शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

वायगाव (नि.) येथे स्वयंघोषित लोडशेडिंग; २४ तास विजेच्या केवळ भूलथापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 17:31 IST

Vardha : शेतकऱ्यांच्या रब्बीतील पाण्याचे नियोजन बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव (नि.) : महावितरणच्यावतीने २४ तास वीजपुरवठा पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गावात गेल्या काही दिवसांपासून विरुद्ध चित्र पाहायला मिळत आहे. गावात लोडशेडिंग नसताना तासन् तास वीजपुरवठा बंद राहत असून, पुरवठा सुरळीत कधी होणार, याची माहितीही दिली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीतील पाण्याचे नियोजन बिघडले आहे. याचा फटका पिकांना फटका बसत असून, शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

येथील महावितरण विद्युत केंद्र अभियंता कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. सध्या दीपावली उत्सव चालू आहे. मात्र, अभियंत्याच्या कामचुकारपणामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

रब्बी पिकांची पेरणी शेतशिवारात अंतिम टप्प्यात असून, पिकाला पाणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, लोडशेडिंगमुळे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आलेल्या नुकसानाची भर रब्बीत भरून काढू, या आशेवर शेतकरी कामाला लागला होता. मात्र, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. वायगाव (नि.) येथे स्वयंघोषित लोडशेडिंग केले आहे. त्यात दिवसा वीजपुरवठा खंडित आणि रात्री वीज सुरू, असा प्रकार केवळ वायगाव पुरताच मर्यादित आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. जंगली जनावरांच्या दहशतीत शेतकरी ओलीत करीत असल्याचे चित्र परिसरात दिसून आले आहे. 

शेतकऱ्यांनी या संदर्भात विचारणा केली असता पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नसल्याने लोडशेडिंग करावे लागत असल्याचे बोलले जाते. मात्र, यावर स्थानिक प्रतिनिधी यावर गप्प का, असा प्रश्न वायगाव (नि.) ग्रामस्थांना पडला आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

सहा वर्षांपासून समस्या कायम वीजवाहिनीवर लोड वाढल्याने पुरवठा खंडित होते. पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नाही आहे. ही समस्या सहा वर्षांपासून आहे. हेच कारण प्रत्येक वेळी समोर केले जाते. यावर आतापर्यंत उपाययोजना का झाल्या नाही, असा प्रश्न पडला आहे.

"कुठल्याही ठिकाणी लोडशेडिंग नाही. मात्र, वायगाव (नि.) येथेच का लोडशेडिंग देण्यात येते. हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासूनचा आहे. मात्र, या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधीही काही बोलायला तयार नाही. दिवसा लोडशेडिंग आणि रात्री वीजपुरवठा, ही शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा प्रकार आहे."-प्रशांत विचूरकर, शेतकरी, वायगाव (नि.)

"लोड मॅनेज होत नाही आहे. पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नाही आहे. त्या कारणाने लोडशेडिंग करणे गरजेचे झाले आहे. मला या ऑफिसमध्ये दोन महिनेच झाले आहेत. या विषयावर वरिष्ठांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो." -विकी बडगे, अभियंता, महा. विद्युत वितरण केंद्र, वायगाव (नि.)

टॅग्स :electricityवीजwardha-acवर्धा