शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

सर्वदूर रिमझिम पाऊसधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 05:02 IST

यावर्षी उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यत जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या तर २० लघू व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. सोमवारी आठही तालुक्यामध्ये एकूण ११८.६३ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यामध्ये झाला आहे.

ठळक मुद्दे१४.८२ मिमी पाऊस : निम्न वर्धा प्रकल्पाची दो दारे उघडली

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. रविवारी झालेल्या पावसानंतर सोमवारीही सकाळपासून रिमझिम पावसाने सुरुवात केली. यामध्ये जिल्ह्याभरातील आठही तालुक्यामध्ये सरासरी १४.८२ मिली मीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. सततच्या पावसाने आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प ७३.७१ टक्के भरल्याने या प्रकल्पाची दोन गेट १० से.मी. उघडल्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.यावर्षी उशिरा का होईना पावसाने दमदार हजेरी लावल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत आतापर्यत जलाशयाच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या तर २० लघू व मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी वाढल्याने लगतचे नदी-नालेही ओसंडून वाहत आहे. सोमवारी आठही तालुक्यामध्ये एकूण ११८.६३ टक्के पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस सेलू तालुक्यामध्ये झाला आहे.सध्या सर्वत्रच समाधान कारक पाऊस असल्याने पंचधारा, डोंगरगाव प्रकल्प व वर्धा कारनदी प्रकल्पाच्या सांडव्यावरुन पाणी वाहत आहे. सोमवारी सकाळपासून सुरु झालेल्या पाऊसधारांनी दुपारी तीन वाजताच उसंत घेतल्याने जनजीवन सुरळीत झाले. सततच्या पावसामुळे बऱ्याच भागातील शेतीकामांना ब्रेक लागला आहे. आकाशात ढगांची गर्दी कायम असून दमदार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.सध्या जिल्ह्यातील ११ मोठ्या जलाशयापैकी पंचधारा प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प व वर्धा कारनदी प्रकल्प तसेच २० लघू व मध्यम जलाशयांपैकी आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी व रोठा दोन या सहाही जलाशयाच्या सांडव्यावरुण पाणी वाहत आहे. त्यामुळे येथील निसर्ग सौदर्य बघण्यासाठी या कोरोनाकाळात त्रस्त झालेल्या नागरिकांची गर्दी उसळत आहे. काही पोहोण्याचाही आनंद लुटत आहे पण, त्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव असल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे.लघु, मध्यम जलाशयांची पाणीपातळी वाढलीजिल्ह्यातील २० लघू व मध्यम जलाशय असून पावसामुळे पाणीपातळीत चागलीच वाढ झाली आहे. आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा-२ व परसोडी ही जलाशये ९० टक्के पेक्षा अधिक भरलेली आहेत. तर लहादेवी, रोठा-१ व कन्नमवारग्राम या तीन जलाशातील पाणीपातळी ८० टक्के पेक्षा जास्त असून कवाडी, सावंगी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, कुऱ्हा, आष्टी, पिलापूर, मलाकापूर, हराशी व टाकळी बोरखेडी या जलाशयातील पाणी पातळी ८० टक्केच्या आत आहे.

टॅग्स :Rainपाऊस