शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कर्जमाफीच्या अर्जदारांचे होणार चावडी वाचन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 20:50 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९८ हजार ४५५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. या अर्जदाराच्या पात्रतेसंबंधी  प्राथमिक पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील अर्जदार शेतक-यांच्या यादीचे  वाचन करण्यात येणार आहे.

वर्धा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ९८ हजार ४५५ शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत. या अर्जदाराच्या पात्रतेसंबंधी  प्राथमिक पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत गावातील अर्जदार शेतक-यांच्या यादीचे  वाचन करण्यात येणार आहे. २८ जून २०१७ च्या शासन निर्णयातील पात्र- अपात्रतेच्या निकषांप्रमाणे  अर्जदार शेतक-यांची  प्राथमिक पडताळणी आणि नागरिकांचे आक्षेप यावेळी नोंदविण्यात येणार आहे.

या योजनेच्या प्रभावी अंमलबाजावणीसाठी तालुका व उपविभागीय स्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तालुका स्तरीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना  तालुक्यातील गावे वाटून देण्यात आली आहेत. अधिकारी व कर्मचारी ऑनलाईन अर्ज  सादर केलेल्या अर्जदाराच्या याद्या पोर्टलवरून काढून त्याचे ठराविक दिवशी  गावात वाचन  करतील. अर्जदाराच्या पात्रतेसंबधीची शहानिशा चावडी वाचन सभेच्या माध्यमातून करण्यात येईल. यातून पुढे आलेल्या माहितीवरून अर्जदाराच्या पात्र- अपात्रतेबद्दलचे शेरे नोंदविण्यात येतील.    पती पत्नी व  त्यांची १८ वर्षांखालील अपत्ये या कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे एका कुटुंबातुन एकच अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र कुटुंबातून एकापेक्षा जास्त अर्ज केले असल्यास अशा अर्जदाराच्या अर्जात यथावकाश आवश्यक ती दुरुस्ती करून त्यांच्या अर्जाचा पुनर्विचार करण्यात येईल. 

  या योजनेंतर्गत विहित पद्धतीप्रमाणे प्राप्त अर्जाची आणि बँकांकडून कर्जासंबंधी प्राप्त माहितीची शहानिशा करण्यात येईल. प्राप्त माहितीच्या आधारे अर्जदाराचे अर्ज मंजूर किंवा  नामंजूर करणे याचा निर्णय तालुकास्तरीय समिती मार्फत घेण्यात येईल. बँकेकडील कर्जासंबंधी माहितीचे व अर्जदाराच्या अर्जाचे ऑनलाईन पद्धतीने मुल्यमापन करून लाभार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात येईल. यात तात्पुरते पात्र अर्जदार, अतिरिक्त माहितीसाठी प्रलंबित अर्जदार , तात्पुरते अपात्र अर्जदारआणि  विचाराधीन अर्जदार यादी अशा स्वरूपात चार याद्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येतील. पोर्टलवरील याद्याना विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देऊन तीन दिवसात जनतेकडून हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. त्यानंतर प्राप्त माहितीशी सांगड घालून पुन्हा चार वर्गीकरणनिहाय याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात येतील. तालुकास्तरीय समितीने पात्र किंवा अपात्र ठरविलेल्या अर्जदारांना त्यांच्या मोबाईलवर sms द्वारे कळविण्यात येईल.  तालुकास्तरीय समितीने अपात्र ठरविल्यानंतर उपविभागीय समितीपुढे अर्जदाराला लिखित अर्जाद्वारे किंवा ऑनलाईन दाद मागता येणार आहे.  

टॅग्स :Farmerशेतकरी