शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नदी आटली; विहिरींचीही जलपातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:47 IST

दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पाण्याकरिता भटकंती

संडे अँकर । केळझर येथे ग्रा.पं.कडून अत्यल्प पाणीपुरवठाउन्हाळ्याच्या सुरूवातीलाच ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून गावाला ग्रा.पं.कडून घरगुती नळांना अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांची पाण्याकरिता भटकंती सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निवडणुकीत दंग असल्याने गावातील प्राथमिक सोई सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मागील काही वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. नियोजनाअभावी दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे.लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. नदीकाठावरील गावे सुजलाम् सुफलाम् असतात. यावर्षी मात्र हा समज खोटा ठरायला लागला आह. कधी नव्हे, तर या महाशिवरात्रीला नदीत पाणीच नसल्याचे दिसून आले. पाणीटंचाईचे संकेत असल्याचे जाणकारांतून बोेलले जात आहे.याच नदीच्या काठावर देर्डा गाववासीयांना पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीची जलपातळी खालावल्याने एक दिवसाआड पाणी गावात नळ योजनेअंतर्गत पुरविल्या जात आहे. यामुळे मार्च महिन्यातच जलसमस्येच्या झळा गावकरी सोसत आहेत.ग्रामस्थांचे शेती आणि मजुरी हेच व्यवसाय आणि रोजगाराचे साधन आहे. नदीवर जवळपास दहा मोटरपंप असून पºहाटी, तुरी, चणा, गहू आणि चारा अशी पिके शेतकरी घेतात. पण फेब्रुवारीत नदी आटल्याने शेतकरी हवालदिल झाले. पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. चारा नाही. जनावरांच्या पाण्याचा पण प्रश्न शेतकरी व गोपालकांना भेडसावत आहे. वाढत्या पाऱ्यामुळे सर्वत्र रखरख झाल्याने जनावरे चरणार तरी कोठे? नदीकाठावर विहीर असल्याने आतापर्यंत समस्या जाणवली नाही. यावेळी मात्र नदी आटल्याने पाणीसमस्या अधिक बिकट झालेली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई