शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

लिलावापूर्वीच घाटातून वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

आर्वी तालुक्यात प्रशासन व महसूल विभागांच्या अधिकार कार्यक्षेत्रात मागील वर्षांपासून वर्धा नदीपात्रात अवैध वाळूउपसा व वाहतूक सुरू आहे. यामुळे महसूल विभाग व अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या अवैध वाहतुकीमुळे शिवारातील पांदण रस्त्यांची वाट लागली आहे. तर पांदण रस्त्यावर असलेली शेतातील पाईपलाईन अवैध वाहतुकीमुळे फुटून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देआर्वी तालुक्यात तब्बल १८ वाळूघाट : वाळूचोरांमुळे शासनाचा बुडतोय लाखो रुपयांचा महसूल

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : तालुक्यातील वाळूघाटाचा मागीलवर्षी व यंदाही आतापावेतो लिलाव झाला नसल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तर काही घाटातून गौण संपत्तीचा अवैध उपसा सुरू असल्याचे चित्र आहे.तालुक्यात रोहणा, धनोडी (बहाद्दरपूर) वडगाव (पांडे) सालफळ, पिंपळगाव (वडाळा) सोरटा, टाकरखेडा, जळगाव, देऊरवाडा या ग्रामपंचायतीअंतर्गत १८ घाट येतात.यात मौजा दह्यापूर (रोहणा) धनोडी (बहाद्दरपूर) वडगाव (पांडे) घाट क्रमांक एक, दिघी-वडगाव घाट क्र. दोन, सायखेडा, सालफळ, पिंपळगाव (वडाळा) सोरटा , वडाळा (पिंपळगाव) दर्यापूर (सालफळ) टाकरखेडा घाट क्रमांक एक, टाकरखेडा घाट क्रमांक दोन, परतोडा घाट क्रमांक एक, परतोडा घाट क्रमांक दोन, देऊरवाडा एक, दोन, तीन, असे एकूण अठरा घाट आहेत. लिलावासाठी आॅक्टोबर पाहणी करण्यासाठी खनिकर्म विभागाचे अधिकारी येणार होते. मात्र, आले नाही. या घाटांची पाहणी न झाल्याने वाळूघाटांचा लिलाव लांबणीवर पडला आहे. तो केव्हा होणार, हे कुणालाच माहिती नाही.आर्वी तालुक्यात प्रशासन व महसूल विभागांच्या अधिकार कार्यक्षेत्रात मागील वर्षांपासून वर्धा नदीपात्रात अवैध वाळूउपसा व वाहतूक सुरू आहे. यामुळे महसूल विभाग व अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.या अवैध वाहतुकीमुळे शिवारातील पांदण रस्त्यांची वाट लागली आहे. तर पांदण रस्त्यावर असलेली शेतातील पाईपलाईन अवैध वाहतुकीमुळे फुटून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. परिसरातील रोज मजुरी करणारे मजूरही शेतातील कामे सोडून देऊन या अवैध कामे करणाºया प्रवृत्तीकडे वळत आहे. या अनधिकृत उत्खननातून व वाहतुकीतून उत्पन्न होणाºया धनशक्तीसमोर अधिकाऱ्यांनी बेधडक समोर येऊन कारवाई करीत हे प्रकार तातडीने थांबवावे, अशी मागणी रोहणा येथील युवा शेतकरी मंचने केली आहे.महसूल विभागाच्या अधिकार आणि कार्यक्षेत्रात गत वर्षापासून वर्धा नदीपात्रात अवैध गौण खनिज उपसा व वाहतूक होत असल्याची ओरड आहे. तर वाळूघाटाचा लिलाव झाला नसल्याने बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात रेतीची कमतरता भासत आहे.नागपूर जिल्ह्यातून आर्वी तालुक्यात कन्हान रेतीची मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. क्षमतेपेक्षा दुप्पट रेतीची वाहतूक आर्वी परिसरात होत असून याकडे राजस्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ३५० फूट वाळूची रॉयल्टी असूनही ६०० फूट वाळूचे ५ ट्रक रोज आर्वीत येतात. यात बड्या वाळूमाफियांना सोडून लहान, किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांना मात्र उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी विनाकारण त्रास देत असल्याची ओरड आर्वी विभागात होत आहे. महसूू विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.माफियांचा धुडगूसवाळूघाटाचा लिलाव झालेला नसताना वाळूचा माफियांकडून वारेमाप उपसा सुरू आहे. मागील काही दिवसांपासून माफियांनी अक्षरश: धुडगूस घातला आहे. मात्र, तहसील प्रशासन सुस्त आहे. त्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.अवैध वाळू व्यवसायिकांवर महसूल विभागाची कारवाई सुरूच आहे. शासनाच्या नव्या धोरणानुसार उपविभागीय अधिकारी पातळीवर समिती घाटाचे संयुक्त सर्वेक्षण करणार आहे. कदाचित पुढील आठवड्यात हे सर्वेक्षण होईल. आम्ही वाळूघाट प्रस्तावित करतो. जिल्हा पातळीवर याचा निर्णय घेतला जातो.- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार आर्वी.

टॅग्स :sandवाळू