शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

शिकवणीला जाणाऱ्या विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे तरुणी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच शहरातही रोडरोमिओंमुळे तरुणी, महिला असुरक्षित झाल्या आहेत. काल-परवा बॅचलर रोडवर दुचाकीचालक दोन तरुणांनी आर्वी नाका चौकापासून धुनिवाले चौकापर्यंत शिकवणीला जाणाºया विद्यार्थिनीचा पाठलाग केला.

ठळक मुद्देबॅचलर रोडवरील प्रकार : पोलिसांची गस्त नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिकवणीला जाणाºया विद्यार्थिनींचा पाठलाग करीत छेड काढणे, असभ्य वर्तन करणे आदी प्रकार शहरातील बॅचलर रोडवर सर्रास घडत आहेत. पोलिसांकडून गस्त घालणे बंद झाल्याने टवाळखोरांचे फावत आहे. शहर पोलिसांनी टवाळखोर, रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांतून होत आहे.अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे तरुणी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच शहरातही रोडरोमिओंमुळे तरुणी, महिला असुरक्षित झाल्या आहेत. काल-परवा बॅचलर रोडवर दुचाकीचालक दोन तरुणांनी आर्वी नाका चौकापासून धुनिवाले चौकापर्यंत शिकवणीला जाणाºया विद्यार्थिनीचा पाठलाग केला. मात्र, याच दरम्यान एका जागरूक व्यक्तीनेही या युवकांचा पाठलाग केल्याने हे तरुण दुचाकी घेऊन पसार झाले. या व्यक्तीने या काळया रंगाच्या सुझुकी अ‍ॅक्सेस दुचाकीचा एमएच ३२ एजी ३३३६ असा क्रमांक नोंदविला. दूरध्वनीवरून लोकमतकडे हा क्रमांक देत तक्रारही नोंदविली. बॅचलर रोडवर हे प्रकार नित्याचेच असल्याचे मतही या व्यक्तीने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर नोंदविले.बॅचलर रोडलगत शिकवणी वर्गांची मोठी संख्या आहे. त्यामुळे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत विद्यार्थिनींची ये-जा सुरू असते. शिकवणी वर्ग सुटण्याच्या वेळेत रोडरोमिओ वर्गाबाहेर उभे असतात.वर्ग सुटताच तरुणींचा घरापर्यंत पाठलाग करतात. पूर्वी शहरात चार्ली पथकांकडून दुचाकीद्वारे गस्त घातली जात होती. त्यामुळे टवाळखोरांवर वचक होता. ही गस्तच पोलीस विभागाने बंद केल्याने छेडखानीचे प्रकार वाढले आहेत.राज्यातील आणि शेजारच्या जिल्ह्यातील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता बॅचलर रोडवर पोलीस अधीक्षकांनी विशेष पथकांद्वारे पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी होत आहे.अडचण असल्यास करा संपर्करात्री वाहतुकीमध्ये अडचण अथवा कोणतीही समस्या असेल किंवा सुरक्षित वाटत नसेल तर आठवड्यातील २४ तास ८००७०१५१५५ या भ्रमणध्वनीवर संपर्क कधीही संपर्क करा अथवा संदेश पाठवावा, असे आवाहन नगरसेवक वरुण पाठक यांनी केले आहे. याशिवाय वुमेन अ‍ॅण्ड चाईल्ड फाऊंडेशनतर्फे महिला आणि मुलींच्या सुरक्षेकरिता रामनगर, वर्धा, सेवाग्राम येथील ठाणेदारांच्या उपस्थितीत ८००७४१२१८५ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. रात्री ९ ते सकाळी ५ वाजतापर्यंत महिला आणि मुलींना तत्काळ मदत देण्यात येणार असल्याचे संस्थेचे चेतन वैद्य यांनी कळविले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी