शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

हुतात्मा स्मारकाच्या अस्तित्वावर ओरखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

चलेजाव आंदोलनाच्या चळवळीच्या बंडाळीत आष्टी, खरांगणा मोरांगणा , आर्वी परिसराचेही मोठे योगदान होते. या चळवळीत अनेकांना हौतात्म्य आले. त्यांच्या स्मरणार्थ आर्वीत पाच महत्त्वाच्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी अक्षय वट लावण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी लावलेले हे वटवृक्ष आजही स्वातंत्र्यकाळाचे साक्षीदार म्हणून डौलाने उभे आहेत.

ठळक मुद्देभंगाराने घातलाय विळखा : कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित; प्रशासनाची उदासीनता

राजेश सोळंकी।लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : चलेजाव आंदोलनाच्या साक्षीदार असलेल्या हुतात्म्यांच्या स्मारकास अनेक वर्षांपासून भंगाराने विळखा घातला असून स्मारकाची पडझड झाली आहे. आर्वीतील नेते, समाजसेवक, शासकीय अधिकारी, नगर पालिका प्रशासनाची याकडे डोळेझाक होत असल्याने माणुसकीचा झराही आटू लागला की काय, असे वाटू लागले आहे.चलेजाव आंदोलनाच्या चळवळीच्या बंडाळीत आष्टी, खरांगणा मोरांगणा , आर्वी परिसराचेही मोठे योगदान होते. या चळवळीत अनेकांना हौतात्म्य आले. त्यांच्या स्मरणार्थ आर्वीत पाच महत्त्वाच्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी अक्षय वट लावण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी लावलेले हे वटवृक्ष आजही स्वातंत्र्यकाळाचे साक्षीदार म्हणून डौलाने उभे आहेत. लकडगंज परिसर, तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, गणपती वॉर्डातील घोड्याच्या मंदिराजवळ आणि एक कसबा येथे हे अक्षय वट लावण्यात आले होते. त्यानंतर लकडगंज येथील या अक्षयवृक्षाखाली चलेजाव चळवळीतील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ स्मारकही बांधण्यात आले होते.या स्मारकाची काही वर्षे निगा राखण्यात आली. कालांतराने दुर्लक्ष करण्यात आले. आता अनेक वर्षांपासून भंगाराचा व्यवसाय करणाऱ्या एकाने परिसर ताब्यात घेतला.एवढेच नव्हे, तर स्मारकाच्या संरक्षण भिंतीच्या आतही मोठ्या प्रमाणात भंगार अस्ताव्यस्त पडलेले आहे. स्मारकाची मोडतोड झाली आहे. या स्मारकाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आणून दिल्यावर संरक्षण भिंत बांधण्यात आली होती. त्यानंतर या बाबीकडे सातत्याने दुर्लक्ष होत गेले आणि या हुतात्मा स्मारकास भंगाराचा विळखा अधिकच घट्ट होत गेला.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण