शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

 सत्यनारायण पूजा साहित्याच्या विसर्जनासाठी गेले होते नदीवर; पत्नीपाठोपाठ पतीलाही जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 18:36 IST

Wardha News सत्यनारायणाच्या पूजेतील साहित्य धाम नदीपात्रात विसर्जित करताना पत्नी पाण्यात बुडाली, तिला वाचविण्यासाठी पतीनेही पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

वर्धा : सत्यनारायणाच्या पूजेतील साहित्य धाम नदीपात्रात विसर्जित करताना पत्नी पाण्यात बुडाली, तिला वाचविण्यासाठी पतीनेही पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास साकुर्ली धानोली येथे घडली. दोघांचेही मृतदेह सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास नदीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेने तरोडा गावात शोककळा पसरली आहे. आत्माराम कृष्णा बोरकर (५५), कुंदा आत्माराम बोरकर (४५) दोन्ही रा. तरोडा, अशी मृतांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, आत्माराम यांच्या मुलाचे सात ते आठ दिवसापूर्वी लग्न झाले. त्यानिमित्त त्यांनी घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती. पूजेतील साहित्य विसर्जित करण्यासाठी आत्माराम आणि त्यांची पत्नी साकुर्ली येथील धाम नदीवर गेले होते. पूजेचे साहित्य नदीपात्रात विसर्जित करीत असताना पत्नीचा पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. पत्नीला पाण्यात बुडताना पाहून पती आत्माराम तिला बाहेर काढण्यासाठी धडपड करू लागला. पण, कुणीच मदतीला न धावल्याने आत्मारामने थेट नदीपात्रात उडी घेतली. दोघांनाही पोहता येत नसल्याने तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने पतीपत्नी दोघेही नदीत बुडाले.

घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट येथील पोलीस निरीक्षक के. एम. पुंडकर, संदीप मेंढे, विजय काळे यांनी घटनास्थळी जाऊन सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. दोन्ही मृतदेह हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. या घटनेने तरोडा गावात शाेकाकुल वातावरण पसरले होते.

टॅग्स :Deathमृत्यू