शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवारफेरीने जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात

By admin | Updated: January 7, 2015 22:58 IST

पाणी सार्वजनिक संपत्ती आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी पाणी अडवून जिरवण्याचे काम गावकऱ्यांनी करावे. तसेच पाण्याचा योग्य ताळेबंद बांधून संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम करावे,

वर्धा : पाणी सार्वजनिक संपत्ती आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी पाणी अडवून जिरवण्याचे काम गावकऱ्यांनी करावे. तसेच पाण्याचा योग्य ताळेबंद बांधून संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले. वर्धा तालुक्यातील पालोती गावापासून जलयुक्त शिवार अभियान २०१९ ची सुरुवात जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तहसीलदार राहुल सारंग, सरपंच ज्योत्सना वैरागने, उपसरपंच रवींद्र राऊत, तालुका कृषी अधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सोना म्हणाले, पाणी हेच जीवन आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाण्याचे मोल ओळखून प्रत्येकाने अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा. तसेच योग्य त्या सूचना करून आदर्श गवासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जलयुक्त शिवार अभियानासाठीही सर्वांनी सुनियोजन करावे. त्याकरिता प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बऱ्हाटे यांनी जलयुक्त शिवार अभियानात सर्वांनी सहभाग घेऊन आधुनिक शेतीची कास धरावी. त्यातून रोजगार उपलब्ध होऊन गाव स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी सामोरे यावे, असे आवाहन केले. यावेळी भुयार, राऊत यांनी गावाच्या विकासाबाबत विचार मांडले. प्रारंभी सोना यांचे पालोती ग्रामपंचायतीतर्फे सरपंच ज्योत्सना वैरागने यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश कडू यांनी करून आभारही मानले.