शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

अपघातग्रस्तांचे प्राण वाचवा; पुरस्कार मिळवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला असून तत्काळ मदत पोहचवून जीव वाचविणाऱ्याला पुरस्कृत केले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच आरटीओ यांचा समावेश राहणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रुग्णालयात पोहचविणाऱ्यांना जिल्हास्तरावर पाच हजार रुपये तर राज्यभरातील दहा जणांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा पुरस्कार दिल्या जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे निर्देश राज्य परिवहन आयुक्तांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाला तसे निर्देशही दिल्याची माहिती आहे. या उपक्रमामुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचविण्यास नक्कीच मदत मिळेल हे मात्र तितकेच खरे. शहरासह जिल्ह्यातील विविध गावांतून जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच महामार्गावरील होणारे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलीस आणि वाहतूक नियंत्रण पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविले जातात. सर्वात जास्त अपघात हे महामार्गावर होत असून अनेकांना नाहक जीव गमवावा लागतो. मात्र, आता अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्यांना राज्य आणि जिल्हा स्तरावर रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महामार्गावर अपघात रोखण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ मदत पोहचविण्यासाठी मृत्यूंजय दूताचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच महामार्ग पोलिसांकडून नागरिकांना वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचे कामही सुरु असून अपघात रोखण्यासाठी मदत होत आहे. 

८६ जणांचा बळी रस्ते अपघातात

जानेवारी ते  एप्रिल या चार महिन्यांत ७२ जीवघेणे अपघात झाले असून अपघातात तब्बल ८६ जणांचा नाहक बळी गेल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर १४३ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अनेकांना वेळेवर मदत न मिळाल्याने जीव गेला.

जिल्हास्तरावर पाच हजार, सन्मानचिन्ह -  अपघातात जखमी झालेल्यांना वेळेत रुग्णालयात पोहचविल्यास त्या नागरिकाला जिल्हास्तरावर पाच हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह  देण्यात येणार आहे. -  महामार्गावर मृत्यूंजय दूतांकडून ही अपघातग्रस्तांना तत्काळ मदत पोहचविण्याचे कार्य सुरु आहे.

राज्य स्तरावर दहा जणांना लाखाचा पुरस्कार-  अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहचवून रुग्णालयात पाठवून मदत करणाऱ्याला राज्यस्तरावर ही पुरस्कृत केले जाणार आहे. -  राज्यातील दहा जणांची निवड करुन त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.  यामुळे अपघातग्रस्तांचा जीव वाचण्यास एकप्रकारे मदत मिळणार हे मात्र तितकेच खरे.

जिल्हास्तरीय समित्या नेमण्याचे निर्देश

अपघातग्रस्तांचा जीव वाचविण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला असून तत्काळ मदत पोहचवून जीव वाचविणाऱ्याला पुरस्कृत केले जाणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या समितीत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी तसेच आरटीओ यांचा समावेश राहणार आहे. 

परिवहन आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे स्वागत आहे. अद्याप वाहतूक विभागाकडे  कुठलेही पत्र प्राप्त झाले नाही.मात्र, अपघातग्रस्तांचे प्राण वाचविणाऱ्यांना पुरस्कार देणे हा चांगला निर्णय असून  जीव जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. - रवींद्र रेवतकर, एपीआय. वाहतूक. 

 

टॅग्स :Accidentअपघात