शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
3
"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
4
Samruddhi Mahamarg Accident: साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला निघाले, मृत्युने समृद्धी महामार्गावरच गाठले; दोघे ठार, तर...
5
अपमान सहन होईना! बांगलादेशचे राष्ट्रपती शहाबुद्दीन निवडणुकीनंतर पद सोडणार, युनूस सरकारवर गंभीर आरोप
6
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
7
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
8
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
9
केंद्रीय प्राधिकरणावरील अधिकारी लोकायुक्त कक्षेत; महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक मंजूर
10
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
11
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
12
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
13
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
14
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
15
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
16
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
17
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
18
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
19
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
20
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

'सेवाग्राम' जागितक पर्यटन नसून मोठा विचार, सुप्रिया सुळेंनी घेतला बापूंचा आशीर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 12:24 IST

जागतिक पर्यटनाचा दर्जा‌ सेवाग्राम आश्रमला मिळाला नाही, या विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या सेवाग्राम आश्रम हे जागतिक पर्यटन नसून मोठा विचार आहे.

वर्धा/सेवाग्राम : सेवाग्राम व पवनार आश्रमला मी दरवर्षी भेट देत असते. या ठिकाणी मला ऊर्जा मिळते, आपल्याला स्वातंत्र दिले याची जाणीव ठेवून त्यांचा तो आदर्श सर्वात मोठा आशीर्वाद समजून पुढच्या पिढीला हाच विचार पोहचविण्याचा मी प्रयत्न करते, अशी प्रांजळ कबुली राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या बुधवारी प्रसिध्द महात्मा गांधी आश्रमात भेट देण्यासाठी सकाळी ९.३२ ला आल्या होत्या.

जागतिक पर्यटनाचा दर्जा‌ सेवाग्राम आश्रमला मिळाला नाही, या विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या सेवाग्राम आश्रम हे जागतिक पर्यटन नसून मोठा विचार आहे. त्याच विचार पद्धतीने त्याकडे पाहिले पाहिजे. तो आदर्श आशीर्वाद म्हणून घेण्यासाठी याठिकाणी आले पाहिजे. बापूंनी भारतात ज्या गोष्टी केल्या आहेत, जी मूल्य दिली, ती विचार व कृतीतून घेतली पाहिजे असे पत्रकारांशी संवाद साधताना खा. सुळे यांनी म्हटले.

आश्रमात आगमन झाल्यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन.प्रभू,मंत्री चतुरा रासकर तसेच सरपंच सुजाता ताकसांडे, उपसरपंच सुनील पनत यांनी सुतमाळेने त्यांचे स्वागत केले. तर, आदी निवास, बा व बापू कुटी, आखरी निवास,बापू दप्तर,महादेव कुटीतील कापूस ते कापड या उपक्रमाची माहिती मंत्री चतुरा रासकर यांनी‌ दिली तसेच अनेक बाबींची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली.

चतुरा रासकर यांनी खादी व ग्रामोद्योग आयोग विभागीय कार्यालय नागपूर यांनी पत्र पाठविले आणि खादी प्रमाणपत्र नसल्याने ते तात्काळ बंद करण्यात यावे.प्रमाणपत्र घेण्यात यावे अशा आशयाचे पत्र आले होते.वास्तविक खादीचे उत्पादन हे गांधीजींच्या काळापासून परंपरागत चालू आहे.खादी हा विचार, मूल्य,स्वावंलबन,आर्थिक विषमता दूर करण्याचे प्रभावी साधन असल्याने आजही आश्रमात कायम आहे.पण प्रमाणपत्र घेणे सरकारचा नियम असला तरी खादी प्रमाणपत्राची सक्ती करू नये खादी असरकारी असावी असा सुरूवातीपासून विचार आहे असे आमचे म्हणणे असून या बाबत आपण प्रयत्न करावा अशी चर्चा खा.सुप्रिया सुळे यांच्याशी चतुरा बहन यांनी केली.

या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवाग्राम विकास आराखड्यातील कामाबाबत अभियंता यांनी माहिती दिली. माजी आ.राजू तिमांडे यांनी सेवाग्राम पवनारसह आजुबाजुच्या खेड्यांच्या देखील विकासाच्या दृष्टीने विचार झाला पाहिजे असे सांगितले. तर रूपेश कडू यांनी नाव सेवाग्राम विकास आराखडा पण सेवाग्राम गाव व गावातील पांदन रस्त्यांच्या विकासाचा विचार झाला पाहिजे असे सांगितले.

याप्रसंगी माजी आ.प्रा. सुरेश देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख सुबोध मोहिते, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, सुधिर कोठारी,किशोर माथनकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अभिजित फाळके, युवा जिल्हाध्यक्ष संदीप किटे, संजय काकडे, संदीप भांडवलकर, रोशन तेलंग, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा धाकटे, सुजाता फुसाटे, सेवाग्राम पोलिस स्टेशन चे निरीक्षक निलेश ब्राम्हणे,सविता कावरे,मेघाली गावंडे,विवेक लोणकर तसेच आश्रमच्या संचालिका शोभा कवाडकर, सिध्देश्वर उंबरकर, आकाश लोखंडे, विजय धुमाळे, रूपाली उगले,अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर इ.सह कार्उयकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेwardha-acवर्धाMahatma Gandhiमहात्मा गांधी