शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पुलगावात व्यापार बंद ठेवून शहिदांना आदरांजली

By admin | Updated: June 2, 2016 00:42 IST

देशातील कारगील युध्दात शहीद झालेल्या शहरातील कृष्णा समरीत व सोहनसिंह पवार या दोन वीरांना शहरवासीयांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिल्यानंतर....

प्रभाकर शहाकार ल्ल पुलगाव (वर्धा)देशातील कारगील युध्दात शहीद झालेल्या शहरातील कृष्णा समरीत व सोहनसिंह पवार या दोन वीरांना शहरवासीयांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिल्यानंतर पुन्हा परत एकदा शहरात आक्रोश, शोक, संवेदना व्यक्त करीत सोमवारी मध्यरात्री बॉम्बस्फोटातील शहिदांना पुलवासीयांनी बाजारपेठा बंद ठेवून आदरांजली अर्पण केली. शहरात ठिकठिकाणी शहिदांना भावपूर्ण श्रध्दांजलीचे फलक झळकत होते.या आग व बॉम्बस्फोटाच्या घटनेत दोन लष्करी अधिकाऱ्यांसह शहरातील बाळासाहेब पाखरे, लिलाधर चोपडे, प्रमोद ऊर्फ बादल महादेव मेश्राम, अमित महादेव दांडेकर, अमोल येसनकर या पाच जणांना वीरमरण आले. मृतकांच्या परिवाराशी झालेल्या चर्चेनुसार शहीद झालेल्या वीरांचे मृतदेह ओळखण्यात अनेक अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. प्रस्तुत प्रतिनिधीने सर्वच शहिदांच्या निवासस्थानाला भेट दिली असता अजूनही १० ते १२ कर्मचारी बेपत्ता असल्याची चर्चा यावेळी ऐकायला मिळाली. मंगळवारी रात्री दोन मृतदेह आढळले. घटनास्थळी असलेला अंधार व बॉम्बस्फोटाच्या आवाजाने झालेल्या पळापळीत अमित दांडेकर व अमोल येसनकर या दोघांचा घटनास्थळाजवळील पाण्याच्या टाकीत पडल्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना आधीच मृत घोषित करण्यात आले होते. मृतांमध्ये हिमाचल प्रदेशातील रविंद्र कुमार व राजेंद्रकुमार तसेच आर्वी पुनर्वसन गावातील शेखर बालसकर या तिघांचा अद्याप शोध लागला नसल्याचे समजते. घटनास्थळ परिसरातील दारूगोळा भांडाराचे शेड कोसळले. त्या खाली काही मृतदेह असण्याची शक्यता कर्मचारी व्यक्त करीत आहेत. भांडारच्या प्रवेशद्वारावर पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, नातलगांसह शहरवासीयांनी एकच गर्दी होती.