शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

‘सूर’ तीरावरील गावात भीषण जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

सूर नदीच्या काठावर खोदण्यात आलेल्या विहिरीतून पाण्याची उचल करून सूर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पण ज्या परिसरात पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्याच भागात वाळू माफियांकडून मनमर्जीने उत्खनन करून वाळूचा उपसा केल्या जात असल्याने या भागातील पाणी पातळी सध्या खालावली आहे. परिणामी, यंदा सूर गावातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सेलू तालुक्यातील सूर नदीच्या तीरावर वसलेल्या सूरगावात सध्या भीषण जलसंकटाने डोकेवर काढले आहे. ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी गावात नळ योजना कार्यान्वित करण्यात आली असली तरी ज्या विहिरीतून पाण्याची उचल केली जाते, त्या विहिरीची पाणी पातळी चांगलीच खालवल्याने पाणीपुरवठा योजनाही कुचकामी ठरत आहे. परिणामी, या गावातील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सूर नदीच्या काठावर खोदण्यात आलेल्या विहिरीतून पाण्याची उचल करून सूर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पण ज्या परिसरात पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्याच भागात वाळू माफियांकडून मनमर्जीने उत्खनन करून वाळूचा उपसा केल्या जात असल्याने या भागातील पाणी पातळी सध्या खालावली आहे. परिणामी, यंदा सूर गावातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास या गावातील नागरिकांना शेतशिवारातील विहिरीवरून घागर-घागर पाणी आणावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे सूरगाव परिसरातील चोरीची वाळू सेलू तसेच वर्धा शहरात मनमर्जीने चढ्या दरातच विकली जाते. मध्यंतरी सेलूच्या तहसीलदारांनी धडक कारवाई करून वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावला होता. पण सध्या पुन्हा नव्या जोमाने या परिसरात वाळू उत्खनन व वाहतुकीला उधाण आल्याचे चित्र बघावयास मिळत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष- गावात निर्माण झालेल्या कृत्रिम जलसंकटावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सूर गावातील नागरिकांची आहे. परंतु नागरिकांच्या या मागणीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या गावातील महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याप्रकरणी लक्ष देत नागरिकांची समस्या निकाली काढावी, अशी मागणी आहे.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात