शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
2
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
3
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
4
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
5
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
6
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
7
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
8
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
9
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
10
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
11
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
12
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
13
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
14
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
15
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
16
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
17
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
18
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
19
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त प्राध्यापकाने स्मशानामध्येच फुलविली शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

संजय अंबादास वानखडे असे सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. आर्वीतील संजयनगरनजीक बोहरा समाजाची सात एकर जागा आहे. त्यातील दीड एकर जागेत स्मशानभूमी असून, उर्वरित जागा पडीक होती. या सातही एकराच्या परिसराला आमदार निधीतून ताराचे कुंपण करण्यात आले. पडीक जागा उपयोगी लागावी, यासाठी संजय वानखेडे यांनी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. 

ठळक मुद्देपाच एकरांत घेतात उत्पादन : स्मशानभूमीतच केली राहुटी

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : जेथे मृतात्म्याला अखेरचा निरोप दिला जातो, त्या भूमीवर दिवसरात्र राहायचे म्हटले, तर अंगावर काटा उभा होतो. मात्र, येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाने शेतीकरिता स्मशानभूमीची जागा निवडून व तेथेच निवास करून तेथे सेंद्रिय शेती फुलविली आहे. त्यांचा हा अनोखा प्रयोग चर्चेचा विषय व अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.संजय अंबादास वानखडे असे सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. आर्वीतील संजयनगरनजीक बोहरा समाजाची सात एकर जागा आहे. त्यातील दीड एकर जागेत स्मशानभूमी असून, उर्वरित जागा पडीक होती. या सातही एकराच्या परिसराला आमदार निधीतून ताराचे कुंपण करण्यात आले. पडीक जागा उपयोगी लागावी, यासाठी संजय वानखेडे यांनी बोहरा समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. या जागेवर शेतीसोबतच पिकनिक स्पॉट, लहान मुलांसाठी खेळणी, बगीचा व फुलझाडे लावण्याची संकल्पना त्यांनी मांडली. बोहरा समाजाच्या प्रतिनिधींना ही संकल्पना पटल्याने वानखेडे यांनी ५५ हजार रुपयांमध्ये पाच एकर शेती ठेक्याने घेतली. त्यांनी ठरल्याप्रमाणे ही शेती विकसित केली. यामुळे आता येथे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. हा ओसाड परिसर पिकनिक स्पॉटच झाला आहे. बोहरा समाजातील कुटुंबीय या परिसरात येऊन निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतात. इतरही नागरिक विरंगुळा म्हणून या ठिकाणी वेळ घालवतात. सेवानिवृत्त प्राध्यापकाची आता स्मशानात राहणारा मनुष्य म्हणून शहरात ओळख निर्माण झाली आहे. 

ओसाड परिसरात बहरले हिरवागार माळरानपाण्याची अडचण असल्याने वानखेडे यांनी स्मशानभूमीतील विहिरीत सर्वप्रथम आडवे बोर केले. त्यानंतर संरक्षण भिंतीलगत लावण्यासाठी १८ हजार रुपयांची शोभेची झाडे आणली. चार लाख रुपये खर्च करून पाचही एकरांत ठिंबक सिंचनाची सोय केली. जमीन कसण्यायोग्य केल्यानंतर शेणखत, गोमुत्राचा वापर करून सेंद्रिय शेतीच केली. भुईमूग, मका, तूर व चण्याचे पीक त्यांनी घेतले. आता दोन  एकरात पपईची लागवड केली, तर उर्वरित जागेवर अद्रक, वांगी व कलिंगड लावले आहे. त्यामुळे हा परिसर आता अनेकांना खुणावत आहे.

३३ वर्षे प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर आता सेवानिवृत्त झालो. शेती हा माझा पिढीजात व्यवसाय. स्मशानातील शेतीतून नफा कमाविणे हा माझा उद्देश नाहीच. येथे येणाऱ्या दु:खी माणसांचे  मन प्रसन्न व्हावे, मृतात्म्यालाही खऱ्या अर्थाने मोक्षधामाची प्रचिती व्हावी, हा प्रामाणिक प्रयत्न आहे. शेतीबरोबर एक ते दीड एकरात लहान मुलांसाठी बगीचा, खेळणे, झुला आदी विविध साहित्य लावायचे असून, येथे गार्डन डेव्हलपमेंट फार्म तयार करण्याचा मानस आहे, जेणेकरुन मुले, कुटुंब पिकनिकचा आनंद घेतील आणि स्मशानाबद्दल अंधश्रद्धा दूर होण्यास मदत होईल.- संजय अंबादास वानखडे,           सेवानिवृत्त प्राध्यापक.

 

टॅग्स :agricultureशेती