शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्ग पूर्ण; आता वाहतुकीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 8:50 PM

हिंंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे.

ठळक मुद्दे५८ किमीचा मार्ग, २ हजार ७६२ कोटींचा खर्च

वर्धा : हिंंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे वर्धा जिल्ह्यातील ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाकरिता तीन तालुक्यांतील ७८२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले असून, सर्व कामावर २ हजार ७६२ कोटींचा खर्च झाला आहे. महामार्ग पूर्ण झाला असून, केवळ वाहतुकीची प्रतीक्षा आहे.

समृद्धी महामार्गामुळे नागरिक मुंबई व नागपूर या महानगरांना जोडले जाणार आहेत. वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर असून, सहापदरी हा मार्ग आहे. ५ मोठ्या आणि २७ लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्याकरिता ९ उड्डाणपूल व ३४ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आले. त्यामध्ये वाहनांसाठी २२, तर पादचाऱ्यांकरिता १२ भुयारी मार्गांचा समावेश आहे. दोन रेल्वे उड्डाणपूलही उभारण्यात आले आहेत. येळाकेळी व विरुळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले आहेत. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत.

दोन ठिकाणी उभारणार नवनगरे

समृद्धी महामार्गाकरिता तीन तालुक्यांतील जमिनी संपादित करण्यात आल्या. त्याच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा आल्याने त्यांच्या जीवनमानातही बदल झाला आहे. यासोबतच इतरही शेतजमिनीचे भाव वाढले असून, गावेही महामार्गाशी जोडली गेली आहेत. या महामार्गालगत दोन ठिकाणी नवनगरे उभारण्यात येणार असून, त्याकरिता केळझर आणि विरुळ ही गावे निश्चित झाली आहेत. यासोबतच गणेशपूर व रेणकापूर येथे महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता सुविधा केंद्र राहणार आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग