शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

माहिती अधिकार; कलम ४ बाबत सामान्य जनता अनभिज्ञ

By admin | Updated: March 14, 2015 02:02 IST

प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता असावी, अपवाद वगळता जनतेशी निगडीत कामांची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी ...

वर्धा : प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता असावी, अपवाद वगळता जनतेशी निगडीत कामांची माहिती सामान्य नागरिकांना मिळावी यासाठी माहिती अधिकार कायदा २००५ मंजूर करण्यात आला़ कायदा होऊन तब्बल दहा वर्षे लोटत आहेत; पण अद्यापही या कायद्याची संपूर्ण माहिती सामान्य नागरिकांना उपलब्ध होत नाही़ शिवाय प्रशासनही या कायद्याचे तंतोतंत पालन करीत नसल्याचेच दिसते़ यामुळे जिल्ह्यात केवळ एकाच कार्यालयात माहिती अधिकार कायद्याच्या कलम ४ चे पालन होत असल्याचे समोर आले आहे़माहिती अधिकार कायद्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात माहिती अधिकारी व प्रथम अपिल अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे़ याबाबत संपूर्ण कार्यालयांमध्ये माहितीचा फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे़ हे फलक बहुतांश कार्यालयात लावलेले आहे; पण त्यातही अधिकारी बदलल्यास फलकावरील नाव बदलण्याची तसदी घेतली जात नाही़ अनेक कार्यालयांत सदर फलकही लावण्यात आलेले नाहीत़ कायदा पारित होऊन १० वर्षे लोटत असून अनेक अधिकाऱ्यांवर या कायद्याचा जरबही बसला आहे तरी कायद्याचे पालन करण्यात हयगय होत असल्याचे वास्तव आहे़ माहिती अधिकार कायद्यातील कलम चारबाबत संपूर्ण नागरिकांना माहिती असणे गरजेचे असते; पण त्याचे जिल्ह्यात कुठेही पालन होताना दिसत नाही़ माहिती अधिकार कायद्याच्या कलम चारमध्ये संबधित शासकीय कार्यालयाची माहिती अंतर्भुत करणे गरजेचे असते़ जिल्ह्यात एक कार्यालय सोडले तर कुठेही कलम चारबाबत माहिती नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवल्याचे आढळून येत नाही़ वर्धा उपविभागीय अधिकारी कार्यालयात सदर माहिती लावण्यात आलेली आहे़ यात कलम चारमध्ये नमूद केल्यानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत कर्मचारी ते कर्तव्य, जबाबदाऱ्यांबाबत माहिती नमूद करण्यात आलेली आहे़ यामुळे एसडीओ कार्यालयाच्या कामकाजाबाबत नागरिकांना अधिक विचारणा करण्याची गरज पडत नसल्याचे दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)संबंधित विभागातील कर्मचारी ते कर्तव्यांची माहितीमाहिती अधिकारी अधिनियम २००५ च्या कलम ४ (१) नुसार संबंधित कार्यालयाची रचना, कर्तव्ये, जबाबदाऱ्या यासह कुठली कामे सदर ठिकाणी केली जातात, त्यासाठी किती कालावधी लागतो, ती कामे न झाल्यास जबाबदार कोण आदी इत्यंभूत माहिती प्रसिद्ध करावी लागते़ जिल्ह्यात कोणत्याही कार्यालयात ही माहिती दिली जात नाही; पण उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या कलमाचे पालन करीत कलम ४ ची संपूर्ण माहिती नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करून दिलेली आहे़ उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये लावण्यात आलेल्या या माहितीमुळे सामान्य नागरिकांना आपली कामे कुणाकडे न्यावी लागतात, त्यासाठी किती कालावधी लागतो, कामे न झाल्यास कुणाकडे दाद मागावी हे कुणाला विचारण्याची गरज पडत नाही़ जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी तत्सम माहिती सहज दिसेल अशा ठिकाणी लावणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते़