शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाणे विक्रीप्रकरणी कृषी केंद्राचा परवाना रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 05:00 IST

शेतकरी शितल चौधरी यांनी एका कृषिसेवा केंद्रातून ६५ बियाण्यांचे बॅग खरेदी केले.पण, बियाणे उगविलेच नसल्याने शेतकºयाचे लाखोंचे नुकसान झाले. कृषिमंत्री दादाजी भूसे यांची भेट घेत त्यांच्यापुढे शेतकऱ्यांची व्यथा मांडली असता त्यांनी कृषिकेंद्र चालक, निर्माता व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देत परवाना रद्द करून दुकान सील करण्याबाबत सांगितले.

ठळक मुद्दे गुन्हा दाखल करण्याची मागणी : कृषिमंत्र्यांना शिवसेनेचे निवेदन, शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गोविंदपूर येथील शेतकरी शितल चौधरी यांना बोगस बियाणे देत फसवणूक केल्याप्रकरणी कृषी केंद्रचालकाचा परवाना रद्द करून गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुषार देवढे यांच्या नेतृत्त्वात कृषिमंत्री दादाजी भूसे यांना निवेदनातून करण्यात आली.शेतकरी शितल चौधरी यांनी एका कृषिसेवा केंद्रातून ६५ बियाण्यांचे बॅग खरेदी केले.पण, बियाणे उगविलेच नसल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले. कृषिमंत्री दादाजी भूसे यांची भेट घेत त्यांच्यापुढे शेतकऱ्याची व्यथा मांडली असता त्यांनी कृषिकेंद्र चालक, निर्माता व कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश देत परवाना रद्द करून दुकान सील करण्याबाबत सांगितले. परंतु, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच विभागीय महासंचालकांकडून अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. येत्या १५ दिवसात पीडित शेतकऱ्याला मोबदल्याच्या स्वरुपात न्याय न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.बियाण्यांसह तणनाशकही निघू लागले बोगसअनेक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीनचे बियाणे बोगस निघाले असून सोयाबीनची उगवणच झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला. त्यातच आता शेतकऱ्यांनी शेतात तणनाशकाची फवारणी केली असता त्याचा काहीही उपयोग झाला असून वाढलेले तण जैसे थेच असल्याने पिकांच्या उत्पादनात घट झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे मात्र, कृषीविभागाचे डोळे बंद असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे.बथदिवे, वीजखांब बसविण्याची मागणीवडनेर : वडनेर गाव हिंगणघाट तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून गावातून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे.महामार्गाच्या दोन्ही बाजूला गाव वसलेले आहे. पथदिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास रस्त्यावर काळोख असतो. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना अंधारात रस्ताच दिसत नसल्याने अनेकांचे अपघातही झाले आहे. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होवू नये, यासाठी महामार्गालगत पथदिवे आणि विद्युत खांब लावण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.वीजबिल माफ करा; दिलीप अग्रवाल यांची मागणीलॉकडाऊनच्या काळात छोटे-मोठे उद्योग धंदे बंद असल्याने नागरिकांचा रोजगारही हिरावला. अशा परिस्थितीत नागरिकांना कुटुंबाचा गाडा चालविणेही कठीण झाले होते. अशा विवंचनेत असतांना नेहमी पेक्षा तिप्पट वीज देयक आल्यामुळे नागरिकांना अवाजवी वीज देयके भरणे शक्य नाही. आधीच लॉकडाऊनमुळे नागरिकांच्या हाताला काम नाही, सर्व दैनदिन व्यवसाय ठप्प आहेत. ठप्प असलेले सर्व व्यवहार सुरळीत होण्यासाठी नागरिकांना ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे नागरिकांचे वीजबिल माफ करण्याची मागणी दिलीप अग्रवाल यांनी प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे.

टॅग्स :agricultureशेती