शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तेच पॅकेज, तीच आडकेवारी अन् सर्वेक्षणाचा ससेमीरा

By admin | Updated: January 7, 2015 22:58 IST

दुष्काळसदृश्य स्थितीची मागील आठवड्यात केंद्रातील अधिकाऱ्याने पाहणी केली़ पाहणी, आकडेवारीपेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत व भाववाढीची गरज आहे; पण याकडे कुणाचेही लक्ष नाही.

गौरव देशमुख - वर्धादुष्काळसदृश्य स्थितीची मागील आठवड्यात केंद्रातील अधिकाऱ्याने पाहणी केली़ पाहणी, आकडेवारीपेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत व भाववाढीची गरज आहे; पण याकडे कुणाचेही लक्ष नाही. निवडणुका झाल्या, नवीन सरकार आले; पण शेतकऱ्याच्या वाट्याला तेच पॅकेज, तीच आकडेवारी आणि सर्वेक्षणाचा तोच ससेमीरा कायम असल्याचे दिसते़ राज्य शासनाने ७ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले; पण यातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे़शेतकरी दुष्काळाच्या आगीत होरपळत आहे. ग्रामीण भागात संपूर्ण वातावरण ढवळून निघत आहे. दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आज शेती सोडून मजुरीसाठी जात आहे. जगाचा पोशिंदा म्हणविणारा शेतकरी आता नावालाच उरला आहे. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने त्याला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. गत तीन वर्षांपासून वर्धा तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. गतवर्षी अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतजमीन खरडून गेली. यंदा निसर्गाने दगा दिला. सोयाबीन कापसाचे उत्पन्न अत्यल्प झाले. शासनाने सोयाबीनला ५ हजार, ५ हजार ५०० तर कापसाला ६ हजार ५०० ते ७ हजार हमीभाव जाहीर करावा, यासाठी राजकीय तथा सामाजिक आंदोलने झाली; पण कापसाला केवळ ४ हजार रुपये भाव मिळत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाच्या सोयी आहे; पण भारनियमनाचे भूत मानगुटीवर आहे. कोरडवाहू शेतकरी याहीपेक्षा बिकट स्थितीत आहे़ घरात दाणा नाही, अशा स्थितीत शासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे़ नापिकी, कर्ज, निसर्ग प्रकोप यातून निर्माण झालेले नैराश्य दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचे समूपदेशन करणेही गरजेचे झाले आहे़