीनाचणगाव - नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व आरामदायक व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बस सुरू केली. लांबपल्ला गाठणाऱ्या प्रवाशांनीही याला प्रतिसाद दिला. पुलगाव बसस्थानकावर येणाऱ्या लांब पल्ल्याच्या शिवशाही बस वर्धा, हिंगणघाट आगारातून होत्या; पण काही दिवसांपासून सदर बस येथे येणे बंद झाले आहे. प्रवासी सकाळी बसच्या वेळेत बसस्थानकावर हजर राहतात; पण कित्येक तास वाट पाहिल्यानंतर उन्हात त्यांना घरी परतावे लागते. पुलगाव बसस्थानकावर शिवशाहीचे आकर्षक बेंच, फलक लागले आहे; पण बस का येऊ शकत नाही, याबाबत ते समाधानकारक उत्तरे देऊ शकत नाही. शिवशाही बसेस बंद झाल्याने तत्सम फलक लावणे गरजेचे आहे. यामुळे किमान प्रवाशांची ताटकळ होणार नाही.

टॅग्स :Shivshahiशिवशाही