शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गत वर्षी पीक विम्याचे कवच घेणाऱ्या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांची संख्या ३५ हजार ५९ ...

ठळक मुद्देपीक विम्याच्या पद्धतीत सुधारणेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षी पीक विम्याचे कवच घेणाऱ्या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांची संख्या ३५ हजार ५९ आहे. शिवाय मागील वर्षी गुलाबी बोंडअळी आणि निसर्गाच्या हलरीपणाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. परंतु, इफको टोकीयो जनरल इंशुरन्स कंपनीने केवळ ७७९ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी नाममात्र आर्थिक मोबदला दिला. पीक विम्याची ही पद्धत शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारी असून त्यात सुधारणा करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.वर्धा जिल्ह्यातील ५०१ बिगर कर्जदार तर ३४ हजार ५५८ कर्जदार शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विम्याचे कवच घेतले होते. विशेष म्हणजे पीक कर्ज घेणाऱ्यां प्रत्येक शेतकऱ्याला विमा काढणे आवश्यक करण्यात आले होते. मागील वर्षी सदर शेतकºयांची ६.७५ कोटी तर राज्य शासनाचा ६.२९ कोटी व केंद्र सरकारचा ६.२९ कोटींचा निधी या विमा कंपनीकडे वळता झाला.परंतु, सरते शेवटी केवळ ७७९ शेतकऱ्यांना विम्याच्या मोबदल्यासाठी पात्र ठरवित त्यांना नाममात्र ४१.१४ लाख रुपये देण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पीक विम्याच्या नावाखाली या विमा कंपनीने शेतकऱ्यांसह केंद्र व राज्य शासनाची फसवणूक केली आहे. शिवाय स्वत:ला लाभ पोहोचून घेतला आहे. त्यामुळे पीक विम्याच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. सदर निवेदन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्विकारले. या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केले. आंदोलनात महेश आगे, प्रमोद वरभे, कृष्णा गुजरकर, अनिल डफरे, गजानन सावरकर, महादेव धोपटे, विनोद क्षीरसागर, गजानन निवल, प्रविण पाल, अभय देवढे, ज्ञानेश्वर काळे, पुरुषोत्तम देवतळे, अनंत कोपरकर, गणेश तुमसरे, किशोर भोयर, अमोल आत्राम, रामेश्वर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.