शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
2
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
3
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
4
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
5
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
6
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
8
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
9
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
10
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
11
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
12
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
13
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
14
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
15
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
16
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
17
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
18
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
19
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
20
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी

नदी आटली; विहिरींचीही जलपातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:47 IST

दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पाण्याकरिता भटकंती

संडे अँकर । केळझर येथे ग्रा.पं.कडून अत्यल्प पाणीपुरवठाउन्हाळ्याच्या सुरूवातीलाच ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून गावाला ग्रा.पं.कडून घरगुती नळांना अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांची पाण्याकरिता भटकंती सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निवडणुकीत दंग असल्याने गावातील प्राथमिक सोई सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मागील काही वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. नियोजनाअभावी दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे.लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. नदीकाठावरील गावे सुजलाम् सुफलाम् असतात. यावर्षी मात्र हा समज खोटा ठरायला लागला आह. कधी नव्हे, तर या महाशिवरात्रीला नदीत पाणीच नसल्याचे दिसून आले. पाणीटंचाईचे संकेत असल्याचे जाणकारांतून बोेलले जात आहे.याच नदीच्या काठावर देर्डा गाववासीयांना पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीची जलपातळी खालावल्याने एक दिवसाआड पाणी गावात नळ योजनेअंतर्गत पुरविल्या जात आहे. यामुळे मार्च महिन्यातच जलसमस्येच्या झळा गावकरी सोसत आहेत.ग्रामस्थांचे शेती आणि मजुरी हेच व्यवसाय आणि रोजगाराचे साधन आहे. नदीवर जवळपास दहा मोटरपंप असून पºहाटी, तुरी, चणा, गहू आणि चारा अशी पिके शेतकरी घेतात. पण फेब्रुवारीत नदी आटल्याने शेतकरी हवालदिल झाले. पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. चारा नाही. जनावरांच्या पाण्याचा पण प्रश्न शेतकरी व गोपालकांना भेडसावत आहे. वाढत्या पाऱ्यामुळे सर्वत्र रखरख झाल्याने जनावरे चरणार तरी कोठे? नदीकाठावर विहीर असल्याने आतापर्यंत समस्या जाणवली नाही. यावेळी मात्र नदी आटल्याने पाणीसमस्या अधिक बिकट झालेली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई