शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकेच्या पुनरूज्जीवनाचा विसर

By admin | Updated: February 7, 2015 01:25 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पुनरूज्जीवन करण्यासंदर्भात राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात निर्णय घेतला होता.

वर्धा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पुनरूज्जीवन करण्यासंदर्भात राज्य शासनाने हिवाळी अधिवेशनात निर्णय घेतला होता. एक महिन्याच्या आत वर्धा, नागपूर व बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेतील आर्थिक व्यवहार सुरू करण्यास असलेले अडथळे दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने पुढाकार घेवून कार्यवाही करण्याचे आश्वासन हिवाळी अधिवेशनात १९ डिसेंबर २०१४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान अधिकार अभियानच्या शिष्टमंडळाला दिले होते. परंतु मागील दीड महिन्यापासून राज्य शासनाने यासंबंधात कोणतीही कार्यवाही न केल्याने सहकारी बँकांच्या पुनरूज्जीवनाचा विसर पडला की काय असा प्रश्न पडला आहे. किसान अधिकार अभियानच्या वतीने ठेवीदारांच्या संघटनेने वर्षभरापासून ठेविदारांच्या न्याय हक्कासाठी शासन, प्रशासनाकडे सातत्याने संघर्ष सुरू ठेवला आहे. राज्य शासनाने सहकार्य करण्याची हमी ठेवीदारांना दिली होती. ठेवीदारांच्या वतीने राज्यशासनाला दिलेल्या निवेदनात गरजु ठेवीदारांना त्यांच्या रकमा तातडीने मिळाव्या यासाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज जिल्हा बँकेला द्यावे, राज्य व केंद्र शासनाच्या आर्थिक योजना जिल्हा सहकारी बँकांमधून सुरू कराव्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रशासक म्हणून आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची राज्यशासनाने नियुक्ती करून संपूर्ण व्यवहार व अनियमितता नियंत्रणात आणावी, बँकेचा एनपीए व्यवस्थित करण्यासाठी बँकेचे तत्कालीन संचालक मंडळातील नियमानुसार अध्यक्ष, सदस्य व हमी धारकांना दिलेल्या थकित कर्जाच्या वाटपासाठी नियमानुसार जबाबदार मानून त्यांच्या संपत्ती लिलावात काढण्यात याव्या, बँकेचे कर्ज थकित ठेवणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना व उद्योगांना सक्तीने जप्तीचे आदेश देण्यात यावे. सोबतच बँकेसोबत केलेल्या अनियमिततेच्या आधारावर उच्च न्यायालयात फौजदारी गुन्हे नोंदवून खटले चालवावे, थकित कर्जदारांची यादी वर्तमान पत्रात जाहीर करावी व एक लाखापेक्षा मोठ्या कर्जदारांकडे असलेल्या थकित रकमांच्या वसुलीसाठी शासनाची ५० टक्के वरील पैसेवारीची अट शिथिल करून वर्धा जिल्ह्यात सक्तीची वसुली करण्याचे आदेश प्रशासकाला राज्य शासनाने द्यावे. डॉ. प्रकाश बक्षी समिती व डॉ. वैद्यनाथन समितीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पुनर्र्जीवनासाठी दिलेल्या आवश्यक सूचना लवकरात लवकर लागू कराव्या. आवश्यकतेनुसार वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राज्य सहकारी बँकेत किंवा अन्य सक्षम बँकेत विलिनीकरण करण्यात यावे आदी मागण्यांसाठी वारंवार निवेदन जिल्ह्यातील आमदार, खासदार व पालकमंत्र्यांनाही देण्यात आले. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली असता मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दीड महिना लोटूनही यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. पिकांना भाव नसल्याने शेतकरी वर्गाची आर्थिक स्थिती ढासळत चालली आहे. असे असतानाही शासनाकडून कुठलेही ठोस पाऊस उचलले जात नसल्याने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गरजू ठेविदारांच्या अडकलेल्या रकमा काढून देण्यास सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्धा मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना शिष्टमंडळात किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे संतोष सावरकर, तुकाराम ढबाले, महादेव खेडकर, प्रभाकर बेले, संजय लाखे, निखिल वानखेडे, डॉ. नरड, काळे, भारती पराते, विठ्ठल अतकरे, निळकंठ राऊत, विठ्ठल लोखंडे, गोरे, सुनिता अडतकर, सुचिता वाघ, भाऊराव काकडे, गोेविंदा पेटकर, बाबाराव ठाकरे, प्रफुल कुकडे आदींचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)