शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

परचुरे शास्त्रींचा साबरमती ते सेवाग्रामपर्यतचा सत्याग्रही प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

संस्कृत तसेच वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही परचुरे शास्त्री यांनी कारावासही भोगला होता. त्यांचे ५ स्पटेंबर १९४५ रोजी दत्तपूर येथे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. यावर्षी त्यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी होत आहे.

ठळक मुद्देआज ७४ वी पुण्यतिथी : महात्मा गांधींसोबत स्वातंत्र्य चळवळीत होता सहभाग, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात गाठले सेवाग्राम

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्रामच्या भूमीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून यात अनेकांचे योगदानही आहे. यामध्ये महात्मा गांधीसोबत स्वातंत्र्य चळवळीत साबरमती ते सेवाग्राम असा प्रवास करणारे परचुरे शास्त्री हे सुद्धा एक होते. त्यांची आज ७४ वी पुण्यतिथी या आश्रमात साजरी केली जाणार असून आश्रम परिसरातील त्यांच्या कुटीतून आजही स्मृतींचा उजाळा मिळतो.संस्कृत तसेच वेदशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही परचुरे शास्त्री यांनी कारावासही भोगला होता. त्यांचे ५ स्पटेंबर १९४५ रोजी दत्तपूर येथे वयाच्या ५७ व्या वर्षी निधन झाले. यावर्षी त्यांची ७४ वी पुण्यतिथी साजरी होत आहे. बापू कुटी परिसरातील त्यांची परचुरे कुटी आताही अभ्यासकांना विचाराचे बळ देतात. परचुरे शास्त्री या नावातच विद्वतेचे धनी असल्याचे ज्ञान आपल्याला होते. त्यांचे ज्ञान, योगदान आणि कार्य पाहता आपोआपच आपले मस्तक श्रद्धेने झुकल्याशिवाय राहत नाही. साबरमती आश्रमात ते गांधीजीसोबत कार्य करायचे. अशातच त्यांना कुष्ठरोग झाल्याने आश्रमातच त्यांची वेगळी व्यवस्था करून देण्यात आली. पण, दैनिक कार्य मात्र त्यांनी कधीच टाळले नाही. साबरमती आश्रमचे विसर्जन केल्यानंतर ते महाराष्ट्रात परत आले.शास्त्रीजी वेदशास्त्र संपन्न गृहस्थ होते.ज्ञानाचा प्रभाव त्यांच्या जीवनातून दिसून येत असे. ज्ञानी माणूस आपल्या जीवनात नेहमीच अन्यायाशी लढण्यास सदैव तयार असतो. शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर परिणाम करणाऱ्या मुळशी व कोयना धरणाच्या बांधासाठी त्यांनी सत्याग्रह केला होता. त्यांनी लहान-मोठ्या खेड्यातील लोकांच्या प्रगतीसाठी कार्य सुरू केल्याने लोकांनी त्यांना ‘ग्रामसेवक परचुरे शास्त्री’ असे नाव दिले. परचुरे शास्त्री यांनी स्वत: ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. जो पर्यंत खेड्यातील लोकं निर्भय आणि निर्व्यसनी बनणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही, असे ते म्हणत.देशाला स्वातंत्र्य मिळावे अशी अपेक्षा ठेवणाºया युवकांना त्यांनी दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून काही बोध घेतला पाहिजे. गुलामगिरीचे शिक्षण देणारी पध्दती; मग ती भारतीय शिक्षकाकडून मिळणारी असेल तरी ती सोडून दिली पाहिजे. रचनात्मक कार्य, स्वदेशीव्रताचे पालन करायला शिकावे, असे आवाहन त्यांनी केले होते. कुष्ठरोग होण्याच्या अगोदर आणि कुष्ठरोग झाल्यानंतरही सत्याग्रह, चळवळीसाठी कारावास भोगला. यादरम्यान तुरुंगात त्यांची रविंद्रनाथ टागोर यांच्याशी भेट झाली होती. कताई आणि रचनात्मक कार्यावर अखेरपर्यंत निष्ठा कायम राहिली. आजारपणातही आपल्या कार्यात खंड पडू दिला नाही. गांधीजींच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. यात त्यांच्या पत्नीचाही मोलाचा वाटा आहे. आजार बळावल्याने मात्र त्यांना परिवारासोबत, समाजात राहणे कठीण झाले. शास्त्रींना जनावरांच्या गोठ्यात, झाडाखाली राहण्याची वेळ आली. सामाजिक तिरस्कार आणि आर्थिकतेचा सामना करणे अवघड झाल्याने बापूंचे स्मरण व्हायला लागले. तेच आधार देतील असा विश्वास त्यांना वाटू लागला.सेवाग्राममध्ये बापूंनी आश्रमची स्थापन केली अशी त्यांना माहिती मिळाली आणि सेवाग्राम आश्रमची वाट धरली. आश्रमच्या समोरील एका झाडाखाली ते बसून असल्याचे मीरा बहन यांना दिसले. त्यांनी ही गोष्ट बापूंना सांगितली. गांधीजींनी त्यांची भेट घेतली. सायंकाळच्या प्रार्थनेनंतर बापूंनी आश्रमवासियांसोबत परचुरे शास्त्री विषयी चर्चा केली. आश्रमात कार्यकर्ते असल्याने कुष्ठरोगीला ठेवायचे कसे हा मोठा प्रश्न होता. सर्वांनी त्यांना दूर लोटले होते. पण, ते एक कार्यकर्ता होते. त्यांचा त्याग गांधीजी करू शकले नाही आणि आश्रमातील एका बाजूला त्यांच्या राहण्यासाठी मुन्नालालजींनी एक कुटी तयार केली. तेथेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली. बापू नियमित त्यांची सेवा करीत. आजारात जगणे कठीन वाटायला लागल्याने एकदा मरणाची ईच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यासाठी उपवास सुरू केला पण, त्यांना बरे वाटायला लागल्याने उपवास बापूंच्या हातानी सोडला. स्वातंत्र्य चळवळीत बापूंना आश्रमच्या बाहेर जावे लागले. त्यामुळे त्यांची जबाबदारी मनोहर दिवाण यांना देऊन दत्तपूर येथे ठेवले. आश्रमातील दोन वर्षाच्या मुक्कामानंतर दत्तपूर येथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम