शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर वर्धा जिल्ह्यातून शैलेश अग्रवाल यांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2022 20:36 IST

Nagpur News महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार मुंबई येथे प्रदेश प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी वर्धा जिल्ह्यातून शैलेश अग्रवाल यांनाही प्रदेश प्रतिनिधी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे.

अभिनय खोपडे वर्धा : काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार १९ सप्टेंबर रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रदेश प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी वर्धा जिल्ह्यातून शैलेश अग्रवाल यांनाही प्रदेश प्रतिनिधी म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे.

या बैठकीला महाराष्ट्राचे काँग्रेसचे निवडणूक अधिकारी पल्लम राजू, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीकडून प्रदेश प्रतिनिधीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी असलेले दिलीप येडतकर यांचे नाव सुचविण्यात आले होते. या नावावर अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी आक्षेप घेत काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक कमिटीचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे नोंदविला होता. त्यांचे नाव आर्वी शहरातून पाठविण्यात आले होते. त्यानंतर हे नाव रद्द करून आर्वी येथून प्रेम पालिवाल यांचे नाव घेण्यात आले व काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने अग्रवाल यांचे किसान काँग्रेसमधील राष्ट्रीय स्तरावरील काम लक्षात घेऊन त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर वर्धा जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून नाव समाविष्ट केले आहे. अग्रवाल यांच्या नावामुळे जिल्ह्यातील प्रस्थापित काँग्रेस नेत्यांना धक्का लागणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस