शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शहरातील २२ प्रतिष्ठाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७, १३ मार्च पासून लागू करण्यात आला आहे. त्यातील खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार जिल्ह्यात १४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन : महसूल व पोलीस प्रशासनची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तुंच्या प्रतिष्ठानांमध्ये सोशल डिस्टंन्सिगसह प्रशासनाने सूचविलेल्या उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वर्ध्यातील तब्बल २२ प्रतिष्ठांना सील ठोकले. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून आता इतर दुकानदारांनीही प्रशासनाच्या उपाययोजनांचे काटेकारपणे पालन करायला सुरुवात केली आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७, १३ मार्च पासून लागू करण्यात आला आहे. त्यातील खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या पत्रानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ नुसार जिल्ह्यात १४ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत बाजारोतील किराणा दुकाने, इतर जीवनावश्यक वस्तू, दूध, भाजीपाला व औषधी दुकाने ठराविक वेळेकरिता सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. या दुकानदारांनी गर्दी टाळण्याकरिता दुकानात सोशल डिस्टन्सिंग, हॅन्ड वॉशची सुविधा व कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाय योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दुकानदारांना दिले होते. मात्र, दुकानदारांकडून या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्याने वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी संबंधित दुकानदारांवर दंडात्मक किंवा आवश्यकता असल्यास सील करण्याच्या सूचना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप व नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांनी आपल्या पथकांसह शहरातील दुकानांची पाहणी करुन २२ दुकानांना सील ठोकले आहे. या कारवाईने अनेकांनी धसका घेतला.यांच्यावर झाली कारवाईपोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने बुधवारी दिवसभर शहरातील विविध भागात जात प्रतिष्ठानांवर कारवाई केली. यादरम्यान सिंदी लाईन परिसरातील प्रताप ट्रेडर्स, तरुण ट्रेडर्स, कनफेक्शनरी, महेंद्र ट्रेडर्स, भगवान ट्रेडर्स, डी.के. ट्रेडर्स, राजकला टॉकीज रोडलगतच्या मालगुडी किराणा भंडार, अपना स्टोअर्स यांच्यासह निर्मल बेकरी लगतचे छगनलाल जयचंद गांधी किराणा स्टोअर्स, दोशी ब्रदर्स, पूजा टायर व बाईक सर्विसिंग सेंटर, साई आॅथटिक अ‍ॅण्ड प्रास्थेटिक सेंटर, मनजीत सुपर शॉपी, हरीष गोपाल जनरल स्टोअर्स, एच.आर.ए.चीनी, शिव मार्केटिंग, एस.गुप्ता अनाज विके्रता, साई रिवार्इंडींग वर्क्स, ओम प्रोव्हिजन स्टोअर्स, ओम साई मोबाईल शॉपी व होलाराम पाचोळ तेल दुकान या प्रतिष्ठानांची पाहणी केली असता तेथे उपाययोजनांचा अभाव दिसल्याने सील ठोकण्यात आले.सेलूत डॉक्टरला पाच हजारांचा दंड, डॉक्टरकडून कारवाईवर आक्षेपसेलू : येथील डॉ. राजेंद्र त्रिवेदी यांच्या दवाखान्याला तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी मंगळवारला भेट दिली असता हात स्वच्छ धुण्यासाठी सॅनिटायझर ऐवजी यापेक्षा महागडे स्ट्रेरिलियम हे जंतुनाशक असताना त्यांना पाच हजारांच्या दंडाची पावती देण्यात आली. मुख्याधिकारी व तहसीलदार यांना वैद्यकीय व्यवसायातील माहिती नसते त्यामुळे त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना या जंतुनाशकाबाबत खात्री करून दंड आकारणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी डॉक्टरांचे म्हणणे ऐकून न घेता सरळ दंडात्मक कारवाई केल्याचा आरोप डॉ. त्रिवेदी यांनी केला आहे. वैद्यकीय अधिकारी जर मी वापरलेले जंतुनाशक वापरणे चुकीचे आहे,असे म्हणत असतील तर मी दंडाची रक्कम भरण्यास तयार असल्याचा खुलासा डॉ. त्रिवेदी यांनी केला आहे. यापूर्वी सेलू नगरपंचायतीच्या वतीने एका डॉक्टराला सॅनिटायझर ठेवले नाही म्हणून १८० रुपये दंड करण्यात आला मात्र सॅनिटायझर ऐवजी दुसरे जंतुनाशक असताना पाच हजारांचा दंड करण्यामागील विसंगतीही विचार करायला लावणारी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस