शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्तांचे प्राण वाचवा; पुरस्कार मिळवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला असून तत्काळ मदत पोहचवून जीव वाचविणाऱ्याला पुरस्कृत केले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच आरटीओ यांचा समावेश राहणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रुग्णालयात पोहचविणाऱ्यांना जिल्हास्तरावर पाच हजार रुपये तर राज्यभरातील दहा जणांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कार दिल्या जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य परिवहन आयुक्तांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाला तसे निर्देशही दिल्याची माहिती आहे. या उपक्रमामुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यास नक्कीच मदत मिळेल हे मात्र तितकेच खरे. शहरासह जिल्ह्यातील विविध गावांतून जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच महामार्गावरील होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस आणि वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविले जातात. सर्वात जास्त अपघात हे महामार्गावर होत असून अनेकांना नाहक जीव गमवावा लागतो. मात्र, आता अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्यांना राज्य आणि जिल्हा स्तरावर रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ मदत पोहचविण्यासाठी मृत्यूंजय दूताचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच महामार्ग पोलिसांकडून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचे कामही सुरु असून अपघात रोखण्यासाठी मदत होत आहे. 

८६ जणांचा बळी रस्ते अपघातात

जानेवारी ते  एप्रिल या चार महिन्यांत ७२ जीवघेणे अपघात झाले असून अपघातात तब्बल ८६ जणांचा नाहक बळी गेल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर १४३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अनेकांना वेळेवर मदत न मिळाल्याने जीव गेला.

जिल्हास्तरावर पाच हजार, सन्मानचिन्ह -  अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रुग्णालयात पोहचविल्यास त्या नागरिकाला जिल्हास्तरावर पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह  देण्यात येणार आहे. -  महामार्गावर मृत्यूंजय दूतांकडून ही अपघातग्रस्तांना तत्काळ मदत पोहचविण्याचे कार्य सुरु आहे.

राज्य स्तरावर दहा जणांना लाखाचा पुरस्कार-  अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहचवून रुग्णालयात पाठवून मदत करणाऱ्याला राज्यस्तरावर ही पुरस्कृत केले जाणार आहे. -  राज्यातील दहा जणांची निवड करुन त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.  यामुळे अपघातग्रस्तांचा जीव वाचण्यास एकप्रकारे मदत मिळणार हे मात्र तितकेच खरे.

जिल्हास्तरीय समित्या नेमण्याचे निर्देश

अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला असून तत्काळ मदत पोहचवून जीव वाचविणाऱ्याला पुरस्कृत केले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच आरटीओ यांचा समावेश राहणार आहे. 

परिवहन आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे स्वागत आहे. अद्याप वाहतूक विभागाकडे  कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही.मात्र, अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्यांना पुरस्कार देणे हा चांगला निर्णय असून  जीव जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. - रवींद्र रेवतकर, एपीआय. वाहतूक. 

 

टॅग्स :Accidentअपघात