शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

घरकुलासाठी ग्रामीण जनतेला अडीच लाख मिळाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:56 IST

शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक गरजुंना मिळाला पाहिजे. यासाठी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. सदर योजनेसाठी मिळणारा दीड लाखांचा निधी वाढवून तो शहराप्रमाणे अडीच लाख झाला पाहिजे.

ठळक मुद्देरामदास तडस : खासदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : शासनाची महत्वाकांक्षी योजना म्हणून पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येक गरजुंना मिळाला पाहिजे. यासाठी शासकीय यंत्रणेतील प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे. सदर योजनेसाठी मिळणारा दीड लाखांचा निधी वाढवून तो शहराप्रमाणे अडीच लाख झाला पाहिजे. यासाठी प्रत्येक ग्रा. पं. ने ठराव घेवून मागणीचा पाठपुरावा केला पाहिजे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले.पं. स. सभागृहात तालुकास्तरीय आढावा सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर पं. स. सभापती विद्या भुजाडे, उपसभापती किशोर गव्हाळकर, गट विकास अधिकारी मनोहर बारापात्रे, जि.प. सदस्य मयुरी मसराम, पं. स. सदस्य दिलीप अग्रवाल, शंकर उईके, युवराज खडतकर, कुसुम चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या आढावा बैठकीला तालुक्यातील विविध गावांमधील सरपंच, ग्रामसेवक तसेच विविध विभागाच्या अधिकाºयांची उपस्थिती होती.लोकहितासाठी घरकुलाची योजना कार्यान्वित होत असताना काही अधिकारी या कामात कुचराई करीत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा अधिकाºयांना वेळीच वटणीवर आणणे गरजेचे असल्याने अशांच्या नावांची यादी माझ्याकडे आहे. कामचुकारी करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असेही यावेळी खा. तडस म्हणत समस्यांची दखल घेवून संबंधितांना कामाबाबत निर्देश दिले.प्रत्येक गावात घनकचरा व्यवस्थापन, गांडूळ खत निर्मिती व मशीनच्या माध्यमातून कचऱ्याचे विलगीकरण करण्याबाबत याप्रसंगी चर्चा करण्यात आली. गिरोली वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामातील निष्काळजीपणा व अरेरावीचा ठपका ठेवून तसेच गर्भवती मातावर याचा विपरीत परिणाम व मुल दगावण्याचा गंभीर आरोप करण्यात आला.गावपातळीवर शासनाच्या योजनांची माहिती दिली जात नसल्याने अनेक जण योजनांपासून अनभिज्ञ आहे, अशी टिप्पणी यावेळी मांडली असता खा. तडस यांनी त्यावर प्रत्येक गावात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे फलक लावण्याच्या सूचना केल्या. देवळी तालुक्यातील बहूतांश ग्रामपंचायतींनी दिव्यांगाच्या वाट्याचा असलेला निधी खर्च केलेला नाही. असे पुढे येताच दिव्यांगांच्या समस्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देत सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी शासकीय जागेवर वसलेल्या नागरिकांना पट्टे देण्याबाबत पाठपुरावा करण्याचे निश्चित करण्यात आले. ईसापूर येथे गोट मार्केट उभारून शेळी पालनाच्या व्यवसायाला चालना देण्याचे ठरविण्यात आले. याप्रसंगी रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येणारी कामे व येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा झाली. शिवाय पांदण रस्ते, नदी- नाले खोलीकरण तसेच बंद झालेले रस्ते, उज्ज्वला योजनेबाबतच्या तक्रारी, विद्यार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहार, विविध शाळांमधील सूविधा, तसेच शिक्षकांची कमतरता, नाचणगाव येथील ग्रामविकास अधिकाºयांचा विषयही चर्चीला गेला. याप्रसंगी राजू शेंडे, डॉ. प्रवीण धमाने, सालम सईद, प्रमोद सातपुडे, मेश्राम, दशरथ भुजाडे, सतीश आत्राम, संजय खोपडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस