शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या अर्जदारांचे होणार चावडी वाचन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 20:50 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९८ हजार ४५५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. या अर्जदाराच्या पात्रतेसंबंधी  प्राथमिक पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील अर्जदार शेतक-यांच्या यादीचे  वाचन करण्यात येणार आहे.

वर्धा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९८ हजार ४५५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. या अर्जदाराच्या पात्रतेसंबंधी  प्राथमिक पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील अर्जदार शेतक-यांच्या यादीचे  वाचन करण्यात येणार आहे. २८ जून २०१७ च्या शासन निर्णयातील पात्र- अपात्रतेच्या निकषांप्रमाणे  अर्जदार शेतक-यांची  प्राथमिक पडताळणी आणि नागरिकांचे आक्षेप यावेळी नोंदविण्यात येणार आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबाजावणीसाठी तालुका व उपविभागीय स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तालुका स्तरीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना  तालुक्यातील गावे वाटून देण्यात आली आहेत. अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन अर्ज  सादर केलेल्या अर्जदाराच्या याद्या पोर्टलवरून काढून त्याचे ठराविक दिवशी  गावात वाचन  करतील. अर्जदाराच्या पात्रतेसंबधीची शहानिशा चावडी वाचन सभेच्या माध्यमातून करण्यात येईल. यातून पुढे आलेल्या माहितीवरून अर्जदाराच्या पात्र- अपात्रतेबद्दलचे शेरे नोंदविण्यात येतील.    पती पत्नी व  त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये या कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे एका कुटुंबातुन एकच अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र कुटुंबातून एकापेक्षा जास्त अर्ज केले असल्यास अशा अर्जदाराच्या अर्जात यथावकाश आवश्यक ती दुरुस्ती करून त्यांच्या अर्जाचा पुनर्विचार करण्यात येईल. 

  या योजनेंतर्गत विहित पद्धतीप्रमाणे प्राप्त अर्जाची आणि बँकांकडून कर्जासंबंधी प्राप्त माहितीची शहानिशा करण्यात येईल. प्राप्त माहितीच्या आधारे अर्जदाराचे अर्ज मंजूर किंवा  नामंजूर करणे याचा निर्णय तालुकास्तरीय समिती मार्फत घेण्यात येईल. बँकेकडील कर्जासंबंधी माहितीचे व अर्जदाराच्या अर्जाचे ऑनलाईन पद्धतीने मुल्यमापन करून लाभार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात येईल. यात तात्पुरते पात्र अर्जदार, अतिरिक्त माहितीसाठी प्रलंबित अर्जदार , तात्पुरते अपात्र अर्जदारआणि  विचाराधीन अर्जदार यादी अशा स्वरूपात चार याद्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येतील. पोर्टलवरील याद्याना विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन तीन दिवसात जनतेकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राप्त माहितीशी सांगड घालून पुन्हा चार वर्गीकरणनिहाय याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील. तालुकास्तरीय समितीने पात्र किंवा अपात्र ठरविलेल्या अर्जदारांना त्यांच्या मोबाईलवर sms द्वारे कळविण्यात येईल.  तालुकास्तरीय समितीने अपात्र ठरविल्यानंतर उपविभागीय समितीपुढे अर्जदाराला लिखित अर्जाद्वारे किंवा ऑनलाईन दाद मागता येणार आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी