शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

नागरिक घडविण्यासाठी शाळा संस्कारक्षम हव्या!

By admin | Updated: December 16, 2015 02:16 IST

देश घडविण्यासाठी उत्तम नागरिकांची गरज असते. शाळा संस्कारमय करण्याकडे विशेष लक्ष याच कारणांनी द्यावे लागते.

जयवंत मठकर : सेवाग्राम आश्रम व जि.प.तर्फे कथाकथन प्रशिक्षण शिबिरसेवाग्राम : देश घडविण्यासाठी उत्तम नागरिकांची गरज असते. शाळा संस्कारमय करण्याकडे विशेष लक्ष याच कारणांनी द्यावे लागते. संस्थेनी प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून शिबिर हा यातीलच एक भाग आहे, असे विचार सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जयवंत मठकर यांनी व्यक्त केले. आश्रम परिसरात प्राथमिक शिक्षकांसाठी कथाकथन प्रशिक्षण शिबिर जयवंत मठकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. शिबिराचे उद्घाटन जि. प. शिक्षण सभापती मिलिंद भेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक शिक्षाधिकारी धनराज तेलंग, मार्गदर्शक प्रा. डॉ. दिलीप गरुड, मंत्री प्रा. डॉ. श्रीराम जाधव व अधीक्षक भावेष चव्हाण यावेळी उपस्थित होते. मिलिंद भेंडे म्हणाले, जि. प. शाळेच्या शिक्षकांसाठी असलेला कथाकथनाचा उपक्रम नाविण्यपूर्ण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेचा घटक असल्याने कथेच्या माध्यमातून संस्कार शाळेविषयी आणि विषयाबाबत गोडी निर्माण होवू शकते. कथेतून अपेक्षित परिणाम साध्य करता येतो असेही ते म्हणाले. तसेच हे तंत्र विद्यार्थ्यांसाठी अतिशय सोपे असल्याचेही त्यांनी सांगितले. तेलंग म्हणाले, आश्रम व जि.प. यांच्या विद्यमाने शिबिराचे आयोजन करून शिक्षकांना चांगली संधी निर्माण करून दिली आहे. कथाकथन तंत्राचे कौशल्य आत्मसात करून विद्यार्थ्यांना लाभांवित करावे. श्रीराम जाधव म्हणाले, सेवाग्राम ही गांधीजींची कर्मभूमी आहे. स्वतंत्र्य चळवळीचे रचनात्मक कार्य याच भूमितून करून देशाला स्वातंत्र्य आणि उपक्रमाची देण दिली. हा उपक्रमही शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती घडवेल असे ते यावेळी म्हणाले. प्रा. दिलीप गरुड यांंनी कथाकथन कसे करावे, याविषयाची मांडणी, अध्ययन, टिपणे, समयसूचकता, सराव, प्रसंग, थोरा मोठ्यांची माहिती इ. वर माहिती देवून मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व संचालन भावेष चव्हाण यांनी केले. राजू चौरेवार, चंद्रशेखर कोकटे, सवाती नगराळे यांनी कथाकथन प्रशिक्षण अनुभव कथन केले. यात्री निवास मध्ये प्रा. डॉ. दिलीप गरुड यांच्या गावातील लहान मुलांसाठी कथाकथनाचा कार्यक्रम झाला. या प्रसंगी जयवंत मठकर, प्रा. डॉ. श्रीराम जाधव, दारुबंदी महिला मंडळ व तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष गीता कुमरे व पंचफुला सहारे उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी रुपेश कडू यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)