शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

शिवारफेरीने जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात

By admin | Updated: January 7, 2015 22:58 IST

पाणी सार्वजनिक संपत्ती आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी पाणी अडवून जिरवण्याचे काम गावकऱ्यांनी करावे. तसेच पाण्याचा योग्य ताळेबंद बांधून संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम करावे,

वर्धा : पाणी सार्वजनिक संपत्ती आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी पाणी अडवून जिरवण्याचे काम गावकऱ्यांनी करावे. तसेच पाण्याचा योग्य ताळेबंद बांधून संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले. वर्धा तालुक्यातील पालोती गावापासून जलयुक्त शिवार अभियान २०१९ ची सुरुवात जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तहसीलदार राहुल सारंग, सरपंच ज्योत्सना वैरागने, उपसरपंच रवींद्र राऊत, तालुका कृषी अधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सोना म्हणाले, पाणी हेच जीवन आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाण्याचे मोल ओळखून प्रत्येकाने अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा. तसेच योग्य त्या सूचना करून आदर्श गवासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जलयुक्त शिवार अभियानासाठीही सर्वांनी सुनियोजन करावे. त्याकरिता प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बऱ्हाटे यांनी जलयुक्त शिवार अभियानात सर्वांनी सहभाग घेऊन आधुनिक शेतीची कास धरावी. त्यातून रोजगार उपलब्ध होऊन गाव स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी सामोरे यावे, असे आवाहन केले. यावेळी भुयार, राऊत यांनी गावाच्या विकासाबाबत विचार मांडले. प्रारंभी सोना यांचे पालोती ग्रामपंचायतीतर्फे सरपंच ज्योत्सना वैरागने यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश कडू यांनी करून आभारही मानले.