शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

कर वसुलीसाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांची धावपळ

By admin | Updated: March 23, 2015 01:50 IST

ग्रामविकासात देशाचा विकास आहे, असे म्हणत शासनाने ग्रामविकास अधिकाऱ्यांना १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले.

वर्धा : ग्रामविकासात देशाचा विकास आहे, असे म्हणत शासनाने ग्रामविकास अधिकाऱ्यांना १०० टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट दिले. यामुळे ग्रामीण भागात ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून घरोघरी जावून कर वसुली करणे सुरू आहे. मात्र जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने कराचा भरणा होणे शक्य नसल्याचे दिसत आहे. कराची वसुली करण्याकरिता ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून गावकऱ्यांना नोटीसी बजावल्या आहेत. ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था शेतीच्या उत्पन्नावर आहे. यंदा पहिले पावसाची दडी व नंतर गारपीट यामुळे शेतकऱ्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे कराचा भरणा कसा करावा असा प्रश्न त्याच्या समोर आला आहे. अशात शासनाने जिल्ह्यातील काही गावे दुष्काळग्रस्त जाहीर केल्याने त्या गावातील नागरिकांना कराच्या बडग्यापासून सुटका मिळणार आहे. मात्र या यादीत जी गावे आली नाहीत त्यांच्यावर कराचा बडगा कायम आहे.३१ मार्च ही आर्थिक वर्षाची कर भरण्याची अंतिम तारीख असते. त्यामुळे प्रत्येक विभाला कर वसुलीचे उदिष्ट्ये निश्चित केल्या जात असल्याचे प्रत्येक विभागाचे अधिकारी सक्तीची वसुली करण्याचा प्रयत्न करीत आहे. ग्रामपंचायत सामान्यकर, पाणीपट्टी कर, पाटबंधारे विभागाचा पाणीकर, महसूल विभागाचा शेतसारा वसुल करण्यासाठी त्या विभागाचे अधिकारी घरावर दस्तक देत आहेत. विद्युत बिल भरण्यासाठी तर वीज वितरण कंपनीने आॅॅटोवर लाऊडस्पीकर बांधून दवंडी देणे सुरू केले आहे. ग्रामसचिवाला ग्रामपंचायतीची ९० टक्के वसुली करण्याचे लेखी आदेश असल्याने ग्रामपंचायतचे वसुली कर्मचारी घराभोवती घिरट्या घालत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश गावात ग्रामसचिवाला शेतकरी शेतमजुराच्या आर्थिक व्यथा ऐकाव्या लागत आहेत. वीज वितरण कंपनीची टि.डी.पी. योजना धुमधडाक्यात असल्याने वीज बिलाचा भरणा केला नाही तर बत्ती गुल असाच प्रकार घडत आहे. यामुळे इकडे आड तिकडे विहीर, अशी परिस्थिती ग्रामीण भागात आहे. यातून सूट देण्याची मागणी ग्रामीण भागात जोर धरत आहे.(प्रतिनिधी)