शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

'ती' म्हणाली पोलिसांना, 'मला आईकडे नव्हे' आजीकडे जायचे'; 'हे' होते कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 08:00 IST

Wardha news कुटुंबातील घुसमट कुटुंबातीलच बच्चेकंपनीवर विपरित परिणाम टाकतात, हे कटू सत्य आहे. अशाच काहीशा घुसमटीला वैतागून वर्धा शहरातील गिट्टी खदान भागातील एका १२ वर्षीय मुलीने रागाच्या भरात शनिवारी सकाळी घर सोडले.

ठळक मुद्देघर सोडलेल्या अल्पवयीन मुलीला २४ तासांत पोलिसांनी शोधले

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : कुटुंबातील घुसमट कुटुंबातीलच बच्चेकंपनीवर विपरित परिणाम टाकतात, हे कटू सत्य आहे. अशाच काहीशा घुसमटीला वैतागून वर्धा शहरातील गिट्टी खदान भागातील एका १२ वर्षीय मुलीने रागाच्या भरात शनिवारी सकाळी घर सोडले.

सायंकाळी उशीर झाला तरी मुलगी घरी न आल्याने कुटुंबाकडून शोध सुरू झाला. पण मुलगी न मिळाल्याने कुटुंबीयांनी अखेर शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आपले चक्र फिरवित त्या मुलीला हिंगणघाट येथून ताब्यात घेतले. ज्यावेळी या मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जात होते त्या प्रसंगी या मुलीने दबक्या आवाजात ‘मला आईकडे नव्हे तर आजीकडे जायचे’ असे पोलिसांना सांगिल्याने पोलिसांच्याही भुवया उंचावल्या.

पोलिसांनीही ही अल्पवयीन मुलगी अशी का म्हणाली याबाबत अधिकची चौकशी केली असता कुटुंबात होणाऱ्या घुसमटीमुळे ती वैतागली असल्याचे पुढे आले. अखेर त्या मुलीला शहर पोलिसांकरवी यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे तिच्या आजीकडे नेऊन सोडण्यात आले. विशेष म्हणजे या १२ वर्षीय मुलीच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तर आई रोजमजुरी करून उदरनिर्वाह करते. तर लहान भाऊ अकरा वर्षांचा आहे.

मुलीने घर सोडल्यावर ती भटकंती करीत असलाना ती तिच्या हयात नसलेल्या सावत्र वडिलांच्या नातेवाईकांना दिसून आली. त्यानंतर तिला समजवून हिंगणघाट येथे नेण्यात आले होते. सध्या ही मुलगी तिच्या आजीकडे सुखरूप असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक