शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
अनंत अंबानी-राधिक मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
10
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
11
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
12
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
13
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
14
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
15
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
16
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
17
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
18
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
19
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

लोकप्रतिनिधी आणि सामान्य श्रोत्यांची साहित्य संमेलनाकडे पाठ; कवी, गझलकरांचा उत्साह पाहण्यासारखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2023 7:12 PM

Wardha News मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या मागोमाग घोषणेच्या स्वरूपात खोकेही पोहोचल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराचा नूर बदलला आहे. या घडामोडीपासून लोकप्रतिनिधींनी आणि सामान्य श्रोत्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरविल्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे.

नरेश डोंगरे!

राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरी (वर्धा) : मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या मागोमाग घोषणेच्या स्वरूपात खोकेही पोहोचल्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या परिसराचा नूर बदलला आहे. या घडामोडीपासून लोकप्रतिनिधींनी आणि सामान्य श्रोत्यांनी या संमेलनाकडे पाठ फिरविल्याची प्रकर्षाने जाणीव होत आहे.

५३ वर्षांनंतर बापू विनोबाच्या कर्मभूमीत साहित्यनगरी पुन्हा एकदा सजली आहे. साहित्य संमेलनाचे आयोजन भव्य दिव्यच आहे आणि त्यामुळे हा एकूणच परिसर कमालीचा देखणा झाला आहे. मात्र उद्घाटनाच्या कार्यक्रमात ५० खोक्यांच्या घोषणाबाजीने गालबोट लावल्याने संमेलनाला काही वेळेसाठी अस्वस्थ केले होते. जवळपास प्रत्येकच डोममधील खाली खुर्च्यांची संख्या श्रुती पृष्ठ झाल्याची चुगली करत होती.

जत्रा फुलली, मात्र...

सायंकाळी साहित्यिकांची, कवी आणि गझलकारांची गर्दी वाढल्याने परिसरात उत्साह ओसंडून वाहू लागला, परंतु साहित्यिक, कवी, गझलकारांच्या जत्रेत श्रोत्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत होती. अध्यक्षीय भाषणाच्या वेळीचे आचार्य विनोबा भावे सभामंडपातील चित्र खूपच बोलके होते.

 

निधी दिला, जबाबदारी संपली

वर्धा जिल्ह्यात चार आमदार आणि एक खासदार आहेत. देवळीचे आमदार वगळता तीनही आमदार आणि खासदार भाजपचेच आहेत. त्यातील वर्धेचे आमदार पंकज भोयर हे उद्घाटन कार्यक्रमापुरतेच मंचावर दिसले. त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही आमदार आणि खासदार तर सोडा, विविध पक्षांचा कोणताही मोठा नेता या परिसरात फिरताना दिसला नाही. संमेलनाला प्रत्येक आमदार, खासदारांनी दहा-दहा लाख रुपये आपल्या निधीतून दिल्याचे सांगितले जाते. मात्र, निधी दिला आणि आपली जबाबदारी संपली, अशीच भूमिका या लोकप्रतिनिधींनी घेतल्याचे शनिवारी सायंकाळपर्यंत चित्र होते.

कशाचा इफेक्ट?

लोकप्रतिनिधीने सारस्वतांच्या मेळ्यापासून राखलेले अंतर कशाचा इफेक्ट आहे, ते स्पष्ट झाले नाही. मात्र, त्या संबंधाने वेगवेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे. काहींनी आपले नेते आले नसल्याने इकडे येण्याचे टाळले असावे, तर काहींचा विधानपरिषद निवडणुकांनी भ्रमनिरास केल्यामुळे ते इकडे येऊ शकले नसावे, असा अंदाज वर्तविला जात आहे.

सूर्य, चंद्र, आकाश, तारे सारे सारे!

या साहित्य संमेलनात सूर्य, चंद्र, आकाश, तारे असे सारे सारे अवतरले. शेतकऱ्यांच्या बेरोजगारांच्या अवस्थेचीही चर्चा झाली. मात्र, केवळ कवी संमेलन आणि गझल कट्ट्यावर!

-----

टॅग्स :literatureसाहित्यMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन