शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
2
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
3
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
4
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
6
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
7
IPL 2026 Retention Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
8
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
9
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
10
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
11
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
12
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
13
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
14
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
15
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
16
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
17
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
18
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
19
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
20
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

नदी आटली; विहिरींचीही जलपातळी खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:47 IST

दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.

ठळक मुद्देरखरखत्या उन्हात ग्रामस्थांची पाण्याकरिता भटकंती

संडे अँकर । केळझर येथे ग्रा.पं.कडून अत्यल्प पाणीपुरवठाउन्हाळ्याच्या सुरूवातीलाच ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील दोन दिवसांपासून गावाला ग्रा.पं.कडून घरगुती नळांना अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांची पाण्याकरिता भटकंती सुरू झाली आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी निवडणुकीत दंग असल्याने गावातील प्राथमिक सोई सुविधांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसते. मागील काही वर्षांपासून प्रत्येक उन्हाळ्यात गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. नियोजनाअभावी दरवर्षी पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे.लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : दोन नद्यांच्या संगमावरील देर्डा गाववासी सध्या पाणीसंकटाचा सामना करीत असून शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.हमदापूरच्या पुढे देर्डा हे गाव असून या ठिकाणी बोर व धामनदीचा संगम झालेला आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. नदीकाठावरील गावे सुजलाम् सुफलाम् असतात. यावर्षी मात्र हा समज खोटा ठरायला लागला आह. कधी नव्हे, तर या महाशिवरात्रीला नदीत पाणीच नसल्याचे दिसून आले. पाणीटंचाईचे संकेत असल्याचे जाणकारांतून बोेलले जात आहे.याच नदीच्या काठावर देर्डा गाववासीयांना पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीची जलपातळी खालावल्याने एक दिवसाआड पाणी गावात नळ योजनेअंतर्गत पुरविल्या जात आहे. यामुळे मार्च महिन्यातच जलसमस्येच्या झळा गावकरी सोसत आहेत.ग्रामस्थांचे शेती आणि मजुरी हेच व्यवसाय आणि रोजगाराचे साधन आहे. नदीवर जवळपास दहा मोटरपंप असून पºहाटी, तुरी, चणा, गहू आणि चारा अशी पिके शेतकरी घेतात. पण फेब्रुवारीत नदी आटल्याने शेतकरी हवालदिल झाले. पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. चारा नाही. जनावरांच्या पाण्याचा पण प्रश्न शेतकरी व गोपालकांना भेडसावत आहे. वाढत्या पाऱ्यामुळे सर्वत्र रखरख झाल्याने जनावरे चरणार तरी कोठे? नदीकाठावर विहीर असल्याने आतापर्यंत समस्या जाणवली नाही. यावेळी मात्र नदी आटल्याने पाणीसमस्या अधिक बिकट झालेली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई