शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

चाचणी करून पेरा करा

By admin | Updated: June 4, 2014 00:13 IST

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे एक लक्ष पाच हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.. विविध कंपन्याद्वारे ५५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध झाले असल्याची माहिती

एक लक्ष क्विंटल बियाणे : गायकवाड यांचा शेतकर्‍यांना सल्लावर्धा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सोयाबीनचे एक लक्ष पाच हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे.. विविध कंपन्याद्वारे ५५ हजार क्विंटल सोयाबीन बियाणे कृषी केंद्रामार्फत उपलब्ध झाले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी आर.के.गायकवाड यांनी दिली.बियाणे उपलब्ध होण्यापूर्वी बियाण्याचे कंपनीमार्फत उगवण क्षमतेची चाचणी केल्या जाते व चाचणीमध्ये प्रमाणित झाल्यानंतरच सदर बियाणे विक्रीकरिता उपलब्ध होते.; परंतु आपल्याकडे घरचे बियाणे उपलब्ध नसल्यास कृषी केंद्रांमध्ये उपलब्ध असलेले सोयाबीचे बियाणे खरेदी करावे; परंतु सदर बियाणे वाहतुकीमुळे व इतर कारणाने हाताळतांना उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विकत घेतलेल्या बियाण्याची सुद्धा उगवण क्षमता तपासून व बिज प्रक्रीया करून सोयाबीन बियाण्याची पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून  कृषी विस्तार अधिकार्‍यांनी पत्रकातून दिला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेकर्‍यांचे नुकसान होवू नये म्हणून सुरू वर्षी सोयाबीनची पेरणी करतांना सोयाबीन पिकामध्ये शेतकर्‍यांनी सहा ओळी नंतर एक ओळ तूर या प्रमाणे आंतरपिक घेण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. त्यामुळे एकतरी पीक शेतकर्‍यांच्या हाती लागेल असे कृषी विभागाचे म्हणने आहे.(प्रतिनिधी)सोयाबीन पेरतांना घ्यावयाची काळजी शेकर्‍यांनी स्वत:कडे उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याचा वापर पेरणीकरिता करावा. त्यामुळे शेतकर्‍यांचे सोयाबीन  बियाणे खरेदीवरील खर्च कमी होईल. सोयाबीनमधील सर्वच वाण हे सरळ वाण आहे. त्यामुळे अशा वाणाचे बियाणे प्रत्येक वर्षी बदल करण्याची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे दोन ते तीन वर्षांपर्यंत वापरता येतात; परंतु घरच्या बियाण्याची पेरणी पूर्व उगवण क्षमतेची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे चांगल्या उगवण क्षमतेची खात्री पटू शकते व पेरणी करताना बियाण्याचे प्रमाण किती ठेवावे याचा अंदाज सुद्धा काढता येतो.