शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

रेतीघाट; भूजल सर्वेक्षणातही तफावत

By admin | Updated: January 8, 2015 22:58 IST

रेतीघाटांच्या लिलावासाठी परवानगी देण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात़ यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पर्यावरण तसेच भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी अनिवार्य आहे़

वर्धेचा महसूल परजिल्ह्यात : अमरावती, यवतमाळच्या घाटधारकांकडून रेतीची चोरीप्रशांत हेलोंडे - वर्धारेतीघाटांच्या लिलावासाठी परवानगी देण्यापूर्वी अनेक प्रक्रिया पार पाडाव्या लागतात़ यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पर्यावरण तसेच भूजल सर्वेक्षण विभागाची परवानगी अनिवार्य आहे़ याशिवाय रेतीघाट लिलावास पात्र ठरविला जात नाही़ यंदाही हा ससेमीरा कायम आहे़ जिल्ह्यातील १५७ पैकी केवळ ४२ घाट भूजल सर्वेक्षण विभागाने लिलावास पात्र ठरविले. जिल्ह्यात एकूण १५७ रेतीघाट आहेत़ यातील १३३ घाटांचे सर्वेक्षण भूजल विभाग आणि विकास यंत्रणेमार्फत करण्यात आले आहेत़ यातील केवळ ४२ रेतीघाटांमध्ये दोन मीटरच्या वर रेतीचा थर असल्याचा अहवाल भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे़ यानुसार भूजलची परवानगी प्राप्त घाटांपैकी ३५ घाटांचे लिलाव करण्यात येत आहे़ भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे मे आणि सप्टेंबर महिन्यात नदीपात्रांचे सर्व्हे करण्यात आला़ यात बहुतांश घाटांमध्ये रेतीच नसल्याचे निदर्शनास आले आहे़ नदी पात्रात २ मीटर रेती शिल्लक ठेवून वरची रेती काढावी, असा नियम आहे़ शिवाय रेतीघाट लिलावास पात्र ठरविण्यासाठी असलेल्या अन्य नियमांतही तो घाट बसणे गरजेचे आहे़ यानुसार जिल्ह्यातील केवळ ४२ घाट त्या निकषांवर खरे उतरतात उर्वरित सर्व घाट लिलावास अपात्र ठरविण्यात आले आहेत़ यात देवळी तालुक्यातील ३७ पैकी केवळ तीनच घाटांचा समावेश आहे़ दोन ग्रामपंचायतींनी ना-हरकत प्रमाणपत्र न दिल्याने केवळ एकाच घाटाचा लिलाव होणार आहे़ यामुळे रेतीचे भाव वधारणार आहेत़ यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात मात्र सर्वच घाट लिलावास पात्र ठरविण्यात आले आहेत़ यामुळे वर्धा जिल्ह्याच्या घाटांतील रेतीही सदर घाटधारक चोरतात़ हा प्रकार गत कित्येक वर्षांपासून सुरू आहे़ यामुळे वर्धेचा महसूल अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात जात असून रेतीची सर्रास चोरीही होत असल्याचे वास्तव आहे़