शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

चाचणी करून पेरा करा

By admin | Updated: June 4, 2014 00:13 IST

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे एक लक्ष पाच हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.. विविध कंपन्याद्वारे ५५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध झाले असल्याची माहिती

एक लक्ष क्विंटल बियाणे : गायकवाड यांचा शेतकर्‍यांना सल्लावर्धा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे एक लक्ष पाच हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.. विविध कंपन्याद्वारे ५५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध झाले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी आर.के.गायकवाड यांनी दिली.बियाणे उपलब्ध होण्यापूर्वी बियाण्याचे कंपनीमार्फत उगवण क्षमतेची चाचणी केल्या जाते व चाचणीमध्ये प्रमाणित झाल्यानंतरच सदर बियाणे विक्रीकरिता उपलब्ध होते.; परंतु आपल्याकडे घरचे बियाणे उपलब्ध नसल्यास कृषी केंद्रांमध्ये उपलब्ध असलेले सोयाबीचे बियाणे खरेदी करावे; परंतु सदर बियाणे वाहतुकीमुळे व इतर कारणाने हाताळतांना उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विकत घेतलेल्या बियाण्याची सुद्धा उगवण क्षमता तपासून व बिज प्रक्रीया करून सोयाबीन बियाण्याची पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून  कृषी विस्तार अधिकार्‍यांनी पत्रकातून दिला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेकर्‍यांचे नुकसान होवू नये म्हणून सुरू वर्षी सोयाबीनची पेरणी करतांना सोयाबीन पिकामध्ये शेतकर्‍यांनी सहा ओळी नंतर एक ओळ तूर या प्रमाणे आंतरपिक घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे एकतरी पीक शेतकर्‍यांच्या हाती लागेल असे कृषी विभागाचे म्हणने आहे.(प्रतिनिधी)सोयाबीन पेरतांना घ्यावयाची काळजी शेकर्‍यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याचा वापर पेरणीकरिता करावा. त्यामुळे शेतकर्‍यांचे सोयाबीन  बियाणे खरेदीवरील खर्च कमी होईल. सोयाबीनमधील सर्वच वाण हे सरळ वाण आहे. त्यामुळे अशा वाणाचे बियाणे प्रत्येक वर्षी बदल करण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे दोन ते तीन वर्षांपर्यंत वापरता येतात; परंतु घरच्या बियाण्याची पेरणी पूर्व उगवण क्षमतेची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या उगवण क्षमतेची खात्री पटू शकते व पेरणी करताना बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज सुद्धा काढता येतो.