शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाण्याअभावी रुग्णांचे हाल

By admin | Updated: April 5, 2016 04:38 IST

येथील ग्रामीण रुग्णालयातील विहिरीने तळ गाठल्याने पाण्याची समस्या बिकट झाली आहे. याचा त्रास येथे येत

 समुद्रपूर : येथील ग्रामीण रुग्णालयातील विहिरीने तळ गाठल्याने पाण्याची समस्या बिकट झाली आहे. याचा त्रास येथे येत असलेल्या रुग्णांना सहन करावा लागतो आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना घरून पाणी आणावे लागत आहे. कुलर बंद असल्याने तळपत्या उन्हात उष्णतेत दिवस काढण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. रुग्णालयाला पाणी पुरविण्याकरिता विहीर आहे. याच विहिरीतून रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीलाही पाणी पुरविल्या जात आहे. येथे पाणी नसल्याने कर्मचारीही निवासस्थानी राहण्यास तयार नाही. रुग्णालयातील रुग्णांना पाणी मिळावे याकरिता आठवड्यातून एकवेळा विहिरीत पाणी सोडले जात आहे. होत असलेला पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने रुग्णांना त्रास होत आहे. रुग्णालयाकरिता बांधकाम खात्याने नवीन निवासस्थान निर्माण केले आहे. तेथे असलेल्या विंधन विहिरीला भरपूर पाणी आहे; परंतु ती रुग्णालय प्रशासनाला हस्तांतरीत करण्यात आली नाही. यामुळे रुग्णालयाला पाणी मिळत नाही. शिवाय स्थानिक नगर पंचायत प्रशासन रुग्णालयाला पाणी देण्यास तयार नाही. ग्रामीण रुग्णालयात पाणीटंचाईमुळे आॅपरेशन व इतर कामांचा खोळंबा झाला आहे. येथे नाक दाबून बुक्याचा मार सहन करीत वैद्यकीय अधिकारी कर्मचारी काम करीत आहेत. या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधी मात्र उदासिन आहे.(तालुका प्रतिनिधी) पाण्याअभावी कुलर बंद ४रुग्णालयात पाण्याचा तुटवडा असल्याने येथील हॉलमध्ये असलेले कुलर बंद करण्यात आले आहे. रुग्णांना उष्णतेत राहावे लागत आहे. ४या रुग्णालयाच्या आवारात कर्मचाऱ्यांकरिता सात निवासस्थान आहे; मात्र येथे पाणी नसल्याने त्यांनी येथे थांबण्यास नकार दिला असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. रुग्णालयातील पाणी टंचाई निवारण्याकरिता टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तो दररोज होणे गरजेचे आहे. - डॉ. धर्मपाल खेडकर, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, समुद्रपूरग्रामीण रुग्णालयाने नगरपंचायतला मागणी केल्यास त्यांना पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करू. याकरिता रस्ता आडवा आल्याने बांधकाम खात्याची परवानगी घेत तो फोडून पाईपलाईन टाकण्यात येईल. - गजानन राऊत, सभापती, पाणी पुरवठा नगर पंचायत, समुद्रपूरपाईप फुटल्याने पाण्याचा अपव्यय ४नारायणपूर- समुद्रपूर पंचायत समितींतर्गत येत असलेल्या नारायणपूर येथे सन १९८६ मध्ये पाणीपुरवठा योजना सुरू झाली. या योजनेतून गावाला पाण्याचा पुरवठा होत आहे. या वर्षी गावात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. असे असताना येथील पाईपलाईन फुटल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्य होत आहे परिणामी टाकीत पाणी जात नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पाईपलाईन त्वरीत दुरुस्त करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. ४याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी पाईप लाईन कालबाह्य झाल्याने ही समस्या उद्भवत असल्याचे सांगितले आहे. ती लवकर दुरुस्त करण्यात येईल, असे सरपंच युवराज तान्दुलकर यांनी सांगितले आहे.(वार्ताहर)