शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
4
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
5
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
6
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
7
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
8
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
9
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
10
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
11
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
12
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
14
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
15
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
16
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
17
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
18
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
19
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
20
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी

कर वसुलीसाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांची धावपळ

By admin | Updated: March 23, 2015 01:50 IST

ग्रामविकासात देशाचा विकास आहे, असे म्हणत शासनाने ग्रामविकास अधिकाऱ्यांना १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले.

वर्धा : ग्रामविकासात देशाचा विकास आहे, असे म्हणत शासनाने ग्रामविकास अधिकाऱ्यांना १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले. यामुळे ग्रामीण भागात ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून घरोघरी जावून कर वसुली करणे सुरू आहे. मात्र जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने कराचा भरणा होणे शक्य नसल्याचे दिसत आहे. कराची वसुली करण्याकरिता ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांना नोटीसी बजावल्या आहेत. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीच्या उत्पन्नावर आहे. यंदा पहिले पावसाची दडी व नंतर गारपीट यामुळे शेतकऱ्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे कराचा भरणा कसा करावा असा प्रश्न त्याच्या समोर आला आहे. अशात शासनाने जिल्ह्यातील काही गावे दुष्काळग्रस्त जाहीर केल्याने त्या गावातील नागरिकांना कराच्या बडग्यापासून सुटका मिळणार आहे. मात्र या यादीत जी गावे आली नाहीत त्यांच्यावर कराचा बडगा कायम आहे.३१ मार्च ही आर्थिक वर्षाची कर भरण्याची अंतिम तारीख असते. त्यामुळे प्रत्येक विभाला कर वसुलीचे उदिष्ट्ये निश्चित केल्या जात असल्याचे प्रत्येक विभागाचे अधिकारी सक्तीची वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्रामपंचायत सामान्यकर, पाणीपट्टी कर, पाटबंधारे विभागाचा पाणीकर, महसूल विभागाचा शेतसारा वसुल करण्यासाठी त्या विभागाचे अधिकारी घरावर दस्तक देत आहेत. विद्युत बिल भरण्यासाठी तर वीज वितरण कंपनीने आॅॅटोवर लाऊडस्पीकर बांधून दवंडी देणे सुरू केले आहे. ग्रामसचिवाला ग्रामपंचायतीची ९० टक्के वसुली करण्याचे लेखी आदेश असल्याने ग्रामपंचायतचे वसुली कर्मचारी घराभोवती घिरट्या घालत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश गावात ग्रामसचिवाला शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक व्यथा ऐकाव्या लागत आहेत. वीज वितरण कंपनीची टि.डी.पी. योजना धुमधडाक्यात असल्याने वीज बिलाचा भरणा केला नाही तर बत्ती गुल असाच प्रकार घडत आहे. यामुळे इकडे आड तिकडे विहीर, अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे. यातून सूट देण्याची मागणी ग्रामीण भागात जोर धरत आहे.(प्रतिनिधी)