शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सुरक्षा रक्षकांची अर्थकोंडी; चार महिन्यांपासून वेतन नाही, झेडपीतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:53 IST

Wardha : प्रयस्त संस्थेकडून नियुक्ती, कंत्राटदार संस्थेकडून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मिनी मंत्रालयाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्रयस्त संस्थेच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण, या सुरक्षा रक्षकांना गेल्या चार महिन्यांपासून वेतनच मिळाले नसल्याने त्यांची अर्थकोंडी झाली आहे. वारंवार तक्रार करूनही यासंदर्भात गांभीर्याने घेतले जात नसल्याने उपाशीपोटी काम किती दिवस करावे, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्हा परिषदेत प्रशासक असून सर्वाधिकार अधिकाऱ्यांकडेच आहे. सुरक्षा रक्षकांच्या समस्याही सोडविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगण्यात आले आहे. येथे १३ सुरक्षा रक्षक असून, त्यांची नियुक्ती अमरावती येथील कंत्राटदार संस्थेमार्फत करण्यात आली आहे. त्यांना ऑक्टोबर महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने सुरक्षा रक्षकांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण अद्यापही त्यांचा प्रश्न निकाली निघाला नाही. चार महिन्यांपासून वेतन नसल्याने आता उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. कंत्राटदार कंपनीकडून नेहमीच वेतनासाठी विलंब होत असल्याने 'न्याय मागावा कुणाकडे', अशी परिस्थिती सुरक्षा रक्षकांची झाली आहे.

वेतनातूनही मागतात म्हणे रक्कमयेथील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती ही त्रयस्त संस्थेच्या माध्यमातून झाली आहे. त्यामुळे त्यांना वेतनही त्याच संस्थेच्या माध्यमातून दिले जाते. सुरक्षा रक्षकांच्या खात्यावर १६ हजार रुपये वेतन जमा केल्यानंतर त्यांच्याकडून तीन ते साडेतीन हजार रुपये परत मागविले जात असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे यातील सत्यता काय, याचा शोध घेऊन कंत्राटदार संस्थेवर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

१६ हजार रुपयेच मिळतात दरमहा वेतन, तेही अनियमितच...सुरक्षा रक्षकांना कंत्राटदार संस्थेकडून दरमहा १६ हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहे. पण, तेही अनियमित असल्याने सुरक्षा रक्षकांची आर्थिक कोंडी होत आहेत.

भविष्य निर्वाह निधीचा हप्ताही थकविल्याचा आरोपजिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षक पुरविण्याचा कंत्राट अमरावतील येथील प्रबुद्ध सहकारी संस्थेकडे असल्याचे सांगण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून १३ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना अकरा महिन्यांचा ऑर्डर दिला जात असून, हे सुरक्षा रक्षक अनेक दिवसांपासून कार्यरत आहे. त्यांच्या वेतनातून भविष्य निर्वाह निधीचा हप्ता कापल्यानंतर संस्थेनेही तेवढीच रक्कम जमा करणे गरजेचे आहे. पण, संस्थेकडून अद्यापही हप्ता भरला नसल्याचेही सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात आले आहे.

...तर काळ्या यादीत टाकणार का?अयस्त कंत्राटदार कंपनीकडून नेहमीच कामगारांच्या वेतनाबाबत विलंब केला जातो. यापूर्वीही जिल्हा परिषदेतील सुरक्षा रक्षकांचे एका कंत्राटदार कंपनीने वेतन थकविले होते. याची तक्रार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे करण्यात आली होती. त्यांनी लागलीच कंत्राटदार कंपनीला बोलावून सुरक्षा रक्षकाचे वेतन करून घेत त्याला काळ्या यादीत टाकले होते. आता जर ही कंत्राटार संस्था वेतन करण्यास विलंब करीत असेल, तर काळ्या यादीत टाकणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

"जिल्हा परिषदेतील सुरक्षा रक्षकांची नियुक्ती ही अमरावती येथील संस्थेमार्फत करण्यात आली आहे. त्यांचा भविष्य निर्वाह निधीचा हप्ता आणि वेतन थकविल्याबाबतची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीच्या अनुषंगाने संस्थेची चर्चा करण्यात आली. त्यांनी भविष्य निर्वाह निधीचा हप्ता जमा केला असून, लवकरच सुरक्षा रक्षकांच्या वेतनाची रक्कमही त्यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले."- अमोल भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

टॅग्स :wardha-pcवर्धाzpजिल्हा परिषद