शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

बोरधरणाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:14 IST

निसर्गरम्य परिसर असल्याने नजीकच्या बोर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहेत. ही बाब तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देत अनेकांना रोजगार देणारी ठरत असली तरी सध्या जीव मुठीत घेऊन थेट बोर प्रकल्पाच्या पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : जीव धोक्यात टाकून लुटतात पोहण्याचा आनंद

विजय माहूरे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/घोराड : निसर्गरम्य परिसर असल्याने नजीकच्या बोर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहेत. ही बाब तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देत अनेकांना रोजगार देणारी ठरत असली तरी सध्या जीव मुठीत घेऊन थेट बोर प्रकल्पाच्या पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात येतात. इतकेच नव्हे तर काही हौसी धरणाच्या पाण्याच्या काठापर्यंत जावून डबा पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. शिवाय ते चिमुकल्यांना सोबत घेवून धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे बोरधरण सध्या जलतरण तलाव झाल्याचे दिसते. तेथे दर्शनी भागावर पोलीस विभागाच्यावतीने सुचना फलक लावण्यात आला आहे. परंतु, त्या सुचनांकडे सध्या दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार टाळावा यासाठी बोर प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाºयांनी तसेच सेलू पोलिसांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.पाण्यात उतरुण घेतला जातोय सेल्फीवर्धा पाटबंधारे विभागाकडून धरणाच्या मुख्य भागावर छायाचित्र काढण्यास मनाई असल्याचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, तेथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मोबाईलचा फ्लॅश धरणावर पाडून बोरधाचे चित्र मोबाईलमध्ये कैद केले जात आहे. इतकेच नव्हे तर चक्क धरणाच्या पाण्यात उतरुण सेल्फी काढली जात असल्याने धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आहे.प्लास्टिक बंदीचा फज्जाकमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. असे असले तरी सध्या बोरधरण परिसरात विकल्या जाणाऱ्या वस्तूसाठी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा प्रकार दिसून येतो. तेथे प्लास्टिकच्या पत्रावळीचा वापर होत असून उपयोग झाल्यानंतर त्या नागरिक अस्ताव्यस्त फेकुन देत असल्याने प्लास्टिक बंदीचा येथे फज्जाच उडल्याचे दिसून येते. योग्य कार्यवाहीची गरज आहे.दारुच्या बाटल्यांचा खचजिल्ह्यात दारूबंदी असली तरी काही मद्यपी या परिसरात चोर वाटेने दारू आणून तेथे दारूपार्टीच करीत असल्याचे दिसून येते. पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांसह दारूच्या रिकाम्या शिश्यांचा खच धरण परिसरात दिसून येतो. या परिसराची नैसर्गिक सुंदरता कायम रहावी तसेच मद्य पार्टीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधितांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.२४ तास सुरक्षा रक्षक देण्याची मागणीविस्तीर्ण असलेल्या परिसरात धरणाच्या किनाऱ्यावरून पर्यटक फेरफटका मारतात; पण पाण्याच्या काठावर जावून बसणाऱ्यांची संख्या कमी नाही. येथे येणाऱ्या दुसऱ्या पर्यटकांना सुद्धा सुरक्षिततेची आवश्यकता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी बोरधरण परिसरात २४ तास सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.

टॅग्स :Bor Damबोर धरणPlastic banप्लॅस्टिक बंदी