शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गत वर्षी पीक विम्याचे कवच घेणाऱ्या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांची संख्या ३५ हजार ५९ ...

ठळक मुद्देपीक विम्याच्या पद्धतीत सुधारणेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गत वर्षी पीक विम्याचे कवच घेणाऱ्या जिल्ह्यातील कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांची संख्या ३५ हजार ५९ आहे. शिवाय मागील वर्षी गुलाबी बोंडअळी आणि निसर्गाच्या हलरीपणाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला. परंतु, इफको टोकीयो जनरल इंशुरन्स कंपनीने केवळ ७७९ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी नाममात्र आर्थिक मोबदला दिला. पीक विम्याची ही पद्धत शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारी असून त्यात सुधारणा करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.वर्धा जिल्ह्यातील ५०१ बिगर कर्जदार तर ३४ हजार ५५८ कर्जदार शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विम्याचे कवच घेतले होते. विशेष म्हणजे पीक कर्ज घेणाऱ्यां प्रत्येक शेतकऱ्याला विमा काढणे आवश्यक करण्यात आले होते. मागील वर्षी सदर शेतकºयांची ६.७५ कोटी तर राज्य शासनाचा ६.२९ कोटी व केंद्र सरकारचा ६.२९ कोटींचा निधी या विमा कंपनीकडे वळता झाला.परंतु, सरते शेवटी केवळ ७७९ शेतकऱ्यांना विम्याच्या मोबदल्यासाठी पात्र ठरवित त्यांना नाममात्र ४१.१४ लाख रुपये देण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पीक विम्याच्या नावाखाली या विमा कंपनीने शेतकऱ्यांसह केंद्र व राज्य शासनाची फसवणूक केली आहे. शिवाय स्वत:ला लाभ पोहोचून घेतला आहे. त्यामुळे पीक विम्याच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले. सदर निवेदन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी स्विकारले. या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी जि.प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे, कृषी मुल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केले. आंदोलनात महेश आगे, प्रमोद वरभे, कृष्णा गुजरकर, अनिल डफरे, गजानन सावरकर, महादेव धोपटे, विनोद क्षीरसागर, गजानन निवल, प्रविण पाल, अभय देवढे, ज्ञानेश्वर काळे, पुरुषोत्तम देवतळे, अनंत कोपरकर, गणेश तुमसरे, किशोर भोयर, अमोल आत्राम, रामेश्वर महाजन यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.