शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

आर्वी बाजार समितीला 80 लाखांचा फटका; सर्वच समित्या बंदमध्ये सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST

जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे. या बाजार समितीसह देवळी बाजार समितीने बंदला पाठिंबा दिला. तर सेलू येथील मार्केट परंपरागत मंगळवारी बंद असते.  त्यामुळे येथे व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नाही. हिंगणघाट येथील मार्केट बंद राहणार असल्याची माहिती तसेच शेतकरीबांधवांनी स्वेच्छेने आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे बंदच्या पूर्वसंध्येला शेतकरी शेतमाल घेऊन आले नाही. 

ठळक मुद्देबुधवारी उसळली शेतकर्यांची गर्दी : देवळी बाजार समितीत चार कोटींची आवक

    लाेकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनांनी मार्केट यार्ड बंद राहणार असल्याची पूर्वसूचना शेतकरीबांधवांना दिली होती. त्यामुळे शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहारच झाले नाहीत. जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात हिंगणघाट येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक आहे. या बाजार समितीसह देवळी बाजार समितीने बंदला पाठिंबा दिला. तर सेलू येथील मार्केट परंपरागत मंगळवारी बंद असते.  त्यामुळे येथे व्यवहारावर कोणताही परिणाम झाला नाही. हिंगणघाट येथील मार्केट बंद राहणार असल्याची माहिती तसेच शेतकरीबांधवांनी स्वेच्छेने आंदोलनात सहभाग घेतला. त्यामुळे बंदच्या पूर्वसंध्येला शेतकरी शेतमाल घेऊन आले नाही. देवळी येथे बंदच्या दुसऱ्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कापूस उत्पादक शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या दिवशी चार ते साडेचार कोटींच्या व्यवहारातून चारशे गाड्यांतील कापसाची खरेदी  करण्यात आली. बंदच्या पूर्वसंध्येला बाजारात आलेल्या सर्व कापूस गाड्यांची खरेदी करण्यात आल्याने  शेतकऱ्यांची गैरसोय झाली नाही.  बंदच्या दिवशी मात्र मार्केट यार्डमध्ये कमालीचा शुकशुकाट होता. तर आर्वी येथील बाजार समितीला बंदमुळे ७० ते ८० लाखांचा फटका बसला. या बाजार समितीनेही शेतकऱ्यांना पूर्वसूचना दिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय टळली. बुधवारी अत्यल्प शेतकरी बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आले होते. वर्धा बाजार समितीही बंद असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. या बाजार समितीत शेतमालाची आवकही अल्पशीच आहे.

दिवसभरात कोटींचे व्यवहार ठप्पयावर्षी सोयाबीनचे उत्पादन ३० टक्के तर नापिकी ७० टक्के अशी स्थिती आहे. कापसाचे उत्पादनदेखील यावेळी निम्म्यावर आले आहे. त्यामुळे सोमवारी आलेल्या मालाची विक्री आणि मोजमाप दुपारपर्यंतच आटोपले. नापिकीमुळे शेतकऱ्यांकडे शेतमालाचा अभाव आणि आवक झालेल्या शेतमालाची त्याच दिवशी दुपारपर्यंत विक्री होत असल्याने मार्केटमध्ये गर्दीच होत नाही. परिणामी, यंदाच्या हंगामात रात्री शेतमालाची आवक होत नाही. हिंगणघाट, वर्धा बाजार समितीत ५ ते ७ कोटींची उलाढाल ठप्प झाली.

यंदा शेतमालाचे उत्पादन नाममात्रच आहे. बंदमध्ये बाजार समित्या सहभागी झाल्या तरी नापिकीमुळे शेतकऱ्यांकडे शेतमालाचा अभाव व मार्केट बंदची माहिती तसेच शेतकऱ्यांचा बंदमध्ये स्वेच्छेने सहभाग यामुळे मार्केटला फटका बसला नाही.  - ॲड. सुधीर कोठारी, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाट.

भारत बंद असल्याची माहिती पूर्वीच मिळाली. त्यामुळे सोमवारी कुणीही कापूस गाड्या भरून मंगळवारी खरेदी होणार्या काट्यावर आणल्या नाहीत.  बाजार समितीनेही सूचना दिली होती. त्यामुळे बुधवारी कापूस विक्रीसाठी आणण्यात आला. - महेश बावणे, शेतकरी, पिंपळगाव.

भारत बंदची सूचना अगोदरच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडून मिळाल्याने बंदच्या पूर्वसंध्येला शेतकरीवर्गाने कापूस विक्रीस आणला नाही. बुधवारला कापूस विक्रीसाठी आणला. त्यामुळे कुठलीही गैरसोय झाली नाही.- रणजित तेलंगे, शेतकरी, देऊळगाव.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डcottonकापूस