शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे धाम नदीने बदलला प्रवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:02 IST

वर्धा जिल्ह्यातील धामनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर झुडपे व शेवाळे वाढले असल्याने पाण्याचा प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने नदीचे पात्र गावाकडे सरकले आहे.

ठळक मुद्देवेळीच उपाययोजना करणे आवश्यकगावाला पुराचा होऊ शकतो धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आंजी (मोठी) येथुन वाहणारी धाम नदी ही आंजीकरांसाठी जीवनदायिनी आहे. परंतु काळाच्या ओघात त्यामध्ये बरेच बदल झाले आहेत. धामनदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर झुडपे व शेवाळे वाढले असल्याने पाण्याचा प्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने नदीचे पात्र गावाकडे सरकले आहे. नदीच्या पाण्याचा ओघ हा अवघडनाथ महाराज मंदीराच्या टेकडीवर आला आहे व यामुळे टेकडीची पाण्याने झीज होऊन टेकडीसुद्धा जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथून पाण्याचा प्रवाह नारायण महाराज मठाकडे वळतो त्या मुळे येथेही पावसाळ्यात पुराने नुकसान नाकारता येत नाही. त्यामुळे नदीचे पात्र स्वच्छ करुन नदीचे पुनरुज्जीवन करून पात्र पूर्ववत करावे अशी मागणी होत होती. मागील वर्षी महाकाळी प्रकल्पापासून येळाकेळीपर्यंत नदीपात्राची स्वच्छता जिल्हा प्रशासन व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत होती चनकापुरपर्यंत झालीसुध्दा होती. त्यानंतर त्या पुढे नदी स्वच्छता अभियान थांबले. तेव्हापासून ते प्रलंबित आहे. धाम नदी ही वर्धा शहरासह ब-याच गावाची तहान भागविते पण तिच्या स्वच्छतेकडे कोणाचेच लक्ष नाही. याकडे वेळीच लक्ष घालणे आवश्यक आहे नाहीतर गावाला पुरामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.ही नदी धाम प्रकल्पाचा येळाकेळीपर्यत मुख्य कालवा असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासनकडे पाठपुरावा केला आहे.जगदीश संचेरीया,सरपंच , आंजी (मोठी)आमच्या बालपणी नदीचे पात्र खुप दुर होते. ते आज गावालगत आले आहे. यावर लवकर उपाय योजना करून नदी पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे.सुनिल भादककरग्रामस्थ तथा अध्यक्षप्रेरणा फाऊंडेशनआंजी मोठी

 

टॅग्स :riverनदी