शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

‘सूर’ तीरावरील गावात भीषण जलसंकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 05:00 IST

सूर नदीच्या काठावर खोदण्यात आलेल्या विहिरीतून पाण्याची उचल करून सूर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पण ज्या परिसरात पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्याच भागात वाळू माफियांकडून मनमर्जीने उत्खनन करून वाळूचा उपसा केल्या जात असल्याने या भागातील पाणी पातळी सध्या खालावली आहे. परिणामी, यंदा सूर गावातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सेलू तालुक्यातील सूर नदीच्या तीरावर वसलेल्या सूरगावात सध्या भीषण जलसंकटाने डोकेवर काढले आहे. ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यासाठी गावात नळ योजना कार्यान्वित करण्यात आली असली तरी ज्या विहिरीतून पाण्याची उचल केली जाते, त्या विहिरीची पाणी पातळी चांगलीच खालवल्याने पाणीपुरवठा योजनाही कुचकामी ठरत आहे. परिणामी, या गावातील नागरिकांना घागर-घागर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.सूर नदीच्या काठावर खोदण्यात आलेल्या विहिरीतून पाण्याची उचल करून सूर गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पण ज्या परिसरात पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्याच भागात वाळू माफियांकडून मनमर्जीने उत्खनन करून वाळूचा उपसा केल्या जात असल्याने या भागातील पाणी पातळी सध्या खालावली आहे. परिणामी, यंदा सूर गावातील नागरिकांना भीषण जलसंकटाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास या गावातील नागरिकांना शेतशिवारातील विहिरीवरून घागर-घागर पाणी आणावे लागत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे सूरगाव परिसरातील चोरीची वाळू सेलू तसेच वर्धा शहरात मनमर्जीने चढ्या दरातच विकली जाते. मध्यंतरी सेलूच्या तहसीलदारांनी धडक कारवाई करून वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावला होता. पण सध्या पुन्हा नव्या जोमाने या परिसरात वाळू उत्खनन व वाहतुकीला उधाण आल्याचे चित्र बघावयास मिळत असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढावी, अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

ग्रामपंचायत प्रशासनाचेही दुर्लक्ष- गावात निर्माण झालेल्या कृत्रिम जलसंकटावर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी सूर गावातील नागरिकांची आहे. परंतु नागरिकांच्या या मागणीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या गावातील महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याप्रकरणी लक्ष देत नागरिकांची समस्या निकाली काढावी, अशी मागणी आहे.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात