शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

तेच पॅकेज, तीच आडकेवारी अन् सर्वेक्षणाचा ससेमीरा

By admin | Updated: January 7, 2015 22:58 IST

दुष्काळसदृश्य स्थितीची मागील आठवड्यात केंद्रातील अधिकाऱ्याने पाहणी केली़ पाहणी, आकडेवारीपेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत व भाववाढीची गरज आहे; पण याकडे कुणाचेही लक्ष नाही.

गौरव देशमुख - वर्धादुष्काळसदृश्य स्थितीची मागील आठवड्यात केंद्रातील अधिकाऱ्याने पाहणी केली़ पाहणी, आकडेवारीपेक्षा शेतकऱ्यांना थेट मदत व भाववाढीची गरज आहे; पण याकडे कुणाचेही लक्ष नाही. निवडणुका झाल्या, नवीन सरकार आले; पण शेतकऱ्याच्या वाट्याला तेच पॅकेज, तीच आकडेवारी आणि सर्वेक्षणाचा तोच ससेमीरा कायम असल्याचे दिसते़ राज्य शासनाने ७ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले; पण यातही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे़शेतकरी दुष्काळाच्या आगीत होरपळत आहे. ग्रामीण भागात संपूर्ण वातावरण ढवळून निघत आहे. दररोज कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आज शेती सोडून मजुरीसाठी जात आहे. जगाचा पोशिंदा म्हणविणारा शेतकरी आता नावालाच उरला आहे. शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन असल्याने त्याला विविध समस्यांचा सामना करावा लागतो. गत तीन वर्षांपासून वर्धा तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. गतवर्षी अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतजमीन खरडून गेली. यंदा निसर्गाने दगा दिला. सोयाबीन कापसाचे उत्पन्न अत्यल्प झाले. शासनाने सोयाबीनला ५ हजार, ५ हजार ५०० तर कापसाला ६ हजार ५०० ते ७ हजार हमीभाव जाहीर करावा, यासाठी राजकीय तथा सामाजिक आंदोलने झाली; पण कापसाला केवळ ४ हजार रुपये भाव मिळत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनाच्या सोयी आहे; पण भारनियमनाचे भूत मानगुटीवर आहे. कोरडवाहू शेतकरी याहीपेक्षा बिकट स्थितीत आहे़ घरात दाणा नाही, अशा स्थितीत शासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे़ नापिकी, कर्ज, निसर्ग प्रकोप यातून निर्माण झालेले नैराश्य दूर करण्यासाठी शेतकऱ्यांचे समूपदेशन करणेही गरजेचे झाले आहे़