शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

गरीब लाभार्थ्यांना धान्य वाटपाची योजना अंधातरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:00 IST

संचारबंदीच्या लॉकडाऊनमध्ये समाजातील गरीब व गरजू अन्नधान्यापासून वंचित व उपाशी राहू नये यासाठी ज्या लोकांजवळ शिधापत्रिका आहे, परंतु धान्य मिळत नाही तसेच ज्या कुटुंबीयांकडे शिधापत्रिका नाही व त्यांना धान्याची गरज आहे, अशांचा या याद्यांमध्ये समावेश करण्यात आला. या सर्व घडामोडीला चार दिवसांचा अवधी होऊन गेला. अद्याप जिल्हास्तरावर याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने योजनेबाबत अनिश्चितता वाढली आहे. शासन म्हणून पालकमंत्री यांचा धोरणात्मक निर्णय हवेत विरणार का, असे बोलले जात आहे.

ठळक मुद्देशासनाच्या धोरणात्मक निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : कोरोनाच्या संक्रमणात सर्वांना धान्य मिळणार असल्याची भूमिका जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी आढावा बैठकीत बोलून दाखविली. नव्हे, तर जिल्हाधिकारी यांनी तशा प्रकारचे आदेश काढून शासनाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे गरजू लाभार्थ्यांच्या याद्या मागविण्यात आल्या. संचारबंदीच्या लॉकडाऊनमध्ये समाजातील गरीब व गरजू अन्नधान्यापासून वंचित व उपाशी राहू नये यासाठी ज्या लोकांजवळ शिधापत्रिका आहे, परंतु धान्य मिळत नाही तसेच ज्या कुटुंबीयांकडे शिधापत्रिका नाही व त्यांना धान्याची गरज आहे, अशांचा या याद्यांमध्ये समावेश करण्यात आला. या सर्व घडामोडीला चार दिवसांचा अवधी होऊन गेला. अद्याप जिल्हास्तरावर याबाबत कोणत्याही हालचाली नसल्याने योजनेबाबत अनिश्चितता वाढली आहे. शासन म्हणून पालकमंत्री यांचा धोरणात्मक निर्णय हवेत विरणार का, असे बोलले जात आहे.कोरोनाच्या संकटात शासनाने शिधापत्रिकेवर तीन महिन्यांचे धान्य देण्याचे धोरण ठरविले आहे. त्यानुसार जुलै महिन्याचे धान्य वाटप केले जात आहे. यामध्ये प्रतिमाणसी पाच किलो याप्रमाणे पंतप्रधान योजनेतील विनामूल्य तांदळाचा समावेश आहे. नेहमीचे बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच धान्याचे वाटप केले जात आहे. यामध्ये नव्याने याद्या तयार केलेले गरजू लाभार्थी या पासून वंचित ठरले आहे. या लाभार्थ्यांत पांढरी शिधापत्रिकाधारक ९०८, केसरीधारक २००२ ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही; परंतु धान्याची आवश्यकता असलेल्या २,१४९ कुटुंबांचा समावेश आहे. या कुटुंबात एकूण सात हजार व्यक्तींचा समावेश असून ही यादी शासनाकडे पाठविण्यात आली आहे. ही यादी ऐनवेळेवर ग्रामीण व शहरी भागातील लोकप्रतिनिधींकडून घेण्यात आल्याने क्रॉक चेकिंगचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.गरजू लाभार्थ्यांच्या याद्या बनवून शासनाने त्यांना अन्नधान्याबाबत आशेचा किरण दाखविला आहे. त्यामुळे अशा अडचणीच्या वेळी ते लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित ठरू नये यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Socialसामाजिक