शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बोरधरणाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:14 IST

निसर्गरम्य परिसर असल्याने नजीकच्या बोर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहेत. ही बाब तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देत अनेकांना रोजगार देणारी ठरत असली तरी सध्या जीव मुठीत घेऊन थेट बोर प्रकल्पाच्या पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : जीव धोक्यात टाकून लुटतात पोहण्याचा आनंद

विजय माहूरे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/घोराड : निसर्गरम्य परिसर असल्याने नजीकच्या बोर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहेत. ही बाब तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देत अनेकांना रोजगार देणारी ठरत असली तरी सध्या जीव मुठीत घेऊन थेट बोर प्रकल्पाच्या पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात येतात. इतकेच नव्हे तर काही हौसी धरणाच्या पाण्याच्या काठापर्यंत जावून डबा पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. शिवाय ते चिमुकल्यांना सोबत घेवून धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे बोरधरण सध्या जलतरण तलाव झाल्याचे दिसते. तेथे दर्शनी भागावर पोलीस विभागाच्यावतीने सुचना फलक लावण्यात आला आहे. परंतु, त्या सुचनांकडे सध्या दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार टाळावा यासाठी बोर प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाºयांनी तसेच सेलू पोलिसांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.पाण्यात उतरुण घेतला जातोय सेल्फीवर्धा पाटबंधारे विभागाकडून धरणाच्या मुख्य भागावर छायाचित्र काढण्यास मनाई असल्याचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, तेथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मोबाईलचा फ्लॅश धरणावर पाडून बोरधाचे चित्र मोबाईलमध्ये कैद केले जात आहे. इतकेच नव्हे तर चक्क धरणाच्या पाण्यात उतरुण सेल्फी काढली जात असल्याने धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आहे.प्लास्टिक बंदीचा फज्जाकमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. असे असले तरी सध्या बोरधरण परिसरात विकल्या जाणाऱ्या वस्तूसाठी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा प्रकार दिसून येतो. तेथे प्लास्टिकच्या पत्रावळीचा वापर होत असून उपयोग झाल्यानंतर त्या नागरिक अस्ताव्यस्त फेकुन देत असल्याने प्लास्टिक बंदीचा येथे फज्जाच उडल्याचे दिसून येते. योग्य कार्यवाहीची गरज आहे.दारुच्या बाटल्यांचा खचजिल्ह्यात दारूबंदी असली तरी काही मद्यपी या परिसरात चोर वाटेने दारू आणून तेथे दारूपार्टीच करीत असल्याचे दिसून येते. पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांसह दारूच्या रिकाम्या शिश्यांचा खच धरण परिसरात दिसून येतो. या परिसराची नैसर्गिक सुंदरता कायम रहावी तसेच मद्य पार्टीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधितांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.२४ तास सुरक्षा रक्षक देण्याची मागणीविस्तीर्ण असलेल्या परिसरात धरणाच्या किनाऱ्यावरून पर्यटक फेरफटका मारतात; पण पाण्याच्या काठावर जावून बसणाऱ्यांची संख्या कमी नाही. येथे येणाऱ्या दुसऱ्या पर्यटकांना सुद्धा सुरक्षिततेची आवश्यकता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी बोरधरण परिसरात २४ तास सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.

टॅग्स :Bor Damबोर धरणPlastic banप्लॅस्टिक बंदी