शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

रूपेशच्या नरबळीने समाजमन सुन्न

By admin | Updated: November 15, 2014 22:50 IST

अतिशय क्रूरपणे रूपेशची हत्या करून त्याचा नरबळी दिला तो केवळ गुप्तधनाच्या लालसेपोटी. गळा दाबून रूपेशचा हत्या केल्यानंतर नराधमाचे एकेक कृत्य मनुष्यात राक्षसीवृत्ती अद्यापही कायम

आरोपीच्या एकेका कृत्याने राक्षसी वृत्तीचा परिचय : कापून नेलेले अवयव भाजून मीठ लावून खाल्ले वर्धा : अतिशय क्रूरपणे रूपेशची हत्या करून त्याचा नरबळी दिला तो केवळ गुप्तधनाच्या लालसेपोटी. गळा दाबून रूपेशचा हत्या केल्यानंतर नराधमाचे एकेक कृत्य मनुष्यात राक्षसीवृत्ती अद्यापही कायम असल्याचा प्रत्यय देणारी आहे. त्याने रूपेशचे कापून नेलेले अवयव भाजून मीठ लावून खाल्ले, ही बाब समाजमन सुन्न करणारी आहे. शनिवार दि. ८ नोव्हेंबर हा दिवस वर्धेकरांसाठी काळा ठरला. नऊ वर्षीय रूपेश मुळे हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. तो दिसत नसल्याचे लक्षात येताच माझा मुलगा कुठे गेला? तुम्ही बघितला काय? असा केविलवाणा प्रश्न विचारात त्याची आई मिळेल त्या दिशेने आपल्या पोटच्या गोळ्याचा शोध घेत होती. प्रत्येकांकडून नाही हेच उत्तर ऐकून माऊली ती बेचैन झाली. दाटलेला कंठ आणि डोळ्यात आसवे घेऊन ती पोलीस ठाण्यात पोहचली. साहेब, माझा मुलगा खेळता खेळता बेपत्ता झाला हो. तो कुठे सापडत नाही. त्याला शोधून द्या , अशी विनवणी ती करू लागली. पोलिसांनी तक्रार लिहून घेतली. तिचा रूपेश तिला कधीच भेटणार नाही. हे त्या माऊलीला काय ठाऊक? दुसऱ्या दिवशी सकाळी रूपेशचा मृतदेहच गवसल्याने तिच्या दु:खाला पारावार उरला नाही. वडार समाजात शिक्षितांचे प्रमाण बोटावर मोजण्याइतके आहे. रूपेश याच समाजातील असून तो इयत्ता ४ थीमध्ये शिकत होता. ही बाब समाजासाठी गौरवाची होती. या होतकरू मुलाची इतकी क्रूरपणे कुणी, कशासाठी हत्या केली? या प्रश्नाचे उत्तर कुणाजवळही नव्हते. खेळता खेळता मुलगा गायब होत असेल आणि त्याची हत्या केली जात असेल तर ही बाब कोवळे आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहे, समाजाला अंतर्मुख करायला लावणारी आहे. प्रत्येक पालकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करणारी आहे. हे हेरून ‘लोकमत’ने या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे, सत्य बाहेर आले पाहिजे, वर्धेकरांच्या आणि विशेष करुन तमाम पालकांच्या मनातली भीती कायमची हद्दपार होऊन रूपेशला न्याय मिळाला पाहिजे, या हेतूने प्रकरण सातत्याने लावून धरले. यानंतर वर्धेकरही हळूहळू या प्रकरणाशी जुळत गेले. यानंतर खऱ्या अर्थाने रूपेशला न्याय द्या, त्याच्या मारेकऱ्याला फाशी द्या, रूपेशचे अवयव काढून त्याची क्रूरपणे हत्या करणाऱ्याला तात्काळ अटक करा, या मागण्यांसाठी वर्धेकर रस्त्यावर उतरले. दुसरीकडे पोलीस प्रशासनापुढेही रूपेशच्या मारेकऱ्याला शोधून काढणे मोठे आव्हान होते. अशातच पोलिसांचे हात आसिफ शहा वल्द अजीम शहा उर्फ मुन्ना पठाण या संशयितापर्यंत पोहचले. तोच खरा आरोपी असेल असे पोलिसांनी सुरुवातीला वाटत नव्हते. जसजसा तपास पुढे गेला. तसा पोलिसांचा संशयही पक्का होत गेला. अखेर आरोपीने रूपेशची हत्या केल्याची कबुली दिली. मात्र त्याने हत्या का केली, यासाठी पुन्हा तो पोलिसांना चकवू लागला. अखेर त्याच्याकडून सत्य वदवून घेण्यात पोलिसांना यश आले. त्याने रूपेशचा नरबळी दिल्याचे कबुल केले. हे कृत्य त्याने कसे केले, ही बाब अंगावर शहारे आणणारी आहे. एखादी व्यक्ती इतकी क्रूर होऊ शकते, याचा प्रत्यय या घटनेतील त्याने केलेल्या एकेका लक्षात कृत्यातून आल्यावाचून राहात नाही. त्याने सायंकाळी रूपेशला फिरायला नेतो म्हणून घेऊन गेला. आलोडी मार्गे बायपासकडे जाणाऱ्या मार्गावर त्याची गळा दाबून निर्दयीपणे हत्या केली. मृतदेह विकास विद्यालयाच्या मागील बाजूला निर्जनस्थळी आणला. ब्लेडच्या सहाय्याने त्याने त्याचे डोळे काढले. तरीही त्याला त्याचे काहीही वाटले नाही. यानंतर त्याने त्याच्या दोन्ही किडण्या काढल्या. इतकेच नव्हे, तर त्याने त्याचे गुप्तांग कापले. यानंतर रूपेशचा मृतदेह तिथेच टाकून तो महाकाळी धरणाच्या कालव्यावर गेला. तिथे चुल पेटवून ते अवयव भाजले. आणि त्याला मीठ लावून खाल्ले. हे राक्षसी कृत्य करताना त्याला कशाहीची पर्वा वाटली नाही. यानंतर त्याने पहाटेपर्यंत परिसरातील एका मंदिरात नग्न अवस्थेत पूजा-अर्चा केली. आपल्याला अघोरी शक्ती प्राप्त झाली, अशा अविभार्वात तो घरी पतरला. आता आपले कोणीच बिघडवू शकत नाही. कुणालाही आपल्यावर संशय येणार नाही, अशा पद्धतीने शहरात वावरु लागला. मात्र त्याचे हे राक्षसी कृत्य फारकाळ लपून राहिले नाही.(जिल्हा प्रतिनिधी)