शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
8
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
11
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
12
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
13
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
14
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
15
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
16
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
17
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
18
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
19
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
20
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक

शिमग्यापर्यंत घरावर तुळशीपत्र

By admin | Updated: December 12, 2015 04:53 IST

दिवाळी सरताच ऊस तोडणाऱ्या २० ते २५ मजुरांना घेऊन त्यांचा मुखिया निघतो. हाती असेल ते धोपटी बेलनं घेऊन मालवाहू

ऊस कटाई कामगारांची व्यथा : सहा महिने घरापासून दूर असलेल्या कष्टकरी मजुरांचे वास्तवपराग मगर ल्ल वर्धादिवाळी सरताच ऊस तोडणाऱ्या २० ते २५ मजुरांना घेऊन त्यांचा मुखिया निघतो. हाती असेल ते धोपटी बेलनं घेऊन मालवाहू गाडीत ही मंडळी निघतात. म्हातारी मंडळी घरी ठेवून सोबत आळसावलेली लहान मुलं आणि हाती लागेल ती गरजेची वस्तू घेऊन प्रवास सुरू होतो. सकाळी उठणं, चार घास पोटात ढकलून दिवसभर उसाची कटाई. चार ते सहा महिने रोजचा हाच नित्यक्रम. आज या शेतात तर उद्या वेगळ्या. सोप्या शब्दात सांगायचं तर काम संपेपर्यंत ठेकेरादाचे वेठबिगार. भर थंडीतलच काम. ऊस तोडणीवर जात असलेल्या प्रत्येक परिवाराची हीच कहाणी. दुखभरी नसली तरी खुशहालही नक्कीच नाही. विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील यवतमाळ जिल्ह्यातील उस तोडणीचे काम करणारी अनेक कुटूंब सध्या वर्धा जिल्ह्यात दाखल झाली आहे. गावोगावी त्यांचे पाल दिसताहेत. होळीपर्यंत हेच चित्र. त्याच्या जीवनाचा घेतलेला हा आखोदेखा धांडोळागत काही वर्षात वर्धा जिल्ह्यात ऊसाची लागवड वाढली आहे. कापूस, सोयाबीन यांचे नुकसान भरून निघावे म्हणून ओलिताची सोय असलेले शेतकरी अर्धा ते एका एकरात ऊसाची लागवड करीत आहेत. ऊस कटाईची हातोटी अद्यापही आपल्याकडील शेतमजुरांना जमलेली नाही. त्यामुळे ऊसकटाईची जाण असलेल्या मराठवाडा भागातील तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील मजुरांची यावेळी मागणी वाढते. यातून ऊसकटाईचे गणित सुरू होते. ऊसकटाईचा सर्व खर्च उस कारखाना करीत असतो. कारखान्यामार्फत काही ठेकेदार नेमले जातात. हे ठेकेदार ऊस तोडणाऱ्या टोळीशी संपर्क साधून असतात. अश्या अनेक टोळ्यांशी बोलणी करून कटाईचे हुंडे घेतले जातात. विशेष म्हणजे, या कामगारांना मजुरीचा हुंडा हा आधीच दिला जातो. यात जमेची बाजू ही शेतकरी वर्गाला आपल्या खिशातून एकही रुपया द्यावा लागत नाही. ऊस नेण्यापासूनचा सर्व खर्च कंपनी करते. एका शेतातील ऊस तोडला की लगेच ठेकेदार घेऊन जाईल त्या शेतात ऊस तोडणी सुरू. एका एकरातील ऊस तोडायला जवळपास आठवडा लागतो. आठवडा आठवडा करीत चार ते सहा महिने निघून जातात. हाताला मिळालेली १० ते २० हजारांची मिळकत घेऊन पुढच्या हंगामाची वाट पाहात. या सहा महिन्यात अनेक अनुभव त्यांच्या गाठीशी असतात. कधी मुलाबाळांच्या तब्येती, महिलांची बाळंतपणं सारं काही याच प्रवासात. पैसे आधीच घेतलेले असतात, त्यामुळे अर्धवट काम सोडून जाताही येत नाही. या दिवसांमध्ये घरी आईवडील जगले वाचले हे बघायलाही फुरसत नाही. मुलांच्या शिक्षणाचाही खेळखंडोबा. केवळ ती सोबत आहेत एवढाच दिलासा. मुलंही शेतशिवारात आईवडिलांना पाहून पाहूनच सत्तूर चालवायला शिकतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्याही हाती लेखणीच्या जागी कालांतराने सत्तूरच दिसते. मजूर असतात दावणीला४ठेकेदार मजुरांच्या मुखियासोबत व्यवहार करीत असतो. यात अनेकदा मुखियाकडून पैसे घेऊन मजूर पळूनही जातात. अश्यावेळी ठेकेदाराच्या पैशाची वसुली होत पर्यंत इतर मजुरांना जास्तीचे काम करावे लागते. सकाळपासून उसतोडणी सुरू होते. मजूर ऊस तोडत असताना त्यांची मुलेही शेतभर हिंडत असतात. यात शेतमालक चांगले असल्यास या मुलांना काही खायला प्यायला मिळून जाते. अन्यथा सकाळपासून उपाशी असलेली ही मुलेही ऊस खाऊनच बराच बेळ घालवितात. पोटूशी असलेल्याही अनेक स्त्रिया उसतोडणीसाठी असतात. पुरुषही महिलांची काळजी घेतातच असे नाही. त्यामुळे ऊसाच्या फडातच अनेक स्त्रियांची बाळंतपणं होतात. पण आधीच पैसा घेतलेला असल्याने हातचं. कामही टाकता येत नाही. कधी घरच्या पुरुषाची तब्येत बिघडते. सर्पदंश होतो. अश्यावेळी एकट्या स्त्रीला सगळी कामे करावी लागतात. ठेकेदाराचे दावण अश्यावेळी जास्तीच घट्ट होतं. या सर्व परिस्थितीवर मात करीत हे मजूर उस तोडतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या वाट्याला जास्तीचे कष्ट असतातच. पण शेवटी त्यांच्याशिवाय जोडी तरी कशी पूर्ण होणार. जोडीनेच मजुरी४ऊस तोडणीत विशेषत्वाने असलेली गोष्ट म्हणजे येथे मजुरांची जोडी मिळून काम करीत असते. बरेचदा ही जोडी नवरा बायको किंवा बहीण भाऊ अशा स्वरूपाची असते. यामध्ये पुरुष ऊस तोडत असतो तर माहिला ऊसावरील हिरवी पानं वेगळी तोडून त्याचे भारे बांधतात. हे भारे विकण्याचा अधिकारही त्या मजुरांना असतो. त्यामुळे जितका जास्त ऊस ही जोडी तोडेल तेवढेच जास्त हिरव्या पानांचे भारे ते विकू शकतात. हिवाळ्यात त्यांना चांगली मागणीही असते. हा पैसा त्यांची वरकमाई असतो. यात ठेकेदाराचाही हस्तक्षेप नसतो. शेतमालकाचा तर नाहीच नाही. सगळा व्यवहार रोख४ठेकेदार या मजुरांना सर्व पैसा हा रोख स्वरुपात देतात. त्यामुळे तो खर्च होण्याचाच धोका जास्त असतो. अद्यापही या मजुरांचे बँक खाते नाही. त्यामुळे अनेकदा चोरीचे प्रकारही घडतात. पण अनोळखी जागा, अनोळखी लोक त्यामुळे दाद कुणाला मागणार. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर४शासनाने एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही यासाठी शिक्षण हक्क कायदा अस्तित्त्वात आणला आहे. परंतु पोटासाठी भटकत असलेल्या मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न कायम दुय्यम स्थानावर ठेवला जातो. ऊस कटाई करीत असलेल्यांची जवळपास शंभरावर मुले केवळ वर्धा तालुक्यात आजघडीला शेतात आईवडिलांसोबत भटकत आहेत. पवनार शिवारात मध्यंतरी आलेल्या एका पालावरच जवळपास १० ते १२ मुले होती. त्यांच्या अंगावर असलेले मळलेले शाळेचे गणेवेश ते कुठल्याना कुठल्या वर्गात असल्याचे सांगत होते. दरवर्षी सहा महिने ऊसकटाई कामगारांची शेकडो मुले त्यांच्यासोबत भटकत असतात. शासनापासून ही बाब लपलेली नाही. परंतु त्यांच्यासाठी कुठलीही शैक्षणिक व्यवस्था केली जात नाही. त्या मुलांना पाहून एखादा एनजीओ फोटो काढण्यापुरता त्यांना भेटी देतो. परंतु परत सगळी परिस्थिती तशीच वर्षानुवर्षे हाच प्रकार सुरू आहे. त्यामुळे ही मुले मोठी होऊन ऊस तोडणारी मजूर केव्हा बनतात हे कळतही नाही.