शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे धाम नदीने बदलला प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:02 IST

वर्धा जिल्ह्यातील धामनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर झुडपे व शेवाळे वाढले असल्याने पाण्याचा प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने नदीचे पात्र गावाकडे सरकले आहे.

ठळक मुद्देवेळीच उपाययोजना करणे आवश्यकगावाला पुराचा होऊ शकतो धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आंजी (मोठी) येथुन वाहणारी धाम नदी ही आंजीकरांसाठी जीवनदायिनी आहे. परंतु काळाच्या ओघात त्यामध्ये बरेच बदल झाले आहेत. धामनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर झुडपे व शेवाळे वाढले असल्याने पाण्याचा प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने नदीचे पात्र गावाकडे सरकले आहे. नदीच्या पाण्याचा ओघ हा अवघडनाथ महाराज मंदीराच्या टेकडीवर आला आहे व यामुळे टेकडीची पाण्याने झीज होऊन टेकडीसुद्धा जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथून पाण्याचा प्रवाह नारायण महाराज मठाकडे वळतो त्या मुळे येथेही पावसाळ्यात पुराने नुकसान नाकारता येत नाही. त्यामुळे नदीचे पात्र स्वच्छ करुन नदीचे पुनरुज्जीवन करून पात्र पूर्ववत करावे अशी मागणी होत होती. मागील वर्षी महाकाळी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत नदीपात्राची स्वच्छता जिल्हा प्रशासन व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत होती चनकापुरपर्यंत झालीसुध्दा होती. त्यानंतर त्या पुढे नदी स्वच्छता अभियान थांबले. तेव्हापासून ते प्रलंबित आहे. धाम नदी ही वर्धा शहरासह ब-याच गावाची तहान भागविते पण तिच्या स्वच्छतेकडे कोणाचेच लक्ष नाही. याकडे वेळीच लक्ष घालणे आवश्यक आहे नाहीतर गावाला पुरामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही नदी धाम प्रकल्पाचा येळाकेळीपर्यत मुख्य कालवा असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनकडे पाठपुरावा केला आहे.जगदीश संचेरीया,सरपंच , आंजी (मोठी)आमच्या बालपणी नदीचे पात्र खुप दुर होते. ते आज गावालगत आले आहे. यावर लवकर उपाय योजना करून नदी पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे.सुनिल भादककरग्रामस्थ तथा अध्यक्षप्रेरणा फाऊंडेशनआंजी मोठी

 

टॅग्स :riverनदी