शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वर्धा जिल्ह्यात होणार सेरो सर्वेक्षण, महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेचा पुढाकार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2020 23:54 IST

वर्धा जिल्ह्याच्या किती लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण झाली आहे, हे या अभ्यासातून कळणार आहे. 

वर्धा :  कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये होणारी वाढ पाहता नागपूर विभागाने विभागातील सर्व जिल्ह्यांत कोरोना विषाणूच्या प्रसाराचे मूल्यांकन अभ्यास करण्याचे ठरवले आहे. वर्धा जिल्ह्यासाठी  जिल्हा आरोग्य यंत्रणा, वर्धा यांच्या सहकार्याने महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था, सेवाग्राम पुढील एक महिन्यादरम्यान हा अभ्यास करणार आहे. वर्धा जिल्ह्याच्या किती लोकसंख्येला कोरोना विषाणूची लागण झाली आहे हे या अभ्यासातुन कळणार आहे. 

एखाद्या व्यक्तीस कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यास, त्या व्यक्तीच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये विषाणूविरूद्ध लढण्यासाठी रक्तपेशी विकसित होतात आणि  कित्येक महिने ते वर्षापर्यंत त्या रक्तप्रवाहात राहतात.  रक्ताची तपासणी करून त्या व्यक्तीस यापूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता की नाही याचा  शोध घेता येतो.विषाणूविरूद्ध लढण्यासाठी रक्तपेशी आढळलेल्या व्यक्तींमध्ये कोरोना  विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी असते.  लोकसंख्येच्या सर्वेक्षणात, जास्तीत जास्त लोकांमध्ये  अशा रक्तपेशी आढळत असतील तर समुदायात कोरोना विषाणूच्या  संक्रमाणाची  शक्यता कमी असते.

सदर सर्वेक्षण सर्वसाधारण लोक, कन्टेनमेंट झोन आणि अति जोखीम गट अशा तीन गटामधून २४०० रक्ताचे नमुने घेऊन केला जाणार आहे. वर्धा येथे होणारा हा अभ्यास, सर्वसाधारण  लोक तसेच कन्टेनमेंट झोन आणि अति जोखीम गट;  उदाहरणार्थ, आरोग्य सेवेतील कर्मचारी , पोलिस, भाजी विक्रेते आणि औद्योगिक कामगार यांना यापूर्वी संसर्ग झाला की नाही या बद्दल माहिती देईल.  

या अभ्यासासाठी समुदायतुन लोक निवडून त्यांच्या रक्ताचे नमुने एका चमूद्वारे गोळा केले जातील.  संशोधन टीम निवडलेल्या भागात घरोघरी जाऊन रक्ताचे नमुने गोळा करतील. याची चाचणी विनामूल्य असेल. निकाल सहभागींना दाखवण्यात येईल; तथापि, चाचणीमधे मागील संसर्गाची स्थिती दर्शविली जाणार असल्यामुळे  पॉझिटिव्ह परिणामासाठी कोणतीही कायवाही  किंवा उपचार दिले जाणार नाही. हा अभ्यास करण्यासाठी समाजाचा पाठिंबा असणे अत्यंत आवश्यक आहे. या अभ्यासाचे निकाल  कोरोनाविरूद्ध प्रभावीपणे लढायला मदत करतील. 

 चाचणीसाठी लोकांनी सहकार्य करावे: जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यात होत असलेला हा अभ्यास लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. यावरून जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या संक्रमाना स्थिती काय आहे हे समजणार आहे. आरोग्य विभागाने निवडलेल्या भागातील नागरिकांनी न घाबरता ही चाचणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस