शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

शिवारफेरीने जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात

By admin | Updated: January 7, 2015 22:58 IST

पाणी सार्वजनिक संपत्ती आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी पाणी अडवून जिरवण्याचे काम गावकऱ्यांनी करावे. तसेच पाण्याचा योग्य ताळेबंद बांधून संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम करावे,

वर्धा : पाणी सार्वजनिक संपत्ती आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी पाणी अडवून जिरवण्याचे काम गावकऱ्यांनी करावे. तसेच पाण्याचा योग्य ताळेबंद बांधून संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले. वर्धा तालुक्यातील पालोती गावापासून जलयुक्त शिवार अभियान २०१९ ची सुरुवात जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, तहसीलदार राहुल सारंग, सरपंच ज्योत्सना वैरागने, उपसरपंच रवींद्र राऊत, तालुका कृषी अधिकारी आणि सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सोना म्हणाले, पाणी हेच जीवन आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पाण्याचे मोल ओळखून प्रत्येकाने अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा. तसेच योग्य त्या सूचना करून आदर्श गवासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. जलयुक्त शिवार अभियानासाठीही सर्वांनी सुनियोजन करावे. त्याकरिता प्रशासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बऱ्हाटे यांनी जलयुक्त शिवार अभियानात सर्वांनी सहभाग घेऊन आधुनिक शेतीची कास धरावी. त्यातून रोजगार उपलब्ध होऊन गाव स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी सामोरे यावे, असे आवाहन केले. यावेळी भुयार, राऊत यांनी गावाच्या विकासाबाबत विचार मांडले. प्रारंभी सोना यांचे पालोती ग्रामपंचायतीतर्फे सरपंच ज्योत्सना वैरागने यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश कडू यांनी करून आभारही मानले.