शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

सेवाग्राम विकास आराखडा; तब्बल 62 कामे पूर्णत्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

एकूण १२६ कामे केली जात असून त्यापैकी ६२ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित सर्व कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांसाठी १६० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहे. आराखड्यातील कामांमुळे सेवाग्राम, वर्धा व पवनारचा चेहरा मोहरा बदलणार असून या तीनही ठिकाणांच्या सौंदर्यात भर पडणार आहे. आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये सेवाग्राम येथे उभारण्यात आलेले चरखा सभागृह व परिसरातील महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या आकर्षक पुतळ्यांचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे १५०वे जयंती वर्ष व त्यांच्या जिल्ह्यातील आगमनास ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने शासनाने वर्धाचे सेवाग्राम व पवनारचा विकास करण्यासाठी सेवाग्राम विकास आराखडा जाहीर केला होता. या तीनही स्थळांच्या विकासासह गांधीजींच्या विचार व मूल्याचे दर्शन घडविणारे आराखड्यातील अनेक कामे पूर्ण झाले असून, उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आराखड्याचा आढावा घेऊन मार्चपर्यंत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेश माथुरकर, विद्युत वितरणचे उपअभियंता ईशान कुलकर्णी, मेडाचे जिल्हा व्यवस्थापक अभिनव कुळकर्णी, आराखड्याचे प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार निरा अडारकर, अरुण काळे, रजनीश गोरे, वसीम खान आदी उपस्थित होते. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्धा, सेवाग्राम व पवनार येथे विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहे. यामध्ये एकूण १२६ कामे केली जात असून त्यापैकी ६२ कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित सर्व कामे अंतिम टप्प्यात आहे. या कामांसाठी १६० कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहे. आराखड्यातील कामांमुळे सेवाग्राम, वर्धा व पवनारचा चेहरा मोहरा बदलणार असून या तीनही ठिकाणांच्या सौंदर्यात भर पडणार आहे. आराखड्यांतर्गत करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये सेवाग्राम येथे उभारण्यात आलेले चरखा सभागृह व परिसरातील महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या आकर्षक पुतळ्यांचा समावेश आहे. सेवाग्राम येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षक यात्री निवास उभारण्यात आले आहे. तीनही ठिकाणी रस्ते व चौकांचे सौंदर्यीकरण, धाम नदीवर सुशोभीकरण तसेच ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प उभारण्यात आले आहे.  ठिकठिकाणी भिंतीवर गांधीजींच्या कार्याची महती सांगणारे सुंदर चित्र रेखाटण्यात आले आहे. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आराखड्याचा कामनिहाय आढावा घेतला. सध्या अंतिम टप्प्यात असलेली सर्व कामे मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभाग व काम करणाऱ्या संस्थांना दिले. वर्धा, सेवाग्राम हे जागतिक कीर्तीचे स्थळ असून, पर्यटकांसाठी आराखड्यातून विविध प्रकारांच्या सुविधाही निर्माण करण्यात येत आहे. यामुळे या ठिकाणी भविष्यात पर्यटकांची संख्याही वाढणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

 

टॅग्स :Sewagramसेवाग्राम