शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

निर्बंध शिथिल; पण आरटीपीसीआरची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2021 5:00 AM

राज्य शासनाने लॉकडाऊन १५ जून पर्यंत वाढविला असून जिल्ह्यांतर्गत परिस्थिती लक्षात घेता काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा कमी भरल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी १ जूनपासून ते १५ जूनपर्यंत निर्बंध शिथिल करण्याचा आदेश पारित केला. त्यानुसार व्यावसायिकांना दिवस ठरवून देत सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे.

ठळक मुद्देव्यावसायिकांसाठी चाचणी बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या प्रकोप लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. आता रुग्णसंख्या आणि पॉझिटिव्हीटी कमी झाल्याने जिल्हा प्रशासनाने शिथिलता दिली आहे. त्यामुळे दुकानांचीही वेळा ठरवून दिल्या आहेत. परंतु आता व्यावसायिकांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ज्यांच्याकडे आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र राहणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.राज्य शासनाने लॉकडाऊन १५ जून पर्यंत वाढविला असून जिल्ह्यांतर्गत परिस्थिती लक्षात घेता काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने आणि उपलब्ध ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांपेक्षा कमी भरल्याने जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी १ जूनपासून ते १५ जूनपर्यंत निर्बंध शिथिल करण्याचा आदेश पारित केला. त्यानुसार व्यावसायिकांना दिवस ठरवून देत सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी वाढणार असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व व्यापारी, दुकानदार, दुकानातील कामगार, डिलिवरी बॉय, वाहन चालक, रिक्षा चालक, फेरीवाले आणि इतर सेवापुरवठादार या सर्वांनी आरटीपीसीआर कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ७ जूनपासून सर्व व्यावसायिकांकडे आरटीपीसीआर चाचणीचे प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या पथकाकडून प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार असून ज्यांकडे प्रमाणपत्र राहणार नाही, त्या व्यावसायिकावर १ हजार रुपये दंड आकारुन दुकान सील केले जाणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व व्यावसायिकांनी आरटीपीसीआर चाचणी करुन घ्यावी. व्यावसायिक तसेच त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणीकरिता लोकमहाविद्यालय, मदनमोहन धर्मशाळा कच्ची लाईन, धुनिवाले मठ व कस्तुरुबा ई-स्कूल बोरगाव (मेघे) येथे केंद्र सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी जाऊन चाचणी करुन घ्यावी आणि प्रमाणपत्र सोबत ठेवावे.विपीन पालीवाल, मुख्याधिकारी, न.प.वर्धा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या