शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

माहिती अधिकार; कलम ४ बाबत सामान्य जनता अनभिज्ञ

By admin | Updated: March 14, 2015 02:02 IST

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता असावी, अपवाद वगळता जनतेशी निगडीत कामांची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी ...

वर्धा : प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता असावी, अपवाद वगळता जनतेशी निगडीत कामांची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी माहिती अधिकार कायदा २००५ मंजूर करण्यात आला़ कायदा होऊन तब्बल दहा वर्षे लोटत आहेत; पण अद्यापही या कायद्याची संपूर्ण माहिती सामान्य नागरिकांना उपलब्ध होत नाही़ शिवाय प्रशासनही या कायद्याचे तंतोतंत पालन करीत नसल्याचेच दिसते़ यामुळे जिल्ह्यात केवळ एकाच कार्यालयात माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ चे पालन होत असल्याचे समोर आले आहे़माहिती अधिकार कायद्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकारी व प्रथम अपिल अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे़ याबाबत संपूर्ण कार्यालयांमध्ये माहितीचा फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे़ हे फलक बहुतांश कार्यालयात लावलेले आहे; पण त्यातही अधिकारी बदलल्यास फलकावरील नाव बदलण्याची तसदी घेतली जात नाही़ अनेक कार्यालयांत सदर फलकही लावण्यात आलेले नाहीत़ कायदा पारित होऊन १० वर्षे लोटत असून अनेक अधिकाऱ्यांवर या कायद्याचा जरबही बसला आहे तरी कायद्याचे पालन करण्यात हयगय होत असल्याचे वास्तव आहे़ माहिती अधिकार कायद्यातील कलम चारबाबत संपूर्ण नागरिकांना माहिती असणे गरजेचे असते; पण त्याचे जिल्ह्यात कुठेही पालन होताना दिसत नाही़ माहिती अधिकार कायद्याच्या कलम चारमध्ये संबधित शासकीय कार्यालयाची माहिती अंतर्भुत करणे गरजेचे असते़ जिल्ह्यात एक कार्यालय सोडले तर कुठेही कलम चारबाबत माहिती नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवल्याचे आढळून येत नाही़ वर्धा उपविभागीय अधिकारी कार्यालयात सदर माहिती लावण्यात आलेली आहे़ यात कलम चारमध्ये नमूद केल्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत कर्मचारी ते कर्तव्य, जबाबदाऱ्यांबाबत माहिती नमूद करण्यात आलेली आहे़ यामुळे एसडीओ कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांना अधिक विचारणा करण्याची गरज पडत नसल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)संबंधित विभागातील कर्मचारी ते कर्तव्यांची माहितीमाहिती अधिकारी अधिनियम २००५ च्या कलम ४ (१) नुसार संबंधित कार्यालयाची रचना, कर्तव्ये, जबाबदाऱ्या यासह कुठली कामे सदर ठिकाणी केली जातात, त्यासाठी किती कालावधी लागतो, ती कामे न झाल्यास जबाबदार कोण आदी इत्यंभूत माहिती प्रसिद्ध करावी लागते़ जिल्ह्यात कोणत्याही कार्यालयात ही माहिती दिली जात नाही; पण उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या कलमाचे पालन करीत कलम ४ ची संपूर्ण माहिती नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून दिलेली आहे़ उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेल्या या माहितीमुळे सामान्य नागरिकांना आपली कामे कुणाकडे न्यावी लागतात, त्यासाठी किती कालावधी लागतो, कामे न झाल्यास कुणाकडे दाद मागावी हे कुणाला विचारण्याची गरज पडत नाही़ जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी तत्सम माहिती सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते़