शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

वायगाव (नि.) येथे स्वयंघोषित लोडशेडिंग; २४ तास विजेच्या केवळ भूलथापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 17:31 IST

Vardha : शेतकऱ्यांच्या रब्बीतील पाण्याचे नियोजन बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्क वायगाव (नि.) : महावितरणच्यावतीने २४ तास वीजपुरवठा पुरविण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, गावात गेल्या काही दिवसांपासून विरुद्ध चित्र पाहायला मिळत आहे. गावात लोडशेडिंग नसताना तासन् तास वीजपुरवठा बंद राहत असून, पुरवठा सुरळीत कधी होणार, याची माहितीही दिली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या रब्बीतील पाण्याचे नियोजन बिघडले आहे. याचा फटका पिकांना फटका बसत असून, शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

येथील महावितरण विद्युत केंद्र अभियंता कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने हा प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. सध्या दीपावली उत्सव चालू आहे. मात्र, अभियंत्याच्या कामचुकारपणामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

रब्बी पिकांची पेरणी शेतशिवारात अंतिम टप्प्यात असून, पिकाला पाणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, लोडशेडिंगमुळे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आलेल्या नुकसानाची भर रब्बीत भरून काढू, या आशेवर शेतकरी कामाला लागला होता. मात्र, महावितरणच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा शेतकऱ्यांपुढे संकट उभे ठाकले आहे. वायगाव (नि.) येथे स्वयंघोषित लोडशेडिंग केले आहे. त्यात दिवसा वीजपुरवठा खंडित आणि रात्री वीज सुरू, असा प्रकार केवळ वायगाव पुरताच मर्यादित आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे. जंगली जनावरांच्या दहशतीत शेतकरी ओलीत करीत असल्याचे चित्र परिसरात दिसून आले आहे. 

शेतकऱ्यांनी या संदर्भात विचारणा केली असता पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नसल्याने लोडशेडिंग करावे लागत असल्याचे बोलले जाते. मात्र, यावर स्थानिक प्रतिनिधी यावर गप्प का, असा प्रश्न वायगाव (नि.) ग्रामस्थांना पडला आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

सहा वर्षांपासून समस्या कायम वीजवाहिनीवर लोड वाढल्याने पुरवठा खंडित होते. पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नाही आहे. ही समस्या सहा वर्षांपासून आहे. हेच कारण प्रत्येक वेळी समोर केले जाते. यावर आतापर्यंत उपाययोजना का झाल्या नाही, असा प्रश्न पडला आहे.

"कुठल्याही ठिकाणी लोडशेडिंग नाही. मात्र, वायगाव (नि.) येथेच का लोडशेडिंग देण्यात येते. हा प्रश्न गेल्या काही वर्षांपासूनचा आहे. मात्र, या विषयावर स्थानिक लोकप्रतिनिधीही काही बोलायला तयार नाही. दिवसा लोडशेडिंग आणि रात्री वीजपुरवठा, ही शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा प्रकार आहे."-प्रशांत विचूरकर, शेतकरी, वायगाव (नि.)

"लोड मॅनेज होत नाही आहे. पावर ट्रान्सफॉर्मर लोड घेत नाही आहे. त्या कारणाने लोडशेडिंग करणे गरजेचे झाले आहे. मला या ऑफिसमध्ये दोन महिनेच झाले आहेत. या विषयावर वरिष्ठांसोबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो." -विकी बडगे, अभियंता, महा. विद्युत वितरण केंद्र, वायगाव (नि.)

टॅग्स :electricityवीजwardha-acवर्धा