शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

बोरधरणाची सुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:14 IST

निसर्गरम्य परिसर असल्याने नजीकच्या बोर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहेत. ही बाब तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देत अनेकांना रोजगार देणारी ठरत असली तरी सध्या जीव मुठीत घेऊन थेट बोर प्रकल्पाच्या पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : जीव धोक्यात टाकून लुटतात पोहण्याचा आनंद

विजय माहूरे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/घोराड : निसर्गरम्य परिसर असल्याने नजीकच्या बोर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहेत. ही बाब तालुक्यातील पर्यटन विकासाला चालना देत अनेकांना रोजगार देणारी ठरत असली तरी सध्या जीव मुठीत घेऊन थेट बोर प्रकल्पाच्या पाण्यात पर्यटक पोहण्याचा आनंद घेत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात येतात. इतकेच नव्हे तर काही हौसी धरणाच्या पाण्याच्या काठापर्यंत जावून डबा पार्टीचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. शिवाय ते चिमुकल्यांना सोबत घेवून धरणाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे बोरधरण सध्या जलतरण तलाव झाल्याचे दिसते. तेथे दर्शनी भागावर पोलीस विभागाच्यावतीने सुचना फलक लावण्यात आला आहे. परंतु, त्या सुचनांकडे सध्या दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली जात आहे. बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी तसेच कुठलाही अनुचित प्रकार टाळावा यासाठी बोर प्रकल्पाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाºयांनी तसेच सेलू पोलिसांनी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.पाण्यात उतरुण घेतला जातोय सेल्फीवर्धा पाटबंधारे विभागाकडून धरणाच्या मुख्य भागावर छायाचित्र काढण्यास मनाई असल्याचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, तेथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या मोबाईलचा फ्लॅश धरणावर पाडून बोरधाचे चित्र मोबाईलमध्ये कैद केले जात आहे. इतकेच नव्हे तर चक्क धरणाच्या पाण्यात उतरुण सेल्फी काढली जात असल्याने धरण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी आहे.प्लास्टिक बंदीचा फज्जाकमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे. असे असले तरी सध्या बोरधरण परिसरात विकल्या जाणाऱ्या वस्तूसाठी सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचा प्रकार दिसून येतो. तेथे प्लास्टिकच्या पत्रावळीचा वापर होत असून उपयोग झाल्यानंतर त्या नागरिक अस्ताव्यस्त फेकुन देत असल्याने प्लास्टिक बंदीचा येथे फज्जाच उडल्याचे दिसून येते. योग्य कार्यवाहीची गरज आहे.दारुच्या बाटल्यांचा खचजिल्ह्यात दारूबंदी असली तरी काही मद्यपी या परिसरात चोर वाटेने दारू आणून तेथे दारूपार्टीच करीत असल्याचे दिसून येते. पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्यांसह दारूच्या रिकाम्या शिश्यांचा खच धरण परिसरात दिसून येतो. या परिसराची नैसर्गिक सुंदरता कायम रहावी तसेच मद्य पार्टीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधितांनी योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.२४ तास सुरक्षा रक्षक देण्याची मागणीविस्तीर्ण असलेल्या परिसरात धरणाच्या किनाऱ्यावरून पर्यटक फेरफटका मारतात; पण पाण्याच्या काठावर जावून बसणाऱ्यांची संख्या कमी नाही. येथे येणाऱ्या दुसऱ्या पर्यटकांना सुद्धा सुरक्षिततेची आवश्यकता आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी तसेच बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी बोरधरण परिसरात २४ तास सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशी मागणी सुजान नागरिकांची आहे.

टॅग्स :Bor Damबोर धरणPlastic banप्लॅस्टिक बंदी